शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

कोकण रेल्वे मार्गावर ९७४ कर्मचाऱ्यांची गस्त, १० जूनपासून पावसाळी वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 15:37 IST

कोकण रेल्वे मार्गावर १० जूनपासून मान्सून वेळापत्रक लागू करण्यात आले असून १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी हे वेळापत्रक कार्यान्वित राहील. पावसाळयातील प्रवाशांंच्या सुरक्षितेसाठी कोकण रेल्वे सर्व त्या सुरक्षा उपायांसह सज्ज झाली आहे. या कालावधीत ९७४ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मार्गावर २४ तास गस्त राहणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे

ठळक मुद्देकोकण रेल्वे मार्गावर ९७४ कर्मचाऱ्यांची २४ तास गस्त, १० जूनपासून पावसाळी वेळापत्रकप्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी कोकण रेल्वे सज्ज

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १० जूनपासून मान्सून वेळापत्रक लागू करण्यात आले असून १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी हे वेळापत्रक कार्यान्वित राहील. पावसाळयातील प्रवाशांंच्या सुरक्षितेसाठी कोकण रेल्वे सर्व त्या सुरक्षा उपायांसह सज्ज झाली आहे. या कालावधीत ९७४ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मार्गावर २४ तास गस्त राहणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहेलॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तू आणि श्रमिकांच्या घरवापसीसाठी अहोरात्र मेहनत घेतलेल्या कोकण रेल्वेने याच कालावधीत आपली मान्सूनपूर्व सुरक्षा उपाययोजनांची कामेही पूर्ण केली आहेत. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या आपल्या ७४० किलोमीटरच्या पट्ट्यात मान्सून पूर्व कामांना काही दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती.

पावसात कोकण रेल्वे मार्गावर पाणी येऊ नये, यासाठी पाण्याचे मार्ग मोकळे करणे आणि मार्गानजीकच्या कटिंगची पाहणी करून धोकादायक वाटणारी कटिंग काढून टाकणे, याला प्राधान्य देण्यात आले. गेल्या काही वर्षात पावसाळापूर्व उपाययोजनांमुळे गेल्या सात वर्षात मार्गावर दरड व माती येण्याचे प्रकार खूप कमी झाले आहेत.धोकादायक कटिंग आहेत, अशा ठिकाणी विशेष उपाययोजना केल्या असून या ठिकाणी २४ तास कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत. अशा ठिकाणांवर रेल्वेचा वेगही नियंत्रित ठेवण्यात येणार आहे. आपत्कालीन स्थितीत तत्काळ मदत मिळावी यासाठी ठराविक अंतरांवर पोकलेन मशिन्स सारखी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.मुसळधार पावसाच्या काळात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्याची खबर देणारी यंत्रणा मार्गावर तीन पुलांवर ठिकाणी सुसज्ज आहे. पुराचे पाणी धोकादायक पातळीच्या वर आल्यास ही यंत्रणा सतर्क करते. माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडपी येथे पर्जन्यमापक यंत्रणा मार्गावरील ९ स्थानकांमध्ये सुसज्ज असून, अतिवृष्टी काळात ही यंत्रणा सूचना करेल.

मान्सूनच्या काळात बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव या तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष २४ तास रेल्वेच्या सुरक्षित वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी कार्यरत राहणार आहे. पावसाळयातील सुरक्षित प्रवासासाठी कोकण रेल्वे सर्व सुरक्षा उपायांसह सज्ज झाली आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी