शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी पासपोर्टची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:22 PM

राजापूर : येथील पोस्ट कार्यालयात रविवारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांच्या हस्ते झाले. राजापूर पंचायत समितीच्या किसान भवनात हा कार्यक्रम पार पडला.कोकणातील दोन जिल्ह्यांसाठी प्रथमच सुरू होत असलेले पासपोर्ट सेवा केंद्र्र, पुढील काही महिन्यांत सुरू होणारी विमानसेवा अशा विविध सुविधांमुळे येथील कोकणच्या विकासाला ...

राजापूर : येथील पोस्ट कार्यालयात रविवारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांच्या हस्ते झाले. राजापूर पंचायत समितीच्या किसान भवनात हा कार्यक्रम पार पडला.कोकणातील दोन जिल्ह्यांसाठी प्रथमच सुरू होत असलेले पासपोर्ट सेवा केंद्र्र, पुढील काही महिन्यांत सुरू होणारी विमानसेवा अशा विविध सुविधांमुळे येथील कोकणच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.अलीकडच्या काळात कोकणचा विकास झपाट्याने होत आहे. रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी येथील विमानतळ सज्ज झाले असून, लवकरच तेथून विमान उड्डाण घेतील. कोकण रेल्वे मार्गावर सुधारणा होत आहेत. महामार्गाचे काम जोमाने सुरू आहे.त्यानंतर आता कोकणात प्रथमच दोन जिल्ह्यांसाठी राजापूरमधील पोस्ट कार्यालयात टपाल पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होत असून, या सर्वांचे श्रेय हे खासदार विनायक राऊत यांना असल्याची भावना वायकर यांनी व्यक्त केली. त्यावेळी खासदार राऊत यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. राजापूर पंचायत समितीला नवीन सभागृह देणार असून, त्यासाठी ५० लाखांचा निधी देणार असल्याची पालकमंत्र्यांनी घोषणा केली.दोन जिल्ह्यातील विमानतळांवरून विमानसेवादेखील लवकरच सुरु होणार आहेत. त्यामुळे भविष्यात कोकणचा विकास जलदगतीने होणार असल्याचे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले. कोकणात पासपोर्ट सेवा केंद्र्र व्हावे, अशी मागील ३५ वर्षे मागणी होती पण ती काही केंद्र्र सरकारला पूर्ण करता आली नव्हती. मात्र ते शिवधनुष्य खासदार विनायक राऊत यांनी यशस्वीपणे पेलवले. साधारणपणे कोणत्याही विकासकामाला अधिकारीवर्गाची साथ नसेल, तर कामे खोळंबतात पण पासपोर्ट सेवा केंद्रासाठी संबंधित अधिकाºयांनी चांगले सहकार्य केले, याचा त्यांनी उल्लेख केला.सेवेमुळे परदेशगमनाला जाणाºया सर्वांना आता पासपोर्टसाठी कुठेच जाण्याची गरज नाही. आता राजापुरातच ती सेवा सुरु झाली आहे. याबद्दल आमदार राजन साळवी यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थित असणाºया पासपोर्ट विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी यांनी पासपोर्ट सेवेबाबत उपस्थितांना माहिती दिली. त्यानुसार देशात सध्या ३६ पासपोर्ट कार्यालये असून, ९२ सेवाकेंद्रे व २१५ पीओपीएससी सेवा सुरु असल्याची माहिती दिली. देशात वर्षाला सात ते आठ लाख नवीन पासपोर्ट काढले जातात, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत, स्थानिक आमदार राजन साळवी, आमदार उदय सामंत, विधानपरिषद सदस्य अ‍ॅड. हुस्नबानु खलिफे, जिल्हा परिषद अध्यक्ष स्वरुपा साळवी, राजापूरचे नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, सभापती अभिजित तेली, मुंबईच्या क्षेत्रीय पासपोर्ट सेवेच्या अधिकारी स्वाती कुलकर्णी, पोस्टमास्तर जनरल गोवा क्षेत्राचे डॉ. एन. विनोदकुमार, माजी आमदार गणपत कदम, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुका संपर्कप्रमुख दिनेश जैतापकर, महिला आघाडीच्या शिल्पा सुर्वे, तहसीलदार प्रतिभा वराळे, उपसभापती प्रशांत गावकर, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष अनिलकुमार करगुटकर यासह पोस्ट कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.बीएसएनएल अधिकाºयांशी चर्चा करणारसर्व प्रयत्न सुरू असताना संबंधित अधिकाºयांनीदेखील चांगले सहकार्य केल्यामुळे कोणतीच अडचण आली नाही. कोकणात प्रथमच पासपोर्ट सेवा केंद्र्र सुरु झाले असून त्यांना ‘कनेक्टिव्हीटी’ची अडचण येऊ नये म्हणून मुंबईतील ‘बीएसएनएल’च्या अधिकाºयांशी आपण चर्चा करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.