शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

संगीत राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र कोल्हापुरात हटविल्याने रत्नागिरीत नाट्यप्रेमींचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 16:58 IST

ज्या जिल्ह्यातील नाटक प्रथम तेथे पुढील वर्षीच्या स्पर्धांची प्राथमिक फेरी घेण्यात येते. यावर्षीच्या स्पर्धा रत्नागिरी केंद्रावर होणे अपेक्षित होते. परंतु रत्नागिरीचे केंद्र कोल्हापुरात हलविण्यात आले. त्यामुळे शासनाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध म्हणून येथील नाट्यप्रेमींनी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या पायऱ्यांवर ठाण मांडून आंदोलन केले.

ठळक मुद्देशासनाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या पायऱ्यांवर ठाण मांडून आंदोलन रत्नागिरीतील नाट्यरसिकांमधून नाराजी

रत्नागिरी : ज्या जिल्ह्यातील नाटक प्रथम तेथे पुढील वर्षीच्या स्पर्धांची प्राथमिक फेरी घेण्यात येते. गतवर्षीच्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत ‘राधाकृष्ण कलामंच’च्या नाटकाने प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यामुळे यावर्षीच्या स्पर्धा रत्नागिरी केंद्रावर होणे अपेक्षित होते. परंतु रत्नागिरीचे केंद्र कोल्हापुरात हलविण्यात आले आहे. त्यामुळे शासनाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध म्हणून येथील नाट्यप्रेमींनी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या पायऱ्यांवर ठाण मांडून आंदोलन केले.राज्य कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी संगीत राज्य नाट्य स्पर्धा घेण्यात येते. गतवर्षी ही स्पर्धा सांगली येथे घेण्यात आली. त्यात रत्नागिरीच्या राधाकृष्ण कलामंचने प्रथम क्रमांक मिळवला होता.

प्रशासनाच्या नियमानुसार रत्नागिरी केंद्रावर संगीत नाट्य स्पर्धा होणे आवश्यक होते. मात्र, नियमाला फाटा देत प्रशासनाने स्पर्धा रत्नागिरीऐवजी कोल्हापुरात घेण्याची तयारी केल्याने रत्नागिरीतील नाट्यरसिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.

येथील रसिकांना संगीत नाटकांना मुकावे लागणार आहे, असे सांगण्यात आले. यावेळी मनोहर जोशी, समीर इंदुलकर, आसावरी शेट्ये, नंदू जुवेकर यांच्यासह अनेक रंगकर्मी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीentertainmentकरमणूक