शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पर्ससीन नेट मासेमारी बंद, किनाऱ्यावरील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प; खलाशांवर बेकारीची कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 14:23 IST

नौकामालक चिंताग्रस्त झाले असून त्यांच्यासमोर कर्जाचे हप्ते, व्यापाऱ्यांकडून काढलेली लाखोंची उसनवारी कशी भरणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

रत्नागिरी : चार महिन्याच्या मासेमारीनंतर पर्ससीन नेट मासेमारी शासनाच्या आदेशाप्रमाणे १ जानेवारीपासून बंद झाली आहे. यामुळे सुमारे नऊ हजार खलाशांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यातच या व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकही आर्थिक संकटात सापडले आहेत. पर्ससीन नेट मासेमारी बंद झाल्याने जिल्ह्याच्या एकूणच अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे.जिल्ह्यात २८८ पर्ससीन नेट नौका असून, त्यावर सुमारे नऊ हजार खलाशी काम करतात. शासन निर्णयानुसार मासेमारी हंगाम सुरू झाल्यापासून पर्ससीन नेट मासेमारीला ३१ डिसेंबरपर्यंतच मासेमारी करता येते. त्यानंतर बंदी कालावधीमुळे या नौका किनारपट्टीला नांगरावर ठेवाव्या लागतात. त्याप्रमाणे प्रशासनाकडून कारवाई टाळण्यासाठी बहुतांश नौका किनाऱ्यावर ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नौकांवर काम करणाऱ्या खलाशांना काहीही काम राहिलेले नसल्याने ते बेरोजगार होऊन माघारी परतले आहेत. तर नौकामालक चिंताग्रस्त झाले असून त्यांच्यासमोर कर्जाचे हप्ते, व्यापाऱ्यांकडून काढलेली लाखोंची उसनवारी कशी भरणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

इतर व्यवसायांवर परिणामपर्ससीन नेट मासेमारीमुळे बंदरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरु असते. मात्र, ही मासेमारी करण्यास १ जानेवारीपासून बंदी घालण्यात आलेली असल्याने याच्याशी निगडीत इतर व्यवसायही ठप्प झाले आहेत. त्यामध्ये मासे विक्रेत्या महिला, डिझेलची उचल थांबली, हॉटेल्स व्यवसाय, टेम्पो/रिक्षा व्यवसाय, बर्फ कारखाने, माशांची निर्यातवरही पर्ससीन नेट मासेमारी बंदचा दुष्परिणाम झालेला आहे.

परराज्यातील खलाशी माघारी

स्थानिक खलाशांची वानवा असल्याने पर्ससीननेट व इतर मासेमारी नौकांवर परराज्यातील खलाशांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे. सुमारे ९० टक्के खलाशी अन्य राज्यातील आहेत. तसेच सीमेपलीकडच्या नेपाळमधील खलाशी या नौकांवर काम करतात. कर्नाटक, आंध्रप्रदेश, ओडिसा, गुजरातमधील उमरगा तसेच अन्य राज्यातील खलाशांचा भरणा या नौकांवर असतो. अनेकदा हे खलाशी पळून जाण्याचे प्रकार सुरू असतात. त्यावेळी नौकामालकांना अडचणीचा सामना करावा लागतो.

जाळी विणकाम करणारे अडचणीतपर्ससीन नौकेवर सुमारे ३० ते ३५ खलाशी काम करतात. त्यांच्याशिवाय या नौकामालकांना जाळी विणकाम करणाऱ्या कामगारांवही नुकसानीच्या वेळी काम करावे लागते. अनेकदा मासेमारी करताना जाळी फाटतात. अशा वेळी सुमारे ५०० ते ७०० रुपये रोजंदारी देऊन जाळी दुरुस्ती करण्याचे काम केले जाते. हे काम जिल्ह्यातील शेकडो लोक करतात. पर्ससीन नेट मासेमारी बंदीमुळे त्यांच्या पोटावरही पाय आलेला आहे. त्यांचा कमाईचा मार्गच बंद झाल्याने ते आर्थिक अडचणीत आले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार