शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

राजकीय पक्षांना अंतर्गत गटबाजी भोवणार?

By admin | Updated: October 9, 2016 23:36 IST

जिल्हा परिषद निवडणूक : नेतृत्त्वाची होणार अग्निपरीक्षा !

रत्नागिरी : नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्वपक्षातील विरोधकांना ‘आसमान’ दाखविण्यासाठी कारवाया सुरू आहेत. या कुरघोडींनी पक्ष पोखरले असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांना त्याचा जबर फटका बसण्याची शक्यता आहे. अंतर्गत गटबाजीचे हे ग्रहण सोडविणे प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांसाठी अग्निपरीक्षाच ठरणार आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. पंचायत समित्याही सेनेकडे आहेत. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवरही सेनेचे सरपंच आहेत. गेल्या पंधरा ते वीस वर्षात जिल्ह्यात सेनेच्या राजकीय ताकदीचा आलेख उंचावला. मात्र, खुर्ची, पदे, उमेदवारी यासाठी आता सेनेतही अनेक दावेदार निर्माण झाले आहेत. त्यातूनच गटबाजीचे वारे वाहात आहेत. उत्तर रत्नागिरीत शिवसेना भक्कम होती. परंतु गेल्या निवडणुकीत दापोली -मंडणगड विधानसभा मतदारसंघात सूर्यकांत दळवी यांचा पराभव झाला होता. रत्नागिरी - रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे केंद्रीय मंत्री अनंत गीते व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे मनोमीलन झाल्याने राजकीय समीकरणे बदलली. पर्यावरण मंत्री कदम यांनी मुलगा योगेश याला दापोली - मंडणगड विधानसभा मतदारसंघासाठी भावी उमेदवार म्हणून पुढे आणले आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याशी जवळीक साधली आहे. परिणामी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या पुढील विधानसभा निवडणूक उमेदवारीपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दळवी भाजपमध्ये जाणार असल्याचीही हवा आहे. चिपळूण, दक्षिण रत्नागिरीमध्येही शिवसेनेत अनेक गट तट आहेत. एकमेकांची कोंडी करण्यासाठी सध्या त्यांच्यातही कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळेच येत्या नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधी पक्षांपेक्षा पक्षांतर्गत विरोधकांशीच सेनेत दोन हात होणार असल्याचे चित्र आहे. नगरपरिषद निवडणुकीत रत्नागिरीतही सेनेतील असंतोष बाहेर पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेशी टक्कर देणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही कुरघोडींना जोर आला आहे. माजी मंत्री भास्कर जाधव यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी असली तरी चिपळुणात राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार रमेश कदम यांच्याशी त्यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. चिपळूण शहर व तालुक्यावरही रमेश कदम यांचा प्रभाव आहे. त्यामुळे चिपळुणातही राजकीय हडकंप माजण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कॉँग्रेसची अवस्था दयनीय आहे. निवडणूक जवळ आली तरी या पक्षाकडे जिल्हाध्यक्ष नाही. जिल्हाध्यक्षपदासाठी कॉँग्रेसमधील नेत्यांमध्ये भांडणे आहेत. पक्षबळ कमी असतानाही कॉँग्रेसमध्ये अन्य पक्षांपेक्षा अधिक भांडणे आहेत. नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांमध्ये या राजकीय गटबाजीचा सर्वच पक्षांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. (वार्ताहर) मतांचे विभाजन होणार विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत सेना-भाजप युती तुटली. त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय गणितेही बदलली आहेत. सेना, राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये अंतर्गत भांडणे, मतभेद मोठ्या प्रमाणात आहेत. त्या तुलनेत भाजपाअंतर्गत मतभेद सध्यातरी कमी आहेत. ‘एकला चलो रे’चा नारा देत भाजपची वाटचाल जिल्ह्यात सुरू आहे. जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी गेल्या सहा महिन्यांच्या काळात जिल्ह्यात संघटना बांधणीचे प्रयत्न केले आहेत. तरीही जिल्ह्यात भाजपची ताकद खूप मोठी नाही. परंतु यावेळी युती नसल्याने सेना व भाजपच्या मतांचे विभाजन होणार आहे.