शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाख वृक्षांची लागवड

By admin | Updated: June 22, 2017 00:33 IST

रत्नागिरीतील उपक्रम : गत वृक्षलागवडीचा त्रैमासिक आढावा, ८0 टक्के यश

मेहरून नाकाडे । लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जागतिक तापमानातील वाढ, हवामान ऋतूबदल यामुळे होणारी दाहकता व तीव्रता कमी करण्यासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यावर्षी राज्यात ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प असताना रत्नागिरीत तीन लाखापेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्यात येणार असून, १ ते ७ जुलैअखेर लागवड महोत्सव राबविण्यात येणार आहे. गतवर्षी जिल्ह्यात २ लाख ४ हजार ९७५ वृक्ष लागवड करण्यात आली होती. लागवडीपासून सातत्याने त्रैमासिक आढावा घेण्यात येत आहे. आतापर्यंत ८० टक्के झाडे जिवंत आहेत. हरित सेना महाराष्ट्रतर्फे प्रत्येक नागरिकाला वन व वन्य जीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबरोबर लोकसहभागातून वन व वन्य जीव संवर्धन व संरक्षण प्रभावीपणे करण्यात यावे, यासाठी वृक्ष लागवड कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला वैयक्तिक व सामूहिक स्वरूपात हरित सेना सदस्यत्व नोंदणी ६६६.ॅ१ीील्लं१े८.ेंाँंङ्म१ी२३.ॅङ्म५.्रल्ल संकेतस्थळावर करता येणार आहे. वृक्ष लागवडीची माहिती आॅनलाईन सादर करायची आहे. हरित सेना सदस्यत्व नोंदणीनंतर वृक्ष लागवडीपूर्वी व लागवडीनंतरची सर्व माहिती सादर करता येणार आहे. महाराष्ट्र शासनाने २०१७ ते २०१९ पर्यत तीन वर्षांच्या कालावधीत वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. सन २०१७मध्ये ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात आली होती. यावर्षी २०१८मध्ये १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून, पुढील वर्षी २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे तीन वर्षात एकूण ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्यासाठी करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात वन व सामाजिक वनीकरण विभागातर्फे ३३४८७, इतर विभागातर्फे ४००२०, ग्रामपंचायतस्तरावर १,६९००० मिळून सध्या २ लाख ४२ हजार ५०७ रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असले तरी विविध शासकीय विभाग तसेच लोकसहभाग वाढत असल्यामुळे उद्दिष्टापेक्षा अधिक लागवड होण्याची शक्यता असून, तीन लाखापेक्षा अधिक वृक्ष लागवड होण्याची शक्यता जिल्हा वन अधिकारी विकास जगताप यांनी व्यक्त केली. वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी वन व सामाजिक विभागातर्फे प्रत्येक तालुक्यात विविध योजनांतून रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. एकूण २१ रोपवाटिका असून, ७ लाख ५ हजार ३७३ रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. रोपे आपल्या दारी : सवलतीच्या दरात रोपांची उपलब्धता सामाजिक वनीकरण विभागाच्या कळंबणी (खेड), पिंपळी (चिपळूण), झोंबडी-गिमवी (गुहागर), पूर, ताम्हाणे (संगमेश्वर), खानू (रत्नागिरी), गवाणे (लांजा), केळवडे (राजापूर), दहागाव (मंडणगड), कॅम्प दापोली नारगोली, टाळसुरे (दापोली) येथील रोपवाटिकांमध्ये शासकीय सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध होणार आहेत. याशिवाय चिपळूण वन विभागाच्या अंतर्गत खेरवसे, भांबेड (लांजा), पिंपळी (चिपळूण), निगुंडळ (गुहागर), दापोली, म्हाळुंगे (दापोली) येथील रोपवाटिकेत रोपे उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी ‘रोपे आपल्या दारी’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातही ‘रोपे आपल्या दारी’ योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील लोकांना घराच्या परिसरामध्ये लागवडीकरिता रोपे सुलभतेने प्राप्त होतील, यासाठी २५ जूनपासून स्टॉल लावण्यात येणार आहेत. खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा येथे स्टॉल असून, त्याठिकाणी साग, जांभूळ, आवळा, सुरू तसेच शोभिवंत झाडांच्या रोपांचा पुरवठा वनमहोत्सव कालावधीत सवलतीच्या दरात केला जाणार आहे. वन महोत्सवाचा प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. लोकसहभाग मिळविण्यासाठी १ मे पासून चंद्रपूर येथून चित्ररथाला प्रारंभ झाला आहे. दि. २० जून रोजी रत्नागिरीत येणारा चित्ररथ २२ जूनपर्यंत जिल्ह्यात जनजागृतीसाठी फिरणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे रवाना होणार आहे. बांदा येथे चित्ररथाची सांगता होणार आहे. याशिवाय ग्रामसभा, वृक्षदिंडी, पथनाट्यांच्या माध्यमातूनही जनजागृती केली जाणार आहे.