शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

धोकादायक परशुराम घाट प्रश्नी १८ ला बैठक, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाच्या जोरदार हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 14:39 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली तीन वर्ष सुरू आहे. मात्र चिपळूण आणि खेड या दोन्ही तालुक्यांच्या हद्दीत येणाऱ्या अवघड परशुराम घाटाच्या कामाला अद्याप सुरूवातही झालेली नाही.

चिपळूण : देवस्थान, खोत आणि कूळ यांच्यातील नुकसान भरपाई वादामुळे रखडलेले परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम पोलीस बंदोबस्त घेऊन सुरू करण्यात यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांना दिले आहेत. त्यानुसार याप्रश्नी येथील प्रांताधिकाऱ्यांनी १८ रोजी सकाळी ११ वाजता प्रांत कार्यालयात महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत परशुराम घाटाच्या वादग्रस्त विषयावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

येथील ॲड. ओवेस पेचकर यांनी परशुराम घाटातील रखडलेल्या कामाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली तीन वर्ष सुरू आहे. खेड तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या महामार्गाचे काम जवळजवळ पूर्ण होत आहे. मात्र चिपळूण आणि खेड या दोन्ही तालुक्यांच्या हद्दीत येणाऱ्या अवघड परशुराम घाटाच्या कामाला अद्याप सुरूवातही झालेली नाही. चौपदरीकरणाच्या कामासाठी जी जागा संपादित करण्यात आली, त्यासाठी ४३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. यावरून पेढे-परशुराम येथील ग्रामस्थ आणि देवस्थान कमिटी यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याने घाट रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही.

सद्यस्थितीत परशुराम घाट अतिशय धोकादायक बनला आहे. विसावा पॉईंटजवळच असलेल्या एका वळणावर रस्त्याचा काही भाग खचला आहे. त्या ठिकाणच्या रस्त्याचा काही भाग दिवसेंदिवस ढासळत आहे. त्यामुळे पायथ्याशी असलेल्या वस्तीलाही धोका निर्माण झाला आहे. तसेच घाट प्रत्येक ठिकाणी दरडींचा धोका वाढला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यालगत दगड अडकले आहेत. त्यामुळे या घाटातून प्रवास करताना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्याची गंभीरपणे दखल घेत प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी ही बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता, तहसिलदार, राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, पोलीस निरीक्षक, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक व संघर्ष समिती पेढे - परशुरामचे पदाधिकारी, कल्याण टोलवेज प्रा. लि. महाडचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी