शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

जपानी तंत्राने गणपतीपुळेत लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथील चंद्रकांत विठ्ठल रानडे पारंपरिक पध्दतीने शेती करीत असताना प्रयोगशील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथील चंद्रकांत विठ्ठल रानडे पारंपरिक पध्दतीने शेती करीत असताना प्रयोगशील वृत्तीमुळे सतत नवनवीन प्रयोग करीत आहेत. सेंद्रिय पध्दतीने लागवडीबरोबर कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न मिळविण्याचा त्यांचा ध्यास आहे. त्यासाठी त्यांना कृषी विभागाचेही मार्गदर्शन लाभत आहे.

एक हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली असून त्यासाठी जपानी तंत्राचा अवलंब केला आहे. सहा इंचाची आडवी रेेषा तर एक फुटाचे उभ्या रेषेचे अंतर ठेवून लागवड केली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाताला चांगले फुटवे आले आहेत. वाढ चांगली झाली असून, उत्पादनही चांगले होईल, असा त्यांचा अंदाज आहे. लागवडीच्या रेषेतील अंतरामुळे उगवलेले तण नियंत्रणासाठी स्वत: कोळपणी यंत्र तयार केले आहे. कोळवणीवेळी रोपांची मुळे हलतात, वाढ जोमदार होते. दरवर्षी तीन ते साडेतीन हजार किलो भात उत्पादन लाभते. यावर्षी उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

रासायनिक व सेंद्रिय शेतीचे प्रयोग

एक हेक्टर क्षेत्रावर जपानी पध्दतीने भात लागवड केली असून त्यासाठी मर्यादित खतांचा वापर करीत आहेत. दीड गुंठे क्षेत्रावर मात्र शंभर टक्के सेंद्रिय पध्दतीने भात लागवड केली आहे. दोन्ही पध्दतीने लागवड केलेली शेती उत्तम असून, भाताचे फुटवे येण्याच्या तयारीत आहेत. कोणत्या क्षेत्रातून किती उत्पन्न लाभते यावर पुढील कल असणार आहे. भाताबरोबर आले, हळद लागवडही सेंद्रिय पध्दतीने केली आहे. भातानंतर भाजीपाला, कुळीथ, वाल, उडीद, मिरची, उन्हाळी भात लागवड करत असून अजित व अतुल या दोन्ही मुलांचे सहकार्य लाभत आहे.

उन्हाळी भात

उन्हाळी शेतीत भात लागवड करीत असून कमी दिवसांचे वाण लागवड केले जाते. यावर्षी १२० दिवसांचे ‘मधुमती’ वाण लागवड करण्यात येणार आहे. चांगले उत्पन्न देणारे शिवाय बासमतीप्रमाणे भाताला सुगंध आहे. मोदक पीठ तसेच मऊ भातासाठी याचा वापर सर्वाधिक केला जात असल्याने यावर्षी याच वाणाच्या लागवडीचा निर्णय घेतला आहे.

बाणवलीची रोपे

नारळ बागायती असून, स्वत: बाणवलीच्या चांगल्या फळापासून रोपे तयार करीत आहेत. त्यांच्याकडील रोपे चांगल्या दर्जाची आहेत. त्यामुळे लागवडीनंतर चार ते पाच वर्षात फळे येत असल्याने त्यांच्याकडील रोपांना विशेष मागणी आहे. खाडीचे पाणी भरणाऱ्या क्षेत्रात नारळ लागवड केली आहे. उत्तम नियोजनामुळे उत्पन्न सुरू झाले आहे.

आंबा उत्पादन

आंबा लागवड असून वर्षाला १५० ते २०० पेट्या आंबा विक्री करतात. आंब्यासाठीही कमीत कमी रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर केला जात आहे. बागेत दोन गांडूळ खत युनिट तयार केली असून गांडूळ खत व शेणखताचा वापर सर्वाधिक करून सेंद्रिय शेतीवर भर असल्याने दर्जा व उत्पन्न चांगले आहे.