शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

..अन्यथा कोकणसाठी महाराष्ट्र उठवू!, राष्ट्रीय महामार्ग विभागाला मनसे नेत्यांचा इशारा

By संदीप बांद्रे | Updated: October 19, 2023 19:01 IST

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी गंभीर नाहीत. अधिकारी व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळेच बहादूर शेख नाका येथील ...

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी गंभीर नाहीत. अधिकारी व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळेच बहादूर शेख नाका येथील उड्डाण पुलाची दुर्घटना घडली आहे. यापुढे कारभारात सुधारणा  न झाल्यास मनसेकडून कोकणासाठी अवघा महाराष्ट्र उठवू, असा इशारा मनसे नेत्यांनी गुरुवारी येथे दिला. याचवेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र यांच्याशी संपर्क साधल्यानंतर दोन दिवसात मुंबईत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले.मनसे नेत्यांनी गुरूवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर धडक दिली असता तेथे अधिकारी उपस्थित नसल्याने ठिय्या मांडला. त्यानंतर सायंकाळी कार्यककारी अभियंत्यासमवेत मनसे नेत्यांची बैठक झाली. यावेळी माजी आमदार बाळा नांदगावर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, वैभव खेडेकर, संतोष नलावडे म्हणाले की, गेल्या १७-१८  वर्ष मुंबई गोवा महामार्गाच्या चौपरीकरणाचे काम पूर्ण होत नसल्याने इतिहासात त्याची नोंद झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रस्ते, पूल इतके किलोमीटरचे बांधले असे नेहमी सांगतात. यशाचे श्रेय तुम्ही श्रेय घेता, तर मात्र अपयश कोणी घेयचं? हे तुमचंच अपयश आहे. मुंबई- गोवा महामार्गाला गडकरीचं नाव द्यावं, अशी आमची मागणी आहे. कोट्यवधी रुपयांचा पूल कोसळतो, ही मोठी दुर्घटना आहे. सरकारी अधिकारी, ठेकेदार कंपनी काय करत होती. या प्रकरणात नेमके दोषी कोण यावर कोणीही बोलायला तयार नाही.  नेते मंडळीची उत्तरे नरोबा- कुंजोबा अशी आहेत. वाशिष्ठी नदीवरील पुलावर लोखंडी सळयाबाबतचा मुद्दा उपस्थित करीत या लोखंडी सळ्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण राहणार? असा प्रश्न उपस्थित केला. यापुढील काळात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामात सुधारणा न झाल्यास मन सैनिक शांत गप्प बसणार नाही, असा इशारा दिला. यावर कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव म्हणाले, सुरळीत वाहतूकीसाठी दोन दिवसात सर्व्हिस रोडच्या रूंदीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. वाशिष्ठी पुलावरील कॉंक्रीटीकरणाची दुरूस्ती देखील तातडीने केली जाईल. मात्र जोवर केंद्रीय समितीची पाहणी होत नाही, तोवर उड्डाणपुलाच्या कामास सुरवात करता येणार नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणMNSमनसे