शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

रत्नागिरीत नागरिकांना मिळणार दिवसाआड पाणी, पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 11:10 IST

रत्नागिरी शहरासहीत परिसरातील ९ गावांमध्ये आता पाणीबाणी निर्माण झाली आहे. शीळ धरणात अवघा सोळा टक्के साठा उरल्याने रत्नागिरी शहरात बुधवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत नागरिकांना मिळणार एक दिवसाआड पाणी पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब

रत्नागिरी : रत्नागिरी शहरासहीत परिसरातील ९ गावांमध्ये आता पाणीबाणी निर्माण झाली आहे. शीळ धरणात अवघा सोळा टक्के साठा उरल्याने रत्नागिरी शहरात बुधवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.

 एमआयडिसीच्या धरणांमधील पाणी साठाच संपुष्टात आल्याने १३ जूनपासून दोन दिवसाआड केवळ ५० टक्के पाणी पुरविले जाणार आहे. त्यामुळे नगर परिषद क्षेत्र व ९ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील टंचाई स्थिती ही आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. पाऊस अधिक लांबल्यास परिस्थिती स्फोटक होण्याची भीती आहे.रत्नागिरी नगर परिषदेची नळपाणी योजना जुनाट झाली आहे. नवीन योजनेचे काम सुरू असून ते पूर्ण होण्यास अजून वर्षभराचा कालावधी जाणार आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे पानवल हे दुसरे धरण फेब्रुवारी महिन्यातच आटले आहे. शीळ धरणात केवळ १६ टक्के पाणी साठा आहे. पाऊस लांबण्याची शक्यता असल्याने हा साठा संपल्यास शहरातील पाणी पुरवठ्यावर त्याचा गंभीर परिणाम होणार आहे.त्यामुळेच शहरात १२ जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. शहराचे दोन विभाग करून प्रत्येक विभागाला एक दिवसाआड पाणी दिले जाणार आहे. निवखोल, राजिवडा, बेलबाग, गवळीवाडा, चवंडेवठार, घुडेवठार, मांडवी, संपूर्ण बाजारपेठ, वरची आळी, आठवडा बाजार, टिळक आळी, झाडगाव, मुरुगवाडा, खालची आळी, पेठकिल्ला, मिरकरवाडा, कीर्तीनगर, कोकणनगर फेज नं.४ या भागात १२ जून रोजी नळाला पाणी येणार आहे.रत्नागिरी शहराच्या दुसऱ्या विभागातील पोलीस लाईन, वरचा फगरवठार, तांबट आळी, राहुल कॉलनी, आंबेडकरवाडी, सन्मित्रनगर, माळनाका, एस.व्ही.रोड, मारूती मंदिर, हिंदू कॉलनी, थिबा पॅलेस, विश्वनगर, आनंदनगर, अभ्युदयनगर, नूतननगर, नरहर वसाहत, उद्यमनगर, शिवाजीनगर, साळवी स्टॉप, छत्रपतीनगर, सहकारनगर, विष्णूनगर, नवलाईनगर, चार रस्ता मजगाव रोड, स्टेट बॅँक कॉलनी, म्युन्सिपल कॉलनी, राजपूरकर मार्ग व एकता मार्ग या भागात १३ जून रोजी नळाला पाणी येणार आहे. 

पाण्याची टंचाई व संपत आलेला शीळ तसेच एमआयडिसीच्या धरणातील अत्यल्प साठा पाहता पाऊस लवकर आला नाही तर टंचाईने सर्वांचीच होरपळ होणार आहे.गृहसंकुल बांधकामांसाठी पाण्याचा वारेमाप वापररत्नागिरी शहरातील तसेच परिसरातील ९ ग्रामपंचायतींमधील नागरिक पाण्यासाठी टाहो फोडत असताना रत्नागिरी शहर तसेच परिसरातील गावांमध्ये काही ठिकाणी गृहसंकुलांच्या बांधकामांसाठी वारेमाप पाण्याचा वापर केला जात आहे. सामान्यांना विकतचा पाणी टॅँकर चार दिवसांनीही उपलब्ध होत नसताना या बांधकामांकरिता मात्र मोठ्या प्रमाणात पाणी मिळत आहे.

पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या जनतेची तहान महत्वाची की बांधकामांसाठी वारेमाप पाण्याचा वापर महत्वाचा असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पाणी टंचाई काळात बांधकामांना तात्पुरती स्थगिती का देण्यात आली नाही. तसे केल्यास निदान बांधकामासाठी वापरले जाणारे पाणी जनतेला मिळू शकेल व त्यांची तहान भागू शकेल, असे मत जनतेमधून व्यक्त केले जात आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRatnagiriरत्नागिरी