शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

जपानी तंत्राने गणपतीपुळेत लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथील चंद्रकांत विठ्ठल रानडे पारंपरिक पध्दतीने शेती करीत असताना प्रयोगशील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथील चंद्रकांत विठ्ठल रानडे पारंपरिक पध्दतीने शेती करीत असताना प्रयोगशील वृत्तीमुळे सतत नवनवीन प्रयोग करीत आहेत. सेंद्रिय पध्दतीने लागवडीबरोबर कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न मिळविण्याचा त्यांचा ध्यास आहे. त्यासाठी त्यांना कृषी विभागाचेही मार्गदर्शन लाभत आहे.

एक हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली असून त्यासाठी जपानी तंत्राचा अवलंब केला आहे. सहा इंचाची आडवी रेेषा तर एक फुटाचे उभ्या रेषेचे अंतर ठेवून लागवड केली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाताला चांगले फुटवे आले आहेत. वाढ चांगली झाली असून, उत्पादनही चांगले होईल, असा त्यांचा अंदाज आहे. लागवडीच्या रेषेतील अंतरामुळे उगवलेले तण नियंत्रणासाठी स्वत: कोळपणी यंत्र तयार केले आहे. कोळवणीवेळी रोपांची मुळे हलतात, वाढ जोमदार होते. दरवर्षी तीन ते साडेतीन हजार किलो भात उत्पादन लाभते. यावर्षी उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

रासायनिक व सेंद्रिय शेतीचे प्रयोग

एक हेक्टर क्षेत्रावर जपानी पध्दतीने भात लागवड केली असून त्यासाठी मर्यादित खतांचा वापर करीत आहेत. दीड गुंठे क्षेत्रावर मात्र शंभर टक्के सेंद्रिय पध्दतीने भात लागवड केली आहे. दोन्ही पध्दतीने लागवड केलेली शेती उत्तम असून, भाताचे फुटवे येण्याच्या तयारीत आहेत. कोणत्या क्षेत्रातून किती उत्पन्न लाभते यावर पुढील कल असणार आहे. भाताबरोबर आले, हळद लागवडही सेंद्रिय पध्दतीने केली आहे. भातानंतर भाजीपाला, कुळीथ, वाल, उडीद, मिरची, उन्हाळी भात लागवड करत असून अजित व अतुल या दोन्ही मुलांचे सहकार्य लाभत आहे.

उन्हाळी भात

उन्हाळी शेतीत भात लागवड करीत असून कमी दिवसांचे वाण लागवड केले जाते. यावर्षी १२० दिवसांचे ‘मधुमती’ वाण लागवड करण्यात येणार आहे. चांगले उत्पन्न देणारे शिवाय बासमतीप्रमाणे भाताला सुगंध आहे. मोदक पीठ तसेच मऊ भातासाठी याचा वापर सर्वाधिक केला जात असल्याने यावर्षी याच वाणाच्या लागवडीचा निर्णय घेतला आहे.

बाणवलीची रोपे

नारळ बागायती असून, स्वत: बाणवलीच्या चांगल्या फळापासून रोपे तयार करीत आहेत. त्यांच्याकडील रोपे चांगल्या दर्जाची आहेत. त्यामुळे लागवडीनंतर चार ते पाच वर्षात फळे येत असल्याने त्यांच्याकडील रोपांना विशेष मागणी आहे. खाडीचे पाणी भरणाऱ्या क्षेत्रात नारळ लागवड केली आहे. उत्तम नियोजनामुळे उत्पन्न सुरू झाले आहे.

आंबा उत्पादन

आंबा लागवड असून वर्षाला १५० ते २०० पेट्या आंबा विक्री करतात. आंब्यासाठीही कमीत कमी रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर केला जात आहे. बागेत दोन गांडूळ खत युनिट तयार केली असून गांडूळ खत व शेणखताचा वापर सर्वाधिक करून सेंद्रिय शेतीवर भर असल्याने दर्जा व उत्पन्न चांगले आहे.