शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

कांदाटी खोऱ्यात गवारेड्याकडून भात उद्ध्वस्त, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 17:41 IST

शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ

खेड : प्रशासकीय दृष्टीने सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात असणाऱ्या, मात्र भौगोलिकदृष्ट्या केवळ खेड तालुक्याला संलग्न असलेल्या कांदाटी खोऱ्यातल्या शिंदी, वळवण, उचाट या गावांमध्ये गवारेड्याने भातलावणीसाठी रुजवात केलेला भाताचा रूजून आलेला तरवा (छोटी भात रोपे) खाऊन टाकल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.खेड ते खोपी मार्गाचे रघुवीर घाट फोडून विस्तारीकरण करण्यात आल्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोरे रत्नागिरी जिल्ह्याशी जोडले गेले आहे. पावसावर अवलंबून असलेले आणि वर्षातून एकदाच घेतले जाणाऱ्या भात पिकावर आलेल्या गवारेड्यांच्या संकटामुळे खोऱ्यातले शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले असून, वन विभागाकडून साधे पंचनामेही झाले नाहीत. आता वर्षभर काय खायचे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा आहे. वन विभागाकडून नुकसानभरपाई नाही मिळाली तर आत्महत्या करण्याचा निर्णय येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे.कोयना धरण बांधल्यानंतर अनेक गावे पुनर्वसित झाली तर काही गावकरी त्याचठिकाणी राहिले. सद्य:स्थितीत या गावातील अनेकजण नोकरीधंद्यासाठी मुंबई - पुण्याला गेले. येथे राहणारे ग्रामस्थ पारंपरिक भातशेतीवर अवलंबून आहेत. यावर्षीही त्यांनी पारंपरिक पद्धतीने पावसाळ्यात भात पेरणी केली. मात्र, पेरणी करून उगवलेल्या भाताचे तरवे कोयना अभयारण्यात असलेल्या गवा रेड्यांनी खाऊन उद्ध्वस्त केले आहेत. वर्षभर ज्या भातशेतीवर अवलंबून राहावे लागते तीच भातशेती गवारेड्याने उद्ध्वस्त केल्याने आता वर्षभर खायचे काय, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.महाबळेश्वर तालुक्याच्या वन विभाग कार्यालयाकडे वारंवार सांगूनही शेताची पाहणी आणि पंचनामाही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेला नाही. वर्षभर पोटाची भूक भागवणारे भात पीक पूर्णच नष्ट झाल्याने शेताच्या बांधावर गळफास घेऊन आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.कोयना धरणानंतर आता या कांदाटी खोऱ्यात वास्तव्याला असणाऱ्या गावांची अवस्था ना घर का, ना घाट का अशी झाली आहे. अत्यंत दुर्गम आणि जंगलमय भागात राहात असलेले हे लोक शासनाकडून मोठी अपेक्षा ठेवत नाहीत. मात्र, पारंपरिक शेती करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या शेतकऱ्यांना आवश्यक गोष्टींची पूर्तता व नुकसानभरपाई तरी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग