शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

धारावी पुनर्वसनाला विरोध म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना हरताळ, मंत्री सामंत यांचा विरोधकांवर आरोप

By शोभना कांबळे | Updated: December 6, 2023 16:36 IST

रत्नागिरीत : झोपडीतला माणूस हा घरामध्ये गेला पाहिजे, झोपडपट्टीतल्या माणसाचं दारिद्रय नष्ट व्हायला पाहिजे. त्यालाही इतरांप्रमाणे घरात राहता आलं ...

रत्नागिरीत : झोपडीतला माणूस हा घरामध्ये गेला पाहिजे, झोपडपट्टीतल्या माणसाचं दारिद्रय नष्ट व्हायला पाहिजे. त्यालाही इतरांप्रमाणे घरात राहता आलं पाहिजे, यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी झोपडी पुनर्वसनाचा संकल्प केला. त्यामुळे तत्कालीन युती सरकारच्या काळात मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम सुरू झाला. पण, त्याला विरोध करणे, म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना हरताळ फासण्यासारखे आहे, असा आरोप राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.देशाच्या मेट्रो सिटीत झोपडपट्टया झाल्या, त्या काँग्रेसच्या काळात. काहीतरी आमिषे दाखवायची, मतदार करून घ्यायचे. नंतर पाच वर्षे प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या या लोकांकडे बघायचंही नाही, हे धोरण काँग्रेसने आखले होते. हे बाळासाहेबांच्या लक्षात येताच त्यांनी झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम हाती घेतला. आशिया खंडातील सर्वांत मोठ्या अशा धारावी झोपडपट्टीत अनेक लोक राहतात. काहीतरी धंदे करतात. पण, काँग्रेसी प्रवृत्तीचे असे म्हणणे होते, की या लोकांनी असेच राहायला हवे, फक्त मतदान करायला हवे.मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावी पुनर्वसनाचा निर्णय घेतला. मात्र, काही कालावधीतच सरकार बदललं. मात्र, त्यानंतर आलेल्या सरकारमध्ये काँग्रेसही होतं. परंतु, या झोपडपट्टीच पुनर्वसन होऊ नये, यासाठी अडीच वर्षे निर्णय झाला नाही. मात्र, आता शिंदे सरकारने झोपडपट्टी पुनर्वसनाचा निर्णय घेतला आहे. हे पुनर्वसन चांगल्या पद्धतीने पारदर्शी होणार आहे. असे असताना मोर्चा काढणं म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराला हरताळ फासण्यासारखे असल्याचा आरोपही सामंत यांनी याप्रसंगी केला.

याच काँट्रॅक्ट अदानीला दिलय म्हणून त्याच्यावर आरोप करून सरकारला बदनाम करायचं, ही काँग्रेसची जुनी फॅशन असल्याचा टोलाही मंत्री सामंत यांनी याप्रसंगी लगावला. काँग्रेसच्या काळात झालं नाही ते आता होतयं. तर त्याचे समर्थन सर्व पक्षांनी करायला हवं, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. धारावीच्या लोकांनीही आपलं भलं कशात आहे, हे पाहायला हवं, असे ते म्हणाले.सध्या तीन राज्यातील निर्णय लागल्यानंतर काही लोकांना नैराश्य आल्यामुळे त्यांच्याकडून विकासाच्या कामांना विरोध होत असल्याचा आरोपही मंत्री सामंत यांनी यावेळी केला.

मालवण बंदराचा विकास होणारमालवण बंदर हे देशातील सर्वांत मोठे बंदर आहे. यामुळे महाराष्ट्राच्या विकासालाही चालना मिळणार आहे. मात्र, तिथल्या शेतकऱ्यांना विश्चासात घेऊनच या बंदराचा विकास होणार आहे. विकास करताना अतिशय पारदर्शीपणे पुढे जाणार असल्याचे सामंत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdharavi-acधारावीUday Samantउदय सामंत