शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

कांदाटी खोऱ्यात गवारेड्याकडून भात उद्ध्वस्त, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकरी संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 17:41 IST

शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ

खेड : प्रशासकीय दृष्टीने सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात असणाऱ्या, मात्र भौगोलिकदृष्ट्या केवळ खेड तालुक्याला संलग्न असलेल्या कांदाटी खोऱ्यातल्या शिंदी, वळवण, उचाट या गावांमध्ये गवारेड्याने भातलावणीसाठी रुजवात केलेला भाताचा रूजून आलेला तरवा (छोटी भात रोपे) खाऊन टाकल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.खेड ते खोपी मार्गाचे रघुवीर घाट फोडून विस्तारीकरण करण्यात आल्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोरे रत्नागिरी जिल्ह्याशी जोडले गेले आहे. पावसावर अवलंबून असलेले आणि वर्षातून एकदाच घेतले जाणाऱ्या भात पिकावर आलेल्या गवारेड्यांच्या संकटामुळे खोऱ्यातले शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले असून, वन विभागाकडून साधे पंचनामेही झाले नाहीत. आता वर्षभर काय खायचे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा आहे. वन विभागाकडून नुकसानभरपाई नाही मिळाली तर आत्महत्या करण्याचा निर्णय येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे.कोयना धरण बांधल्यानंतर अनेक गावे पुनर्वसित झाली तर काही गावकरी त्याचठिकाणी राहिले. सद्य:स्थितीत या गावातील अनेकजण नोकरीधंद्यासाठी मुंबई - पुण्याला गेले. येथे राहणारे ग्रामस्थ पारंपरिक भातशेतीवर अवलंबून आहेत. यावर्षीही त्यांनी पारंपरिक पद्धतीने पावसाळ्यात भात पेरणी केली. मात्र, पेरणी करून उगवलेल्या भाताचे तरवे कोयना अभयारण्यात असलेल्या गवा रेड्यांनी खाऊन उद्ध्वस्त केले आहेत. वर्षभर ज्या भातशेतीवर अवलंबून राहावे लागते तीच भातशेती गवारेड्याने उद्ध्वस्त केल्याने आता वर्षभर खायचे काय, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.महाबळेश्वर तालुक्याच्या वन विभाग कार्यालयाकडे वारंवार सांगूनही शेताची पाहणी आणि पंचनामाही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेला नाही. वर्षभर पोटाची भूक भागवणारे भात पीक पूर्णच नष्ट झाल्याने शेताच्या बांधावर गळफास घेऊन आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.कोयना धरणानंतर आता या कांदाटी खोऱ्यात वास्तव्याला असणाऱ्या गावांची अवस्था ना घर का, ना घाट का अशी झाली आहे. अत्यंत दुर्गम आणि जंगलमय भागात राहात असलेले हे लोक शासनाकडून मोठी अपेक्षा ठेवत नाहीत. मात्र, पारंपरिक शेती करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या शेतकऱ्यांना आवश्यक गोष्टींची पूर्तता व नुकसानभरपाई तरी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग