शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धारावी पुनर्वसनाला विरोध म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना हरताळ, मंत्री सामंत यांचा विरोधकांवर आरोप

By शोभना कांबळे | Updated: December 6, 2023 16:36 IST

रत्नागिरीत : झोपडीतला माणूस हा घरामध्ये गेला पाहिजे, झोपडपट्टीतल्या माणसाचं दारिद्रय नष्ट व्हायला पाहिजे. त्यालाही इतरांप्रमाणे घरात राहता आलं ...

रत्नागिरीत : झोपडीतला माणूस हा घरामध्ये गेला पाहिजे, झोपडपट्टीतल्या माणसाचं दारिद्रय नष्ट व्हायला पाहिजे. त्यालाही इतरांप्रमाणे घरात राहता आलं पाहिजे, यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी झोपडी पुनर्वसनाचा संकल्प केला. त्यामुळे तत्कालीन युती सरकारच्या काळात मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम सुरू झाला. पण, त्याला विरोध करणे, म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांना हरताळ फासण्यासारखे आहे, असा आरोप राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.देशाच्या मेट्रो सिटीत झोपडपट्टया झाल्या, त्या काँग्रेसच्या काळात. काहीतरी आमिषे दाखवायची, मतदार करून घ्यायचे. नंतर पाच वर्षे प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या या लोकांकडे बघायचंही नाही, हे धोरण काँग्रेसने आखले होते. हे बाळासाहेबांच्या लक्षात येताच त्यांनी झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम हाती घेतला. आशिया खंडातील सर्वांत मोठ्या अशा धारावी झोपडपट्टीत अनेक लोक राहतात. काहीतरी धंदे करतात. पण, काँग्रेसी प्रवृत्तीचे असे म्हणणे होते, की या लोकांनी असेच राहायला हवे, फक्त मतदान करायला हवे.मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावी पुनर्वसनाचा निर्णय घेतला. मात्र, काही कालावधीतच सरकार बदललं. मात्र, त्यानंतर आलेल्या सरकारमध्ये काँग्रेसही होतं. परंतु, या झोपडपट्टीच पुनर्वसन होऊ नये, यासाठी अडीच वर्षे निर्णय झाला नाही. मात्र, आता शिंदे सरकारने झोपडपट्टी पुनर्वसनाचा निर्णय घेतला आहे. हे पुनर्वसन चांगल्या पद्धतीने पारदर्शी होणार आहे. असे असताना मोर्चा काढणं म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराला हरताळ फासण्यासारखे असल्याचा आरोपही सामंत यांनी याप्रसंगी केला.

याच काँट्रॅक्ट अदानीला दिलय म्हणून त्याच्यावर आरोप करून सरकारला बदनाम करायचं, ही काँग्रेसची जुनी फॅशन असल्याचा टोलाही मंत्री सामंत यांनी याप्रसंगी लगावला. काँग्रेसच्या काळात झालं नाही ते आता होतयं. तर त्याचे समर्थन सर्व पक्षांनी करायला हवं, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. धारावीच्या लोकांनीही आपलं भलं कशात आहे, हे पाहायला हवं, असे ते म्हणाले.सध्या तीन राज्यातील निर्णय लागल्यानंतर काही लोकांना नैराश्य आल्यामुळे त्यांच्याकडून विकासाच्या कामांना विरोध होत असल्याचा आरोपही मंत्री सामंत यांनी यावेळी केला.

मालवण बंदराचा विकास होणारमालवण बंदर हे देशातील सर्वांत मोठे बंदर आहे. यामुळे महाराष्ट्राच्या विकासालाही चालना मिळणार आहे. मात्र, तिथल्या शेतकऱ्यांना विश्चासात घेऊनच या बंदराचा विकास होणार आहे. विकास करताना अतिशय पारदर्शीपणे पुढे जाणार असल्याचे सामंत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdharavi-acधारावीUday Samantउदय सामंत