शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
6
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
7
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
8
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
9
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
10
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
11
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
12
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
13
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
14
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
15
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
16
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
17
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
19
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
20
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

पोलिसांनी लावला ७७५ जणांचा शोध बेपत्ताचे प्रमाण वाढते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2016 00:40 IST

अल्पवयीन मुलांची संख्या अधिक

आकाश शिर्के - रत्नागिरी --रत्नागिरी शहरात गेल्या १३ वर्षांत ८३७जण बेपत्ता असल्याची नोंद पोलीस स्थानकात करण्यात आली होती. त्यामध्ये पुरूषांचे प्रमाण अधिक असून, बेपत्ता असलेल्या ७७५ जणांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे.शहरामध्ये बेपत्ता होण्याच्या नोंदी शहर पोलीस स्थानकात होत आहेत. त्यामध्ये पुरूषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या १३ वर्षांत एकूण ८३७जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस स्थानकात असून, त्यांना शोधण्याची जबाबदारी पोलिसांनी यशस्वीरित्या पार पाडली. सन २०११मध्ये सर्वांत कमी ४७ जण बेपत्ता असल्याची नोंद आहे. सन २०१४मध्ये ९६जण बेपत्ता झाले होते. त्यामध्ये ९४जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. सर्वांत जास्त बेपत्ताच्या नोंदी २००३ ते २०१५ या कालावधीत आहेत. ३०३ पुरूष व २८० महिला असे मिळून एकूण ५८३ स्त्री-पुरूष बेपत्ता झाल्याची नोंद रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात करण्यात आली होती. त्यातील अजूनपर्यंत ५२१ जणांना शोधण्यात यश आले. शोध घेतलेल्यांमध्ये स्त्रिया २७१ असून, २८० पुरुषांचा समावेश आहे. बेपत्ता होण्याच्या नोंदीमध्ये स्त्री - पुरूषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०१४ मध्ये एकूण सर्वाधिक ९६ बेपत्ता नोंदी झाल्या. सर्वांत कमी बेपत्ता नोंदी २०११मध्ये आहेत. सध्या शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून, अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना वाममार्गाला लावण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. त्यामुळे अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यास सध्या अपहरणाचा गुन्हा पोलीस स्थानकात दाखल केला जातो. गेल्या १३ वर्षात शहरातील २५४ अल्पवयीन मुले - मुली बेपत्ता असल्याच्या नोंदी शहर पोलीस स्थानकात करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये १५१ मुलगे असून, १०३ मुलींचा सामावेश आहे. त्यातील २४४ मुला - मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये १४२ मुले व १०२ मुलींचा सामावेश आहे. तेरा वर्षात एकूण ८३७ जण बेपत्ता झाले होते. त्यातील ७७५ जणांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या तुलनेत पोलीस स्थानकात अपुरे संख्याबळ असल्याचे दिसत आहे.अपुरे पोलीसबळपोलीस स्थानकावर संपूर्ण शहर परिसराचा भार आहे. आता चालू वर्षात पोलीस स्थानकात २०० गुन्हे दाखल झाले असून, पोलीसबळ अद्याप ८८ इतकेच आहे. त्यामुळे शहर पोलीस स्थानकातील पोलिसांवर कामाचा अतिरिक्त भार पडत असल्याचे चित्र दिसत आहे.सनबेपत्ताशोध२००३६३५९२००४७१६५२००५५०४७२००६६४६३२००७७३६८२००८६६५८२००९८५६३२०१०६७६०२०११४७४५२०१२४९४५२०१३९६९४२०१४५०४६२०१५६६५६