शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांना अंतर्गत गटबाजी भोवणार?

By admin | Updated: October 9, 2016 23:36 IST

जिल्हा परिषद निवडणूक : नेतृत्त्वाची होणार अग्निपरीक्षा !

रत्नागिरी : नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्वपक्षातील विरोधकांना ‘आसमान’ दाखविण्यासाठी कारवाया सुरू आहेत. या कुरघोडींनी पक्ष पोखरले असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांना त्याचा जबर फटका बसण्याची शक्यता आहे. अंतर्गत गटबाजीचे हे ग्रहण सोडविणे प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांसाठी अग्निपरीक्षाच ठरणार आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. पंचायत समित्याही सेनेकडे आहेत. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवरही सेनेचे सरपंच आहेत. गेल्या पंधरा ते वीस वर्षात जिल्ह्यात सेनेच्या राजकीय ताकदीचा आलेख उंचावला. मात्र, खुर्ची, पदे, उमेदवारी यासाठी आता सेनेतही अनेक दावेदार निर्माण झाले आहेत. त्यातूनच गटबाजीचे वारे वाहात आहेत. उत्तर रत्नागिरीत शिवसेना भक्कम होती. परंतु गेल्या निवडणुकीत दापोली -मंडणगड विधानसभा मतदारसंघात सूर्यकांत दळवी यांचा पराभव झाला होता. रत्नागिरी - रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे केंद्रीय मंत्री अनंत गीते व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे मनोमीलन झाल्याने राजकीय समीकरणे बदलली. पर्यावरण मंत्री कदम यांनी मुलगा योगेश याला दापोली - मंडणगड विधानसभा मतदारसंघासाठी भावी उमेदवार म्हणून पुढे आणले आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याशी जवळीक साधली आहे. परिणामी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या पुढील विधानसभा निवडणूक उमेदवारीपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दळवी भाजपमध्ये जाणार असल्याचीही हवा आहे. चिपळूण, दक्षिण रत्नागिरीमध्येही शिवसेनेत अनेक गट तट आहेत. एकमेकांची कोंडी करण्यासाठी सध्या त्यांच्यातही कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळेच येत्या नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधी पक्षांपेक्षा पक्षांतर्गत विरोधकांशीच सेनेत दोन हात होणार असल्याचे चित्र आहे. नगरपरिषद निवडणुकीत रत्नागिरीतही सेनेतील असंतोष बाहेर पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेशी टक्कर देणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही कुरघोडींना जोर आला आहे. माजी मंत्री भास्कर जाधव यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी असली तरी चिपळुणात राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार रमेश कदम यांच्याशी त्यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. चिपळूण शहर व तालुक्यावरही रमेश कदम यांचा प्रभाव आहे. त्यामुळे चिपळुणातही राजकीय हडकंप माजण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कॉँग्रेसची अवस्था दयनीय आहे. निवडणूक जवळ आली तरी या पक्षाकडे जिल्हाध्यक्ष नाही. जिल्हाध्यक्षपदासाठी कॉँग्रेसमधील नेत्यांमध्ये भांडणे आहेत. पक्षबळ कमी असतानाही कॉँग्रेसमध्ये अन्य पक्षांपेक्षा अधिक भांडणे आहेत. नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांमध्ये या राजकीय गटबाजीचा सर्वच पक्षांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. (वार्ताहर) मतांचे विभाजन होणार विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत सेना-भाजप युती तुटली. त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय गणितेही बदलली आहेत. सेना, राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये अंतर्गत भांडणे, मतभेद मोठ्या प्रमाणात आहेत. त्या तुलनेत भाजपाअंतर्गत मतभेद सध्यातरी कमी आहेत. ‘एकला चलो रे’चा नारा देत भाजपची वाटचाल जिल्ह्यात सुरू आहे. जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी गेल्या सहा महिन्यांच्या काळात जिल्ह्यात संघटना बांधणीचे प्रयत्न केले आहेत. तरीही जिल्ह्यात भाजपची ताकद खूप मोठी नाही. परंतु यावेळी युती नसल्याने सेना व भाजपच्या मतांचे विभाजन होणार आहे.