शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रिफायनरी रद्द करण्यास भाग पाडू, मुंबईतील बैठकीत निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 17:08 IST

कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेतर्फे मुंबईतील शिरोडकर हायस्कूल, परळ येथे नाणार रिफायनरी प्रकल्पग्रस्त १७ गावच्या कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागपूर येथील लाक्षणिक उपोषणात ग्रामस्थांनी सहभागी होऊन सरकारला रिफायनरी रद्द करण्यास भाग पाडण्याचा निर्धार करण्यात आला.

ठळक मुद्देरिफायनरी रद्द करण्यास भाग पाडू, मुंबईतील बैठकीत निर्धार- नागपूर येथील उपोषण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा

राजापूर : कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेतर्फे मुंबईतील शिरोडकर हायस्कूल, परळ येथे नाणार रिफायनरी प्रकल्पग्रस्त १७ गावच्या कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागपूर येथील लाक्षणिक उपोषणात ग्रामस्थांनी सहभागी होऊन सरकारला रिफायनरी रद्द करण्यास भाग पाडण्याचा निर्धार करण्यात आला.राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरीविरोधात दिनांक ११ जुलै रोजी नागपूर येथे विधिमंडळाबाहेर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्त गावातून ५०० महिला-पुरुष नागपुरात पोहोचणार आहेत.

या पार्श्वभूमीवर मुंबईत संबंधित गावांच्या कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांच्यासह रामचंद्र भडेकर, नितीन जठार, गिरीश मोंडे, सत्यजीत चव्हाण, योगेश नाटेकर, राजेंद्र फातारपेकर, संजय देसाई व १७ गावचे कमिटी सभासद उपस्थित होते.यावेळी अशोक वालम यांनी सांगितले की, गेले एक वर्ष येथील ग्रामस्थ प्रस्तावित रिफायनरीविरोधात संघर्ष करीत आहेत. डिसेंबर २०१७चे नागपूर हिवाळी अधिवेशन, मुंबईतील २०१८चे बजेट अधिवेशनकाळात धरणे-उपोषण आंदोलन करण्यात आले.

अनेक मोर्चे, सभा, बंद, असहमती पत्र, संयुक्त मोजणी होऊ न देणे आदी कृतींद्वारे स्थानिक ग्रामस्थांचा विरोध किती तीव्र आहे, हे दिसून आले आहे. १४ मार्च रोजीच्या धरणे आंदोलनात मुंख्यमंत्र्यांनी भेटीदरम्यान ग्रामस्थांचा विरोध असल्यास जबरदस्तीने प्रकल्प लादणार नाही, असे आश्वासनही दिले होते. मात्र, कोकणी जनतेच्या संघर्षाकडे मुख्यमंत्री व केंद्र सरकार लक्ष देत नाहीत. शिवसेना सत्तेत असूनही अध्यादेश रद्द करण्यात असमर्थ ठरल्याचे वालम म्हणाले.सर्वपक्षीय आमदारांना पत्रपावसाळी नागपूर अधिवेशनादरम्यान एक दिवसाचे लाक्षणिक धरणे उपोषण आंदोलन नागपूर विधिमंडळाबाहेर केले जाणार आहे. सर्वपक्षीय आमदारांना संघटनेतर्फे ११ जुलै रोजी आंदोलनाच्या दिवशी सभागृहात सरकारला रिफायनरी जबरदस्तीने रेटण्याबाबतचा जाब विचारून प्रसंगी सभागृह बंद पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी