शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

धारावी पुनर्वसनाला विरोध म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना हरताळ, मंत्री सामंत यांचा विरोधकांवर आरोप

By शोभना कांबळे | Updated: December 6, 2023 16:36 IST

रत्नागिरीत : झोपडीतला माणूस हा घरामध्ये गेला पाहिजे, झोपडपट्टीतल्या माणसाचं दारिद्रय नष्ट व्हायला पाहिजे. त्यालाही इतरांप्रमाणे घरात राहता आलं ...

रत्नागिरीत : झोपडीतला माणूस हा घरामध्ये गेला पाहिजे, झोपडपट्टीतल्या माणसाचं दारिद्रय नष्ट व्हायला पाहिजे. त्यालाही इतरांप्रमाणे घरात राहता आलं पाहिजे, यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी झोपडी पुनर्वसनाचा संकल्प केला. त्यामुळे तत्कालीन युती सरकारच्या काळात मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम सुरू झाला. पण, त्याला विरोध करणे, म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना हरताळ फासण्यासारखे आहे, असा आरोप राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.देशाच्या मेट्रो सिटीत झोपडपट्टया झाल्या, त्या काँग्रेसच्या काळात. काहीतरी आमिषे दाखवायची, मतदार करून घ्यायचे. नंतर पाच वर्षे प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या या लोकांकडे बघायचंही नाही, हे धोरण काँग्रेसने आखले होते. हे बाळासाहेबांच्या लक्षात येताच त्यांनी झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम हाती घेतला. आशिया खंडातील सर्वांत मोठ्या अशा धारावी झोपडपट्टीत अनेक लोक राहतात. काहीतरी धंदे करतात. पण, काँग्रेसी प्रवृत्तीचे असे म्हणणे होते, की या लोकांनी असेच राहायला हवे, फक्त मतदान करायला हवे.मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावी पुनर्वसनाचा निर्णय घेतला. मात्र, काही कालावधीतच सरकार बदललं. मात्र, त्यानंतर आलेल्या सरकारमध्ये काँग्रेसही होतं. परंतु, या झोपडपट्टीच पुनर्वसन होऊ नये, यासाठी अडीच वर्षे निर्णय झाला नाही. मात्र, आता शिंदे सरकारने झोपडपट्टी पुनर्वसनाचा निर्णय घेतला आहे. हे पुनर्वसन चांगल्या पद्धतीने पारदर्शी होणार आहे. असे असताना मोर्चा काढणं म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराला हरताळ फासण्यासारखे असल्याचा आरोपही सामंत यांनी याप्रसंगी केला.

याच काँट्रॅक्ट अदानीला दिलय म्हणून त्याच्यावर आरोप करून सरकारला बदनाम करायचं, ही काँग्रेसची जुनी फॅशन असल्याचा टोलाही मंत्री सामंत यांनी याप्रसंगी लगावला. काँग्रेसच्या काळात झालं नाही ते आता होतयं. तर त्याचे समर्थन सर्व पक्षांनी करायला हवं, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. धारावीच्या लोकांनीही आपलं भलं कशात आहे, हे पाहायला हवं, असे ते म्हणाले.सध्या तीन राज्यातील निर्णय लागल्यानंतर काही लोकांना नैराश्य आल्यामुळे त्यांच्याकडून विकासाच्या कामांना विरोध होत असल्याचा आरोपही मंत्री सामंत यांनी यावेळी केला.

मालवण बंदराचा विकास होणारमालवण बंदर हे देशातील सर्वांत मोठे बंदर आहे. यामुळे महाराष्ट्राच्या विकासालाही चालना मिळणार आहे. मात्र, तिथल्या शेतकऱ्यांना विश्चासात घेऊनच या बंदराचा विकास होणार आहे. विकास करताना अतिशय पारदर्शीपणे पुढे जाणार असल्याचे सामंत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdharavi-acधारावीUday Samantउदय सामंत