शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

दाखल्यांचा ढीगच्या ढीग

By admin | Updated: August 26, 2015 23:17 IST

तहसील कार्यालय : रत्नागिरीत पालकांची धावपळ

रत्नागिरी : सध्या तहसील कार्यालयात उत्पन्नाच्या दाखल्यांचे ढिगारे सहीसाठी साचू लागले आहेत. हे दाखले वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामात अडचणी येत आहेत. कागदपत्रे पूर्ण देऊनही केवळ सह्यांसाठी पालकांना महिने - दोन महिने खेटे मारावे लागत आहेत.दाखल्यांसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी उत्पन्नाचे दाखल्यांसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी करण्याबाबत नायब तहसीलदारांना ही जबाबदारी दिली आहे. यासाठी या नायब तहसीलदारांना ठराविक वार आणि महा ई-सेवा केंद्रे ठरवून देण्यात आली आहेत. येथील संजय गांधी योजना विभाग, निवडणूक शाखा, महसूल विभाग, पुरवठा विभाग यांचे नायब तहसीलदार तसेच निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, काही नायब तहसीलदार वगळता इतरांकडून या दाखल्यांची तपासणी वेळेवर होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. येथील तहसीलदार कार्यालयात या कागदपत्रांचा ढिगारा पडला आहे. पावतीवरील तारीख उलटून महिना झाला, तरीही उत्पन्नाचा दाखला मिळत नसल्याने पालकवर्गाला हेलपाटे मारावे लागत आहेत. उत्पन्नाच्या दाखल्याअभावी शैक्षणिक कामे अडून राहिली आहेत.शाळांनी उत्पन्नाचे दाखले सक्तीचे केल्याने या दाखल्यांसाठी पालकांची धावपळ होत आहे. मात्र, उत्पन्नाचे दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी नेमण्यात आलेले अधिकारी त्यासाठी दोन-दोन दिवस लावत असल्याने दाखल्यांना विलंब होत असल्याचे दिसत आहे.नागरिकांना आपल्या कागदपत्रांची शोधाशोध करून ती काढून घ्यावी लागत आहेत. काही वेळा नागरिकांची गैरसोय नको, म्हणून सहकार्याच्या भावनेने काही नायब तहसीलदार वार नसतानाही सह्या करून देत आहेत. निवासी नायब तहसिलदारांकडील दाखले वेळेवर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे. याप्रकरणी तहसीलदार हेमंत साळवी यांनी लक्ष घालून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)1अनेक शासकीय कार्यालये संगणकीकृत असूनही आता कामात उशीर होेत आहे.2पूर्वी गाव पातळीवर उत्पन्नाचे दाखले वेळेवर मिळत होते. आता तेही उशिराने मिळत आहेत.3उत्पन्नाचे दाखले बंधनकारक केल्याने ते मिळवताना विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.