शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

पर्ससीन नेट मासेमारी बंद, किनाऱ्यावरील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प; खलाशांवर बेकारीची कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 14:23 IST

नौकामालक चिंताग्रस्त झाले असून त्यांच्यासमोर कर्जाचे हप्ते, व्यापाऱ्यांकडून काढलेली लाखोंची उसनवारी कशी भरणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

रत्नागिरी : चार महिन्याच्या मासेमारीनंतर पर्ससीन नेट मासेमारी शासनाच्या आदेशाप्रमाणे १ जानेवारीपासून बंद झाली आहे. यामुळे सुमारे नऊ हजार खलाशांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यातच या व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकही आर्थिक संकटात सापडले आहेत. पर्ससीन नेट मासेमारी बंद झाल्याने जिल्ह्याच्या एकूणच अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे.जिल्ह्यात २८८ पर्ससीन नेट नौका असून, त्यावर सुमारे नऊ हजार खलाशी काम करतात. शासन निर्णयानुसार मासेमारी हंगाम सुरू झाल्यापासून पर्ससीन नेट मासेमारीला ३१ डिसेंबरपर्यंतच मासेमारी करता येते. त्यानंतर बंदी कालावधीमुळे या नौका किनारपट्टीला नांगरावर ठेवाव्या लागतात. त्याप्रमाणे प्रशासनाकडून कारवाई टाळण्यासाठी बहुतांश नौका किनाऱ्यावर ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नौकांवर काम करणाऱ्या खलाशांना काहीही काम राहिलेले नसल्याने ते बेरोजगार होऊन माघारी परतले आहेत. तर नौकामालक चिंताग्रस्त झाले असून त्यांच्यासमोर कर्जाचे हप्ते, व्यापाऱ्यांकडून काढलेली लाखोंची उसनवारी कशी भरणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

इतर व्यवसायांवर परिणामपर्ससीन नेट मासेमारीमुळे बंदरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरु असते. मात्र, ही मासेमारी करण्यास १ जानेवारीपासून बंदी घालण्यात आलेली असल्याने याच्याशी निगडीत इतर व्यवसायही ठप्प झाले आहेत. त्यामध्ये मासे विक्रेत्या महिला, डिझेलची उचल थांबली, हॉटेल्स व्यवसाय, टेम्पो/रिक्षा व्यवसाय, बर्फ कारखाने, माशांची निर्यातवरही पर्ससीन नेट मासेमारी बंदचा दुष्परिणाम झालेला आहे.

परराज्यातील खलाशी माघारी

स्थानिक खलाशांची वानवा असल्याने पर्ससीननेट व इतर मासेमारी नौकांवर परराज्यातील खलाशांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे. सुमारे ९० टक्के खलाशी अन्य राज्यातील आहेत. तसेच सीमेपलीकडच्या नेपाळमधील खलाशी या नौकांवर काम करतात. कर्नाटक, आंध्रप्रदेश, ओडिसा, गुजरातमधील उमरगा तसेच अन्य राज्यातील खलाशांचा भरणा या नौकांवर असतो. अनेकदा हे खलाशी पळून जाण्याचे प्रकार सुरू असतात. त्यावेळी नौकामालकांना अडचणीचा सामना करावा लागतो.

जाळी विणकाम करणारे अडचणीतपर्ससीन नौकेवर सुमारे ३० ते ३५ खलाशी काम करतात. त्यांच्याशिवाय या नौकामालकांना जाळी विणकाम करणाऱ्या कामगारांवही नुकसानीच्या वेळी काम करावे लागते. अनेकदा मासेमारी करताना जाळी फाटतात. अशा वेळी सुमारे ५०० ते ७०० रुपये रोजंदारी देऊन जाळी दुरुस्ती करण्याचे काम केले जाते. हे काम जिल्ह्यातील शेकडो लोक करतात. पर्ससीन नेट मासेमारी बंदीमुळे त्यांच्या पोटावरही पाय आलेला आहे. त्यांचा कमाईचा मार्गच बंद झाल्याने ते आर्थिक अडचणीत आले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार