शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

पाळीव जनावरांची तस्करी करणारे रॅकेट पकडले

By admin | Updated: December 15, 2015 00:53 IST

दोघांना अटक; तिघे फरार : कोयनानगर येथे कारवाई

कोयनानगर : चिपळूणहून कऱ्हाडकडे कत्तलखाण्याच्या उद्देशाने पाळीव जनावरांची तस्करी करणारे रॅकेट कोयनानगर येथे रविवार रात्री मनसे कार्यकर्त्यांनी पुन्हा पकडून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी कोयना पोलिसांनी तस्करी करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा नोंद केला असून त्यातील दोघांना अटक करण्यात आली असून तिघे फरार झाले आहेत. दरम्यान, तस्करी केलेल्या पाळीव जनावरांना कराड करवडी येथील कृष्णा गोपालन संस्थेमध्ये सोडले आहे.़ याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवार, दि़ १३ रोजी रात्री दहा वाजता चिपळूणकडून कऱ्हाडकडे जाणारा ट्रक (एमएच०८ एच००६९) हा वेगाने निघाला असल्याचा संशय मनसेचे विभाग अध्यक्ष दयानंद नलवडे यांना आला असता त्यांनी दास्तन येथील टोलनाक्याजवळ ट्रक अडवून चौकशी केली असता या ट्रकमध्ये १६ बैल आढळून आले़ त्यांनी तातडीने हा ट्रक कोयना पोलिसांच्या ताब्यात दिला. गत सप्ताहात याच ठिकाणी पाळीव जनावरांची तस्करी करणारे तीन टेम्पो पकडून पोलिसांच्या ताब्यात देऊनही पाळीव जनावरांची तस्करी थांबली नसल्यामुळे या प्रकरणाला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप मनसे विभाग अध्यक्ष दयानंद नलवडे यांनी केला़ ही घटना समजताच विविध संघटनानंी कोयनानगर पोलीस ठाण्यात गर्दी केल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता़ याप्रकरणी इमरान खेरटकर (वय २५), समसुद्दीन इस्माल खेरटकर (वय ३२, दोघेही रा़ रा़ खिर्डी, ता़ चिपळूण) यांना अटक करण्यात आली असून महम्मद बेलेकर, ट्रकमालक हुसेन खेरटकर व फारूक (पोलिसांना संपूर्ण नाव समजू शकले नाही.) हे फरार आहेत़ या सर्वांवर प्राणी अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. हवालदार दत्तात्रय डिसले तपास करत आहे़ (वार्ताहर)