शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

जिल्ह्याला सुखद धक्का; कोरोनामुक्तीचा मोठा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 14:58 IST

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत रोज मोठी भर पडत असल्याने वाढलेला तणाव आता ऑक्टोबरमध्ये खूप अंशी निवळला आहे. आता रुग्णसंख्या घटली असून, कोरोनामुक्तीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्ह्यातील लोकांनाही दिलासा मिळाला आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात ८,४१८ रुग्णांपैकी ७,७९८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. हे प्रमाण आता ९२.६३ टक्के इतके झाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याला सुखद धक्का; कोरोनामुक्तीचा मोठा टक्का ऑगस्टने नाचवले, सप्टेंबरने घालवले, ऑक्टोबरने वाचवले

मनोज मुळ्येरत्नागिरी : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत रोज मोठी भर पडत असल्याने वाढलेला तणाव आता ऑक्टोबरमध्ये खूप अंशी निवळला आहे. आता रुग्णसंख्या घटली असून, कोरोनामुक्तीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्ह्यातील लोकांनाही दिलासा मिळाला आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात ८,४१८ रुग्णांपैकी ७,७९८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. हे प्रमाण आता ९२.६३ टक्के इतके झाले आहे.अजूनही लस सापडलेली नसल्याने कोरोनावर नेमका इलाज सापडलेला नाही. मात्र, तरीही आरोग्य यंत्रणेकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमुळे कोरोनातून पूर्ण बरे झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण मात्र सातत्याने कायम राहिले आहे.मार्च महिन्यात जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळला. पहिल्या काही दिवसात जिल्ह्यात सहा रुग्ण आढळले. मात्र, हे रुग्ण लवकर बरेही झाले. त्यानंतर जवळपास १५ दिवस जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र त्यानंतर रुग्ण झपाट्याने सापडू लागले.

ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सवादरम्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. हा महिना आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे पहिले १८ दिवस या काळात रुग्ण वाढीचा वेग खूप मोठा होता. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पहिल्यापासून कायम आहे. आता रुग्णसंख्या घटल्याने कोरोनामुक्तांचा टक्का वाढला आहे.ऑगस्टमध्ये मुक्ती कमीचऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव काळात रुग्णसंख्या वाढण्याचा वेग खूप मोठा होता. त्यावेळी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्यपूर्ण होती. मात्र रुग्ण वाढल्यामुळे बरे होणाऱ्यांचे प्रमाण खूपच घटल्यासारखे दिसत होते. हे प्रमाण ६८.५ टक्के इतके कमी झाले होते. मात्र सप्टेंबरपासून ते वाढतच गेले आहे.तब्बल ३७४ कोरोनामुक्तसप्टेंबर महिन्याच्या १९ तारखेपासून रूग्ण घटले आणि कोरोनामुक्त वाढत गेले. २४ सप्टेंबरला कोरोनामुक्तीचे प्रमाण ७६.७६ टक्के इतके होते. मात्र २५ सप्टेंबरला एकाच दिवसात विक्रमी ३७४ रुग्ण बरे झाले. त्यामुळे कोरोनामुक्तांचे प्रमाण चार टक्क्यांनी वाढून ८०.७९ टक्के इतके झाले.दुसऱ्यांदा होऊ शकतोजे एकदा कोरोनामुक्त झाले आहेत, त्यांना नियमित काळजी घ्यावी लागणार आहे. अनेकांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यात कोरानाची लक्षणे अधिक तीव्र दिसून आली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी