शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

दाखल्यांचा ढीगच्या ढीग

By admin | Updated: August 26, 2015 23:17 IST

तहसील कार्यालय : रत्नागिरीत पालकांची धावपळ

रत्नागिरी : सध्या तहसील कार्यालयात उत्पन्नाच्या दाखल्यांचे ढिगारे सहीसाठी साचू लागले आहेत. हे दाखले वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामात अडचणी येत आहेत. कागदपत्रे पूर्ण देऊनही केवळ सह्यांसाठी पालकांना महिने - दोन महिने खेटे मारावे लागत आहेत.दाखल्यांसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी उत्पन्नाचे दाखल्यांसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी करण्याबाबत नायब तहसीलदारांना ही जबाबदारी दिली आहे. यासाठी या नायब तहसीलदारांना ठराविक वार आणि महा ई-सेवा केंद्रे ठरवून देण्यात आली आहेत. येथील संजय गांधी योजना विभाग, निवडणूक शाखा, महसूल विभाग, पुरवठा विभाग यांचे नायब तहसीलदार तसेच निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, काही नायब तहसीलदार वगळता इतरांकडून या दाखल्यांची तपासणी वेळेवर होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. येथील तहसीलदार कार्यालयात या कागदपत्रांचा ढिगारा पडला आहे. पावतीवरील तारीख उलटून महिना झाला, तरीही उत्पन्नाचा दाखला मिळत नसल्याने पालकवर्गाला हेलपाटे मारावे लागत आहेत. उत्पन्नाच्या दाखल्याअभावी शैक्षणिक कामे अडून राहिली आहेत.शाळांनी उत्पन्नाचे दाखले सक्तीचे केल्याने या दाखल्यांसाठी पालकांची धावपळ होत आहे. मात्र, उत्पन्नाचे दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी नेमण्यात आलेले अधिकारी त्यासाठी दोन-दोन दिवस लावत असल्याने दाखल्यांना विलंब होत असल्याचे दिसत आहे.नागरिकांना आपल्या कागदपत्रांची शोधाशोध करून ती काढून घ्यावी लागत आहेत. काही वेळा नागरिकांची गैरसोय नको, म्हणून सहकार्याच्या भावनेने काही नायब तहसीलदार वार नसतानाही सह्या करून देत आहेत. निवासी नायब तहसिलदारांकडील दाखले वेळेवर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे. याप्रकरणी तहसीलदार हेमंत साळवी यांनी लक्ष घालून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)1अनेक शासकीय कार्यालये संगणकीकृत असूनही आता कामात उशीर होेत आहे.2पूर्वी गाव पातळीवर उत्पन्नाचे दाखले वेळेवर मिळत होते. आता तेही उशिराने मिळत आहेत.3उत्पन्नाचे दाखले बंधनकारक केल्याने ते मिळवताना विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.