शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

राजकीय पक्षांना अंतर्गत गटबाजी भोवणार?

By admin | Updated: October 9, 2016 23:36 IST

जिल्हा परिषद निवडणूक : नेतृत्त्वाची होणार अग्निपरीक्षा !

रत्नागिरी : नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्वपक्षातील विरोधकांना ‘आसमान’ दाखविण्यासाठी कारवाया सुरू आहेत. या कुरघोडींनी पक्ष पोखरले असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांना त्याचा जबर फटका बसण्याची शक्यता आहे. अंतर्गत गटबाजीचे हे ग्रहण सोडविणे प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांसाठी अग्निपरीक्षाच ठरणार आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. पंचायत समित्याही सेनेकडे आहेत. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवरही सेनेचे सरपंच आहेत. गेल्या पंधरा ते वीस वर्षात जिल्ह्यात सेनेच्या राजकीय ताकदीचा आलेख उंचावला. मात्र, खुर्ची, पदे, उमेदवारी यासाठी आता सेनेतही अनेक दावेदार निर्माण झाले आहेत. त्यातूनच गटबाजीचे वारे वाहात आहेत. उत्तर रत्नागिरीत शिवसेना भक्कम होती. परंतु गेल्या निवडणुकीत दापोली -मंडणगड विधानसभा मतदारसंघात सूर्यकांत दळवी यांचा पराभव झाला होता. रत्नागिरी - रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे केंद्रीय मंत्री अनंत गीते व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे मनोमीलन झाल्याने राजकीय समीकरणे बदलली. पर्यावरण मंत्री कदम यांनी मुलगा योगेश याला दापोली - मंडणगड विधानसभा मतदारसंघासाठी भावी उमेदवार म्हणून पुढे आणले आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याशी जवळीक साधली आहे. परिणामी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या पुढील विधानसभा निवडणूक उमेदवारीपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दळवी भाजपमध्ये जाणार असल्याचीही हवा आहे. चिपळूण, दक्षिण रत्नागिरीमध्येही शिवसेनेत अनेक गट तट आहेत. एकमेकांची कोंडी करण्यासाठी सध्या त्यांच्यातही कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. त्यामुळेच येत्या नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधी पक्षांपेक्षा पक्षांतर्गत विरोधकांशीच सेनेत दोन हात होणार असल्याचे चित्र आहे. नगरपरिषद निवडणुकीत रत्नागिरीतही सेनेतील असंतोष बाहेर पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेशी टक्कर देणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्येही कुरघोडींना जोर आला आहे. माजी मंत्री भास्कर जाधव यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी असली तरी चिपळुणात राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार रमेश कदम यांच्याशी त्यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. चिपळूण शहर व तालुक्यावरही रमेश कदम यांचा प्रभाव आहे. त्यामुळे चिपळुणातही राजकीय हडकंप माजण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कॉँग्रेसची अवस्था दयनीय आहे. निवडणूक जवळ आली तरी या पक्षाकडे जिल्हाध्यक्ष नाही. जिल्हाध्यक्षपदासाठी कॉँग्रेसमधील नेत्यांमध्ये भांडणे आहेत. पक्षबळ कमी असतानाही कॉँग्रेसमध्ये अन्य पक्षांपेक्षा अधिक भांडणे आहेत. नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांमध्ये या राजकीय गटबाजीचा सर्वच पक्षांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. (वार्ताहर) मतांचे विभाजन होणार विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत सेना-भाजप युती तुटली. त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय गणितेही बदलली आहेत. सेना, राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये अंतर्गत भांडणे, मतभेद मोठ्या प्रमाणात आहेत. त्या तुलनेत भाजपाअंतर्गत मतभेद सध्यातरी कमी आहेत. ‘एकला चलो रे’चा नारा देत भाजपची वाटचाल जिल्ह्यात सुरू आहे. जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी गेल्या सहा महिन्यांच्या काळात जिल्ह्यात संघटना बांधणीचे प्रयत्न केले आहेत. तरीही जिल्ह्यात भाजपची ताकद खूप मोठी नाही. परंतु यावेळी युती नसल्याने सेना व भाजपच्या मतांचे विभाजन होणार आहे.