शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय कलगी-तुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 16:49 IST

politics, shiv sena, ncp, ratnagirinews विकास कामांच्या उद्घाटनांवरून उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात चांगलाच कलगी-तुरा रंगू लागला आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दिला असून, त्यावरून आता आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत. मात्र, केवळ उद्घाटनांचे निमंत्रण नाही म्हणूनच हा वाद सुरू झाला आहे की, त्यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत राजकीय तर्कांना उधाण आले आहे.

ठळक मुद्देउत्तर रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय कलगी-तुरासुनील तटकरे, योगेश कदम यांच्यातील वाद पेटला

 मनोज मुळ्येरत्नागिरी : विकास कामांच्या उद्घाटनांवरून उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात चांगलाच कलगी-तुरा रंगू लागला आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दिला असून, त्यावरून आता आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत. मात्र, केवळ उद्घाटनांचे निमंत्रण नाही म्हणूनच हा वाद सुरू झाला आहे की, त्यामागे अन्य काही कारण आहे, याबाबत राजकीय तर्कांना उधाण आले आहे.दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी २० ऑक्टोबर रोजी खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दिला आहे. तेव्हापासून आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत. ऑक्टोबर महिन्यात खासदार सुनील तटकरे यांनी मंडणगड, दापोली आणि गुहागरमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती. काही उद्घाटनेही त्यांनी केली. त्यावरून नाराज झालेल्या योगेश कदम यांनी खासदार तटकरे यांच्याविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला आहे.या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी योगेश कदम यांच्यावर आरोप केले. आपल्या आमदारकीच्या काळात पाच वर्षे मंत्री रामदास कदम यांनी जी काही कामे केली, त्यावेळी आपल्यालाही डावलले गेल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपप्रत्यारोपांमुळे अनेक दिवसांनी जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.ही आहेत कारणे हक्कभंग प्रस्तावाचीहक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केल्यानंतर योगेश कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. आपल्या मतदार संघात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेताना आपल्याला निमंत्रित केले जात नाही. आपल्या मतदार संघात राज्य शासनाच्या निधीतून होणाऱ्या विकास कामांच्या उद्घाटनात आपल्याला डावलले जाते. त्यामुळे आपण हक्कभंगाचा प्रस्ताव दिला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.पाटील यांनाही सुनावलेनुकतेच रत्नागिरी दौऱ्यावर आलेले मंत्री जयंत पाटील यांनी तटकरे यांची पाठराखण केली. त्यावरून आता आमदार कदम यांनी त्यांनाही काही गोष्टी सुनावल्या आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार असल्याने आपल्याला सोबत घेऊन तटकरे काम करतील, असे अपेक्षित होते. पण तसे त्यांनी केलेले दिसत नाही. राज्य सरकारच्या विकास कामांचे उद्घाटन करताना माजी आमदारांचे नाव फलकावर असते, पण आपले नसते, असे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसRatnagiriरत्नागिरी