शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत नागरिकांना मिळणार दिवसाआड पाणी, पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 11:10 IST

रत्नागिरी शहरासहीत परिसरातील ९ गावांमध्ये आता पाणीबाणी निर्माण झाली आहे. शीळ धरणात अवघा सोळा टक्के साठा उरल्याने रत्नागिरी शहरात बुधवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत नागरिकांना मिळणार एक दिवसाआड पाणी पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब

रत्नागिरी : रत्नागिरी शहरासहीत परिसरातील ९ गावांमध्ये आता पाणीबाणी निर्माण झाली आहे. शीळ धरणात अवघा सोळा टक्के साठा उरल्याने रत्नागिरी शहरात बुधवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.

 एमआयडिसीच्या धरणांमधील पाणी साठाच संपुष्टात आल्याने १३ जूनपासून दोन दिवसाआड केवळ ५० टक्के पाणी पुरविले जाणार आहे. त्यामुळे नगर परिषद क्षेत्र व ९ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील टंचाई स्थिती ही आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. पाऊस अधिक लांबल्यास परिस्थिती स्फोटक होण्याची भीती आहे.रत्नागिरी नगर परिषदेची नळपाणी योजना जुनाट झाली आहे. नवीन योजनेचे काम सुरू असून ते पूर्ण होण्यास अजून वर्षभराचा कालावधी जाणार आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे पानवल हे दुसरे धरण फेब्रुवारी महिन्यातच आटले आहे. शीळ धरणात केवळ १६ टक्के पाणी साठा आहे. पाऊस लांबण्याची शक्यता असल्याने हा साठा संपल्यास शहरातील पाणी पुरवठ्यावर त्याचा गंभीर परिणाम होणार आहे.त्यामुळेच शहरात १२ जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. शहराचे दोन विभाग करून प्रत्येक विभागाला एक दिवसाआड पाणी दिले जाणार आहे. निवखोल, राजिवडा, बेलबाग, गवळीवाडा, चवंडेवठार, घुडेवठार, मांडवी, संपूर्ण बाजारपेठ, वरची आळी, आठवडा बाजार, टिळक आळी, झाडगाव, मुरुगवाडा, खालची आळी, पेठकिल्ला, मिरकरवाडा, कीर्तीनगर, कोकणनगर फेज नं.४ या भागात १२ जून रोजी नळाला पाणी येणार आहे.रत्नागिरी शहराच्या दुसऱ्या विभागातील पोलीस लाईन, वरचा फगरवठार, तांबट आळी, राहुल कॉलनी, आंबेडकरवाडी, सन्मित्रनगर, माळनाका, एस.व्ही.रोड, मारूती मंदिर, हिंदू कॉलनी, थिबा पॅलेस, विश्वनगर, आनंदनगर, अभ्युदयनगर, नूतननगर, नरहर वसाहत, उद्यमनगर, शिवाजीनगर, साळवी स्टॉप, छत्रपतीनगर, सहकारनगर, विष्णूनगर, नवलाईनगर, चार रस्ता मजगाव रोड, स्टेट बॅँक कॉलनी, म्युन्सिपल कॉलनी, राजपूरकर मार्ग व एकता मार्ग या भागात १३ जून रोजी नळाला पाणी येणार आहे. 

पाण्याची टंचाई व संपत आलेला शीळ तसेच एमआयडिसीच्या धरणातील अत्यल्प साठा पाहता पाऊस लवकर आला नाही तर टंचाईने सर्वांचीच होरपळ होणार आहे.गृहसंकुल बांधकामांसाठी पाण्याचा वारेमाप वापररत्नागिरी शहरातील तसेच परिसरातील ९ ग्रामपंचायतींमधील नागरिक पाण्यासाठी टाहो फोडत असताना रत्नागिरी शहर तसेच परिसरातील गावांमध्ये काही ठिकाणी गृहसंकुलांच्या बांधकामांसाठी वारेमाप पाण्याचा वापर केला जात आहे. सामान्यांना विकतचा पाणी टॅँकर चार दिवसांनीही उपलब्ध होत नसताना या बांधकामांकरिता मात्र मोठ्या प्रमाणात पाणी मिळत आहे.

पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या जनतेची तहान महत्वाची की बांधकामांसाठी वारेमाप पाण्याचा वापर महत्वाचा असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पाणी टंचाई काळात बांधकामांना तात्पुरती स्थगिती का देण्यात आली नाही. तसे केल्यास निदान बांधकामासाठी वापरले जाणारे पाणी जनतेला मिळू शकेल व त्यांची तहान भागू शकेल, असे मत जनतेमधून व्यक्त केले जात आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRatnagiriरत्नागिरी