शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

जपानी तंत्राने गणपतीपुळेत लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथील चंद्रकांत विठ्ठल रानडे पारंपरिक पध्दतीने शेती करीत असताना प्रयोगशील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथील चंद्रकांत विठ्ठल रानडे पारंपरिक पध्दतीने शेती करीत असताना प्रयोगशील वृत्तीमुळे सतत नवनवीन प्रयोग करीत आहेत. सेंद्रिय पध्दतीने लागवडीबरोबर कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न मिळविण्याचा त्यांचा ध्यास आहे. त्यासाठी त्यांना कृषी विभागाचेही मार्गदर्शन लाभत आहे.

एक हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली असून त्यासाठी जपानी तंत्राचा अवलंब केला आहे. सहा इंचाची आडवी रेेषा तर एक फुटाचे उभ्या रेषेचे अंतर ठेवून लागवड केली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाताला चांगले फुटवे आले आहेत. वाढ चांगली झाली असून, उत्पादनही चांगले होईल, असा त्यांचा अंदाज आहे. लागवडीच्या रेषेतील अंतरामुळे उगवलेले तण नियंत्रणासाठी स्वत: कोळपणी यंत्र तयार केले आहे. कोळवणीवेळी रोपांची मुळे हलतात, वाढ जोमदार होते. दरवर्षी तीन ते साडेतीन हजार किलो भात उत्पादन लाभते. यावर्षी उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

रासायनिक व सेंद्रिय शेतीचे प्रयोग

एक हेक्टर क्षेत्रावर जपानी पध्दतीने भात लागवड केली असून त्यासाठी मर्यादित खतांचा वापर करीत आहेत. दीड गुंठे क्षेत्रावर मात्र शंभर टक्के सेंद्रिय पध्दतीने भात लागवड केली आहे. दोन्ही पध्दतीने लागवड केलेली शेती उत्तम असून, भाताचे फुटवे येण्याच्या तयारीत आहेत. कोणत्या क्षेत्रातून किती उत्पन्न लाभते यावर पुढील कल असणार आहे. भाताबरोबर आले, हळद लागवडही सेंद्रिय पध्दतीने केली आहे. भातानंतर भाजीपाला, कुळीथ, वाल, उडीद, मिरची, उन्हाळी भात लागवड करत असून अजित व अतुल या दोन्ही मुलांचे सहकार्य लाभत आहे.

उन्हाळी भात

उन्हाळी शेतीत भात लागवड करीत असून कमी दिवसांचे वाण लागवड केले जाते. यावर्षी १२० दिवसांचे ‘मधुमती’ वाण लागवड करण्यात येणार आहे. चांगले उत्पन्न देणारे शिवाय बासमतीप्रमाणे भाताला सुगंध आहे. मोदक पीठ तसेच मऊ भातासाठी याचा वापर सर्वाधिक केला जात असल्याने यावर्षी याच वाणाच्या लागवडीचा निर्णय घेतला आहे.

बाणवलीची रोपे

नारळ बागायती असून, स्वत: बाणवलीच्या चांगल्या फळापासून रोपे तयार करीत आहेत. त्यांच्याकडील रोपे चांगल्या दर्जाची आहेत. त्यामुळे लागवडीनंतर चार ते पाच वर्षात फळे येत असल्याने त्यांच्याकडील रोपांना विशेष मागणी आहे. खाडीचे पाणी भरणाऱ्या क्षेत्रात नारळ लागवड केली आहे. उत्तम नियोजनामुळे उत्पन्न सुरू झाले आहे.

आंबा उत्पादन

आंबा लागवड असून वर्षाला १५० ते २०० पेट्या आंबा विक्री करतात. आंब्यासाठीही कमीत कमी रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर केला जात आहे. बागेत दोन गांडूळ खत युनिट तयार केली असून गांडूळ खत व शेणखताचा वापर सर्वाधिक करून सेंद्रिय शेतीवर भर असल्याने दर्जा व उत्पन्न चांगले आहे.