शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

..अन्यथा कोकणसाठी महाराष्ट्र उठवू!, राष्ट्रीय महामार्ग विभागाला मनसे नेत्यांचा इशारा

By संदीप बांद्रे | Updated: October 19, 2023 19:01 IST

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी गंभीर नाहीत. अधिकारी व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळेच बहादूर शेख नाका येथील ...

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी गंभीर नाहीत. अधिकारी व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळेच बहादूर शेख नाका येथील उड्डाण पुलाची दुर्घटना घडली आहे. यापुढे कारभारात सुधारणा  न झाल्यास मनसेकडून कोकणासाठी अवघा महाराष्ट्र उठवू, असा इशारा मनसे नेत्यांनी गुरुवारी येथे दिला. याचवेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र यांच्याशी संपर्क साधल्यानंतर दोन दिवसात मुंबईत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले.मनसे नेत्यांनी गुरूवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर धडक दिली असता तेथे अधिकारी उपस्थित नसल्याने ठिय्या मांडला. त्यानंतर सायंकाळी कार्यककारी अभियंत्यासमवेत मनसे नेत्यांची बैठक झाली. यावेळी माजी आमदार बाळा नांदगावर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, वैभव खेडेकर, संतोष नलावडे म्हणाले की, गेल्या १७-१८  वर्ष मुंबई गोवा महामार्गाच्या चौपरीकरणाचे काम पूर्ण होत नसल्याने इतिहासात त्याची नोंद झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रस्ते, पूल इतके किलोमीटरचे बांधले असे नेहमी सांगतात. यशाचे श्रेय तुम्ही श्रेय घेता, तर मात्र अपयश कोणी घेयचं? हे तुमचंच अपयश आहे. मुंबई- गोवा महामार्गाला गडकरीचं नाव द्यावं, अशी आमची मागणी आहे. कोट्यवधी रुपयांचा पूल कोसळतो, ही मोठी दुर्घटना आहे. सरकारी अधिकारी, ठेकेदार कंपनी काय करत होती. या प्रकरणात नेमके दोषी कोण यावर कोणीही बोलायला तयार नाही.  नेते मंडळीची उत्तरे नरोबा- कुंजोबा अशी आहेत. वाशिष्ठी नदीवरील पुलावर लोखंडी सळयाबाबतचा मुद्दा उपस्थित करीत या लोखंडी सळ्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण राहणार? असा प्रश्न उपस्थित केला. यापुढील काळात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामात सुधारणा न झाल्यास मन सैनिक शांत गप्प बसणार नाही, असा इशारा दिला. यावर कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव म्हणाले, सुरळीत वाहतूकीसाठी दोन दिवसात सर्व्हिस रोडच्या रूंदीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. वाशिष्ठी पुलावरील कॉंक्रीटीकरणाची दुरूस्ती देखील तातडीने केली जाईल. मात्र जोवर केंद्रीय समितीची पाहणी होत नाही, तोवर उड्डाणपुलाच्या कामास सुरवात करता येणार नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणMNSमनसे