शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

संगीत राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र कोल्हापुरात हटविल्याने रत्नागिरीत नाट्यप्रेमींचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 16:58 IST

ज्या जिल्ह्यातील नाटक प्रथम तेथे पुढील वर्षीच्या स्पर्धांची प्राथमिक फेरी घेण्यात येते. यावर्षीच्या स्पर्धा रत्नागिरी केंद्रावर होणे अपेक्षित होते. परंतु रत्नागिरीचे केंद्र कोल्हापुरात हलविण्यात आले. त्यामुळे शासनाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध म्हणून येथील नाट्यप्रेमींनी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या पायऱ्यांवर ठाण मांडून आंदोलन केले.

ठळक मुद्देशासनाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या पायऱ्यांवर ठाण मांडून आंदोलन रत्नागिरीतील नाट्यरसिकांमधून नाराजी

रत्नागिरी : ज्या जिल्ह्यातील नाटक प्रथम तेथे पुढील वर्षीच्या स्पर्धांची प्राथमिक फेरी घेण्यात येते. गतवर्षीच्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत ‘राधाकृष्ण कलामंच’च्या नाटकाने प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यामुळे यावर्षीच्या स्पर्धा रत्नागिरी केंद्रावर होणे अपेक्षित होते. परंतु रत्नागिरीचे केंद्र कोल्हापुरात हलविण्यात आले आहे. त्यामुळे शासनाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध म्हणून येथील नाट्यप्रेमींनी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या पायऱ्यांवर ठाण मांडून आंदोलन केले.राज्य कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी संगीत राज्य नाट्य स्पर्धा घेण्यात येते. गतवर्षी ही स्पर्धा सांगली येथे घेण्यात आली. त्यात रत्नागिरीच्या राधाकृष्ण कलामंचने प्रथम क्रमांक मिळवला होता.

प्रशासनाच्या नियमानुसार रत्नागिरी केंद्रावर संगीत नाट्य स्पर्धा होणे आवश्यक होते. मात्र, नियमाला फाटा देत प्रशासनाने स्पर्धा रत्नागिरीऐवजी कोल्हापुरात घेण्याची तयारी केल्याने रत्नागिरीतील नाट्यरसिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.

येथील रसिकांना संगीत नाटकांना मुकावे लागणार आहे, असे सांगण्यात आले. यावेळी मनोहर जोशी, समीर इंदुलकर, आसावरी शेट्ये, नंदू जुवेकर यांच्यासह अनेक रंगकर्मी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीentertainmentकरमणूक