शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

राजकीय पक्षांना अंतर्गत गटबाजी भोवणार?

By admin | Updated: October 9, 2016 23:36 IST

जिल्हा परिषद निवडणूक : नेतृत्त्वाची होणार अग्निपरीक्षा !

रत्नागिरी : नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्वपक्षातील विरोधकांना ‘आसमान’ दाखविण्यासाठी कारवाया सुरू आहेत. या कुरघोडींनी पक्ष पोखरले असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांना त्याचा जबर फटका बसण्याची शक्यता आहे. अंतर्गत गटबाजीचे हे ग्रहण सोडविणे प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांसाठी अग्निपरीक्षाच ठरणार आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. पंचायत समित्याही सेनेकडे आहेत. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवरही सेनेचे सरपंच आहेत. गेल्या पंधरा ते वीस वर्षात जिल्ह्यात सेनेच्या राजकीय ताकदीचा आलेख उंचावला. मात्र, खुर्ची, पदे, उमेदवारी यासाठी आता सेनेतही अनेक दावेदार निर्माण झाले आहेत. त्यातूनच गटबाजीचे वारे वाहात आहेत. उत्तर रत्नागिरीत शिवसेना भक्कम होती. परंतु गेल्या निवडणुकीत दापोली -मंडणगड विधानसभा मतदारसंघात सूर्यकांत दळवी यांचा पराभव झाला होता. रत्नागिरी - रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे केंद्रीय मंत्री अनंत गीते व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे मनोमीलन झाल्याने राजकीय समीकरणे बदलली. पर्यावरण मंत्री कदम यांनी मुलगा योगेश याला दापोली - मंडणगड विधानसभा मतदारसंघासाठी भावी उमेदवार म्हणून पुढे आणले आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याशी जवळीक साधली आहे. परिणामी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या पुढील विधानसभा निवडणूक उमेदवारीपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दळवी भाजपमध्ये जाणार असल्याचीही हवा आहे. चिपळूण, दक्षिण रत्नागिरीमध्येही शिवसेनेत अनेक गट तट आहेत. एकमेकांची कोंडी करण्यासाठी सध्या त्यांच्यातही कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळेच येत्या नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधी पक्षांपेक्षा पक्षांतर्गत विरोधकांशीच सेनेत दोन हात होणार असल्याचे चित्र आहे. नगरपरिषद निवडणुकीत रत्नागिरीतही सेनेतील असंतोष बाहेर पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेशी टक्कर देणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही कुरघोडींना जोर आला आहे. माजी मंत्री भास्कर जाधव यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी असली तरी चिपळुणात राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार रमेश कदम यांच्याशी त्यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. चिपळूण शहर व तालुक्यावरही रमेश कदम यांचा प्रभाव आहे. त्यामुळे चिपळुणातही राजकीय हडकंप माजण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कॉँग्रेसची अवस्था दयनीय आहे. निवडणूक जवळ आली तरी या पक्षाकडे जिल्हाध्यक्ष नाही. जिल्हाध्यक्षपदासाठी कॉँग्रेसमधील नेत्यांमध्ये भांडणे आहेत. पक्षबळ कमी असतानाही कॉँग्रेसमध्ये अन्य पक्षांपेक्षा अधिक भांडणे आहेत. नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांमध्ये या राजकीय गटबाजीचा सर्वच पक्षांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. (वार्ताहर) मतांचे विभाजन होणार विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत सेना-भाजप युती तुटली. त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय गणितेही बदलली आहेत. सेना, राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये अंतर्गत भांडणे, मतभेद मोठ्या प्रमाणात आहेत. त्या तुलनेत भाजपाअंतर्गत मतभेद सध्यातरी कमी आहेत. ‘एकला चलो रे’चा नारा देत भाजपची वाटचाल जिल्ह्यात सुरू आहे. जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी गेल्या सहा महिन्यांच्या काळात जिल्ह्यात संघटना बांधणीचे प्रयत्न केले आहेत. तरीही जिल्ह्यात भाजपची ताकद खूप मोठी नाही. परंतु यावेळी युती नसल्याने सेना व भाजपच्या मतांचे विभाजन होणार आहे.