शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला सुखद धक्का; कोरोनामुक्तीचा मोठा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 14:58 IST

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत रोज मोठी भर पडत असल्याने वाढलेला तणाव आता ऑक्टोबरमध्ये खूप अंशी निवळला आहे. आता रुग्णसंख्या घटली असून, कोरोनामुक्तीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्ह्यातील लोकांनाही दिलासा मिळाला आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात ८,४१८ रुग्णांपैकी ७,७९८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. हे प्रमाण आता ९२.६३ टक्के इतके झाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याला सुखद धक्का; कोरोनामुक्तीचा मोठा टक्का ऑगस्टने नाचवले, सप्टेंबरने घालवले, ऑक्टोबरने वाचवले

मनोज मुळ्येरत्नागिरी : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत रोज मोठी भर पडत असल्याने वाढलेला तणाव आता ऑक्टोबरमध्ये खूप अंशी निवळला आहे. आता रुग्णसंख्या घटली असून, कोरोनामुक्तीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्ह्यातील लोकांनाही दिलासा मिळाला आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात ८,४१८ रुग्णांपैकी ७,७९८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. हे प्रमाण आता ९२.६३ टक्के इतके झाले आहे.अजूनही लस सापडलेली नसल्याने कोरोनावर नेमका इलाज सापडलेला नाही. मात्र, तरीही आरोग्य यंत्रणेकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमुळे कोरोनातून पूर्ण बरे झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण मात्र सातत्याने कायम राहिले आहे.मार्च महिन्यात जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळला. पहिल्या काही दिवसात जिल्ह्यात सहा रुग्ण आढळले. मात्र, हे रुग्ण लवकर बरेही झाले. त्यानंतर जवळपास १५ दिवस जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र त्यानंतर रुग्ण झपाट्याने सापडू लागले.

ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सवादरम्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. हा महिना आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे पहिले १८ दिवस या काळात रुग्ण वाढीचा वेग खूप मोठा होता. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पहिल्यापासून कायम आहे. आता रुग्णसंख्या घटल्याने कोरोनामुक्तांचा टक्का वाढला आहे.ऑगस्टमध्ये मुक्ती कमीचऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव काळात रुग्णसंख्या वाढण्याचा वेग खूप मोठा होता. त्यावेळी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्यपूर्ण होती. मात्र रुग्ण वाढल्यामुळे बरे होणाऱ्यांचे प्रमाण खूपच घटल्यासारखे दिसत होते. हे प्रमाण ६८.५ टक्के इतके कमी झाले होते. मात्र सप्टेंबरपासून ते वाढतच गेले आहे.तब्बल ३७४ कोरोनामुक्तसप्टेंबर महिन्याच्या १९ तारखेपासून रूग्ण घटले आणि कोरोनामुक्त वाढत गेले. २४ सप्टेंबरला कोरोनामुक्तीचे प्रमाण ७६.७६ टक्के इतके होते. मात्र २५ सप्टेंबरला एकाच दिवसात विक्रमी ३७४ रुग्ण बरे झाले. त्यामुळे कोरोनामुक्तांचे प्रमाण चार टक्क्यांनी वाढून ८०.७९ टक्के इतके झाले.दुसऱ्यांदा होऊ शकतोजे एकदा कोरोनामुक्त झाले आहेत, त्यांना नियमित काळजी घ्यावी लागणार आहे. अनेकांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यात कोरानाची लक्षणे अधिक तीव्र दिसून आली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी