शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

दाखल्यांचा ढीगच्या ढीग

By admin | Updated: August 26, 2015 23:17 IST

तहसील कार्यालय : रत्नागिरीत पालकांची धावपळ

रत्नागिरी : सध्या तहसील कार्यालयात उत्पन्नाच्या दाखल्यांचे ढिगारे सहीसाठी साचू लागले आहेत. हे दाखले वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामात अडचणी येत आहेत. कागदपत्रे पूर्ण देऊनही केवळ सह्यांसाठी पालकांना महिने - दोन महिने खेटे मारावे लागत आहेत.दाखल्यांसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी उत्पन्नाचे दाखल्यांसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी करण्याबाबत नायब तहसीलदारांना ही जबाबदारी दिली आहे. यासाठी या नायब तहसीलदारांना ठराविक वार आणि महा ई-सेवा केंद्रे ठरवून देण्यात आली आहेत. येथील संजय गांधी योजना विभाग, निवडणूक शाखा, महसूल विभाग, पुरवठा विभाग यांचे नायब तहसीलदार तसेच निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, काही नायब तहसीलदार वगळता इतरांकडून या दाखल्यांची तपासणी वेळेवर होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. येथील तहसीलदार कार्यालयात या कागदपत्रांचा ढिगारा पडला आहे. पावतीवरील तारीख उलटून महिना झाला, तरीही उत्पन्नाचा दाखला मिळत नसल्याने पालकवर्गाला हेलपाटे मारावे लागत आहेत. उत्पन्नाच्या दाखल्याअभावी शैक्षणिक कामे अडून राहिली आहेत.शाळांनी उत्पन्नाचे दाखले सक्तीचे केल्याने या दाखल्यांसाठी पालकांची धावपळ होत आहे. मात्र, उत्पन्नाचे दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी नेमण्यात आलेले अधिकारी त्यासाठी दोन-दोन दिवस लावत असल्याने दाखल्यांना विलंब होत असल्याचे दिसत आहे.नागरिकांना आपल्या कागदपत्रांची शोधाशोध करून ती काढून घ्यावी लागत आहेत. काही वेळा नागरिकांची गैरसोय नको, म्हणून सहकार्याच्या भावनेने काही नायब तहसीलदार वार नसतानाही सह्या करून देत आहेत. निवासी नायब तहसिलदारांकडील दाखले वेळेवर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे. याप्रकरणी तहसीलदार हेमंत साळवी यांनी लक्ष घालून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)1अनेक शासकीय कार्यालये संगणकीकृत असूनही आता कामात उशीर होेत आहे.2पूर्वी गाव पातळीवर उत्पन्नाचे दाखले वेळेवर मिळत होते. आता तेही उशिराने मिळत आहेत.3उत्पन्नाचे दाखले बंधनकारक केल्याने ते मिळवताना विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.