शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

gram panchayat election: निवडणुकीआधीच पक्षांनी काढलंय अंग, सर्वत्र गाव पॅनलचा चंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 18:38 IST

निवडणुकीनंतर अमुक ग्रामपंचायत व सरपंच आमच्या पक्षाचे म्हणून दावा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संदीप बांद्रेचिपळूण : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावपातळीवर वातावरण पूर्णत: ढवळून निघायला सुरुवात झाली आहे. मात्र, या निवडणुकीचा धुरळा उडण्याआधीच राजकीय पक्षांनी अंग काढण्यास सुरुवात केली आहे. आता तुम्ही तुमचे गावपातळीवर बघा, अशी भूमिका पक्ष व राजकीय नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनीही बिनविरोधचा चंग बांधण्यास सुरुवात केली आहे.सध्या जिल्ह्यात २२२ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीमुळे भर हिवाळ्यात गावांमध्ये वातावरण तापले आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत गटा-तटाचे राजकारण सर्वात जास्त पाहायला मिळते. त्यात एखाद्या गावात राजकीय हस्तक्षेप असेल तर फोडाफोडीलाही वेगळेच महत्त्व प्राप्त होते.परंतु, या वेळच्या निवडणुकीत एकाही राजकीय पक्षाने थेट निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतलेला नाही. उलट तुमचे तुम्ही गावपातळीवर बघा, असा सल्ला देत असल्याने सर्व जबाबदारी ग्रामस्थांवर येऊन पडली आहे. अगदी राष्ट्रवादी, शिवसेना व शिंदे गटानेही हीच भूमिका घेतल्याने गावपुढाऱ्यांमध्येच निवडणुकीचा ज्वर टोकावर पोहोचू लागला आहे. मात्र, त्यातही काहींनी बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही ठिकाणी बिनविरोधाचा प्रस्ताव मोडकळीस आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी दोनपेक्षा अधिक गट-तट एकत्र येऊन वेगवेगळ्या जोडण्या लावण्याचे काम करीत आहेत.गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत महत्त्वाचे ठरत असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक महत्त्वाची ठरत आहे. याव्यतिरिक्त केंद्र शासन राज्य शासन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनी ग्रामपंचायतीकडे सोपवलेली योजनांची अंमलबजावणी करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असल्याने त्याला राजकीय महत्त्वही तितकेच आले आहे.कार्यकारी शक्ती प्रदानमुळात पंचायतराजमधील सर्वात खालचा, पण महत्त्वाचा टप्पा म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. अधिनियमानुसार सरपंच यांना कायद्यानेच कार्यकारी शक्ती प्रदान केली आहे. त्याशिवाय शासन निधीची क्षमताही वाढली आहे. त्यामुळे पंचायत समितीपेक्षा ग्रामपंचायतच बरी असे आता म्हटले जाते. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य होण्यासाठी गावात स्पर्धा सुरू झाली आहे.निवडणुकीनंतर ‘सरपंच’ आमचाग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपा आणि शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा विचार केला जाईल, असे सुरुवातीला वाटले होते. मात्र, एकाही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी अजून तरी ‘एण्ट्री’ घेतलेली दिसत नाही. परंतु, निवडणुकीनंतर अमुक ग्रामपंचायत व सरपंच आमच्या पक्षाचे म्हणून दावा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक