शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

रिफायनरी विरोधात विधानभवनासमोर कोकणच्या आमदारांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 17:34 IST

राजापूर तालुक्यातील नाणार - कुंभवडे परिसरातील बाभूळवाडी येथे उभारल्या जाणाऱ्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी रिफायनरीविरोधात जोरदार घोषणाबाजी करून विधानभवन परिसर दणाणून सोडला.

ठळक मुद्देरिफायनरीविरोधात शिवसेनेच्या आमदारांची जोरदार घोषणाबाजीकोकणच्या आमदारांनी दणाणून सोडला विधानभवन परिसर

राजापूर : राजापूर तालुक्यातील नाणार - कुंभवडे परिसरातील बाभूळवाडी येथे उभारल्या जाणाऱ्या पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी रिफायनरीविरोधात जोरदार घोषणाबाजी करून विधानभवन परिसर दणाणून सोडला.या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असून, स्थानिक आमदार म्हणून आमदार राजन साळवी वेळोवेळी हा प्रकल्प रद्द होण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. रिफायनरी प्रकल्प रद्द करा, रिफायनरी हटवा, कोकण वाचवा अशा घोषणा देत बुधवारी शिवसेनेच्यावतीने नागपूर येथे विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्यात आले. हा प्रकल्प रद्द होईपर्यंत ग्रामस्थांच्या पाठीशी राहू, असे आश्वासन देत शिवसेनेच्या आमदारांनी प्रकल्पाविरोधात निदर्शने केली.या आंदोलनात शिवसेना विधानसभेचे गटनेते आमदार सुनील प्रभू, शिवसेनेचे कोकण पक्ष प्रतोद आमदार राजन साळवी, आमदार सदानंद चव्हाण, आमदार भरत गोगावले, आमदार वैभव नाईक, आमदार उदय सामंत, आमदार सुनील शिंंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार तृप्ती सावंत, आमदार मनोहर भोईर, आमदार तुकाराम काटे आदी सहभागी झाले होते.विधानसभेतही चर्चागेले काही दिवस रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेची भूमिका संदिग्ध असल्याचे वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे शिवसेनेची गोची झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न उचलण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून विधानभवनातही या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.

टॅग्स :Rajan Salviराजन साळवीRatnagiriरत्नागिरी