शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

उड्डाणपुलाच्या दुर्घटनेबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

By संदीप बांद्रे | Updated: October 18, 2023 12:14 IST

सामाजिक कार्यकर्ते तानु आंबेकर यांनी गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणा अंतर्गत शहरातील बहादूरशेखनाका येथे नव्याने उभारण्यात येत असलेला उड्डाणपुल सोमवारी (दि.१६) दुपारी २.४५ वाजता कोसळला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी २३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यातच आता सामाजिक कार्यकर्ते तानु आंबेकर यांनी याबाबत थेट चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.या घटनेनंतर येथे जोरदार पडसाद उमटले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अभियंत्यांना हार घालून निषेध व्यक्त केला गेला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून रास्तारोको केला गेला. मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अद्याप कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार कोणीही केलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागाने देखील अद्याप याबाबत कोणतेही पाऊल उचललेले नाही. अशातच सामाजिक कार्यकर्ते तानु आंबेकर यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात या घटनेविषयी ऑनलाईन लेखी तक्रार मंगळवारी रात्री दिली आहे.  या तक्रारीत आंबेकर यांनी नमूद केले आहे की, उड्डाणपूल कोसळून मोठी वित्तहानी झाली आहे. या घटनेने मी या देशाचा नागरिक म्हणून व्यथित झालो आहे. या घटनेची गंभीरपणे दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे 27 एप्रिल 2017चे शासन परिपत्रक क्रं.संकिर्ण 2017/प्र.क्र.9/नियोजन -3 नुसार कारवाई करावी. या परिपत्रकामध्ये डांबरी रस्त्याचे आयुर्मान 15 वर्ष, काँक्रीट रस्त्याचे 30 वर्ष आणि पुलाचे 100 वर्षापर्यंत गृहीत धरून संकल्पन करण्यात यावे. काम खराब झाल्यास किंवा पूल पडल्यास त्याची सर्व जबाबदारी कंत्राटदार व संबंधित पर्यवेशकीय अधिकारी यांची राहील. त्या संबधाची विशेष अट निविदेत नमुद करून ही कारवाई दिवाणी आणि गुन्हेगारी स्वरूपाची राहील याची नोंद संबंधितांनी घेतलेचे प्रमाण पत्र जोडून कंत्राटदारांची सही घ्यावी असे नमुद आहे.या घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदार (नावं माहीत नाही), संबंधित मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी आणि ब्रिज डिझाईन इंजिनीयर (नांवे माहीत नाहीत) आणि यावरील सर्वोच्च लोक प्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम मंत्री जबाबदार आहेत. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. आय.पी.सी.कलम 440, कलम 120 क आणि ख फौजदारी पात्र कट, कलम 431 व 432 सार्वजनिक रस्ता पुल याची खराबी व नुकसान कारक व अडथळा निर्माण होईल अशी आगळीक करणे, कलम 166 कोणत्याही व्यक्तीला क्षती पोचविण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने कायद्याची अवज्ञा करणे, कलम 268 सार्वजनिक उपद्रव, कलम 420 निकृष्ठ बांधकाम करून फसवणूक, ठकवणूक करणे व आय.पी.सी. 34 दोन पेक्षा जास्त लोकांनी मिळून कृति करणे आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 102 व कलम 115 खाली गुन्हे दाखल करण्यात यावेत. सी.आर.पी.सी.133 व 152 प्रमाणे कृति वा अंमलबजावणी व्हावी. असेही आंबेकर यांनी नमूद केले आहे.

उड्डाण पुलाची दुर्घटना गंभीर स्वरूपाची असताना देखील शासकीय स्तरावर दखल घेतली जात नसेल तर ते गंभीर आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागानेच या विषयी पोलीस स्थानकात तक्रार द्यायला हवी होती. -  तानु आंबेकर, चिपळूण.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणPoliceपोलिस