शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय कलगी-तुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 16:49 IST

politics, shiv sena, ncp, ratnagirinews विकास कामांच्या उद्घाटनांवरून उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात चांगलाच कलगी-तुरा रंगू लागला आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दिला असून, त्यावरून आता आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत. मात्र, केवळ उद्घाटनांचे निमंत्रण नाही म्हणूनच हा वाद सुरू झाला आहे की, त्यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत राजकीय तर्कांना उधाण आले आहे.

ठळक मुद्देउत्तर रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय कलगी-तुरासुनील तटकरे, योगेश कदम यांच्यातील वाद पेटला

 मनोज मुळ्येरत्नागिरी : विकास कामांच्या उद्घाटनांवरून उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात चांगलाच कलगी-तुरा रंगू लागला आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दिला असून, त्यावरून आता आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत. मात्र, केवळ उद्घाटनांचे निमंत्रण नाही म्हणूनच हा वाद सुरू झाला आहे की, त्यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत राजकीय तर्कांना उधाण आले आहे.दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी २० ऑक्टोबर रोजी खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दिला आहे. तेव्हापासून आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत. ऑक्टोबर महिन्यात खासदार सुनील तटकरे यांनी मंडणगड, दापोली आणि गुहागरमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती. काही उद्घाटनेही त्यांनी केली. त्यावरून नाराज झालेल्या योगेश कदम यांनी खासदार तटकरे यांच्याविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला आहे.या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी योगेश कदम यांच्यावर आरोप केले. आपल्या आमदारकीच्या काळात पाच वर्षे मंत्री रामदास कदम यांनी जी काही कामे केली, त्यावेळी आपल्यालाही डावलले गेल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपप्रत्यारोपांमुळे अनेक दिवसांनी जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.ही आहेत कारणे हक्कभंग प्रस्तावाचीहक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर योगेश कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. आपल्या मतदार संघात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेताना आपल्याला निमंत्रित केले जात नाही. आपल्या मतदार संघात राज्य शासनाच्या निधीतून होणाऱ्या विकास कामांच्या उद्घाटनात आपल्याला डावलले जाते. त्यामुळे आपण हक्कभंगाचा प्रस्ताव दिला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.पाटील यांनाही सुनावलेनुकतेच रत्नागिरी दौऱ्यावर आलेले मंत्री जयंत पाटील यांनी तटकरे यांची पाठराखण केली. त्यावरून आता आमदार कदम यांनी त्यांनाही काही गोष्टी सुनावल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार असल्याने आपल्याला सोबत घेऊन तटकरे काम करतील, असे अपेक्षित होते. पण तसे त्यांनी केलेले दिसत नाही. राज्य सरकारच्या विकास कामांचे उद्घाटन करताना माजी आमदारांचे नाव फलकावर असते, पण आपले नसते, असे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसRatnagiriरत्नागिरी