शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

कोकण रेल्वे मार्गावर ९७४ कर्मचाऱ्यांची गस्त, १० जूनपासून पावसाळी वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 15:37 IST

कोकण रेल्वे मार्गावर १० जूनपासून मान्सून वेळापत्रक लागू करण्यात आले असून १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी हे वेळापत्रक कार्यान्वित राहील. पावसाळयातील प्रवाशांंच्या सुरक्षितेसाठी कोकण रेल्वे सर्व त्या सुरक्षा उपायांसह सज्ज झाली आहे. या कालावधीत ९७४ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मार्गावर २४ तास गस्त राहणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे

ठळक मुद्देकोकण रेल्वे मार्गावर ९७४ कर्मचाऱ्यांची २४ तास गस्त, १० जूनपासून पावसाळी वेळापत्रकप्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी कोकण रेल्वे सज्ज

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १० जूनपासून मान्सून वेळापत्रक लागू करण्यात आले असून १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी हे वेळापत्रक कार्यान्वित राहील. पावसाळयातील प्रवाशांंच्या सुरक्षितेसाठी कोकण रेल्वे सर्व त्या सुरक्षा उपायांसह सज्ज झाली आहे. या कालावधीत ९७४ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मार्गावर २४ तास गस्त राहणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहेलॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तू आणि श्रमिकांच्या घरवापसीसाठी अहोरात्र मेहनत घेतलेल्या कोकण रेल्वेने याच कालावधीत आपली मान्सूनपूर्व सुरक्षा उपाययोजनांची कामेही पूर्ण केली आहेत. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या आपल्या ७४० किलोमीटरच्या पट्ट्यात मान्सून पूर्व कामांना काही दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती.

पावसात कोकण रेल्वे मार्गावर पाणी येऊ नये, यासाठी पाण्याचे मार्ग मोकळे करणे आणि मार्गानजीकच्या कटिंगची पाहणी करून धोकादायक वाटणारी कटिंग काढून टाकणे, याला प्राधान्य देण्यात आले. गेल्या काही वर्षात पावसाळापूर्व उपाययोजनांमुळे गेल्या सात वर्षात मार्गावर दरड व माती येण्याचे प्रकार खूप कमी झाले आहेत.धोकादायक कटिंग आहेत, अशा ठिकाणी विशेष उपाययोजना केल्या असून या ठिकाणी २४ तास कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत. अशा ठिकाणांवर रेल्वेचा वेगही नियंत्रित ठेवण्यात येणार आहे. आपत्कालीन स्थितीत तत्काळ मदत मिळावी यासाठी ठराविक अंतरांवर पोकलेन मशिन्स सारखी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.मुसळधार पावसाच्या काळात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्याची खबर देणारी यंत्रणा मार्गावर तीन पुलांवर ठिकाणी सुसज्ज आहे. पुराचे पाणी धोकादायक पातळीच्या वर आल्यास ही यंत्रणा सतर्क करते. माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडपी येथे पर्जन्यमापक यंत्रणा मार्गावरील ९ स्थानकांमध्ये सुसज्ज असून, अतिवृष्टी काळात ही यंत्रणा सूचना करेल.

मान्सूनच्या काळात बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव या तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष २४ तास रेल्वेच्या सुरक्षित वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी कार्यरत राहणार आहे. पावसाळयातील सुरक्षित प्रवासासाठी कोकण रेल्वे सर्व सुरक्षा उपायांसह सज्ज झाली आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी