शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri news: हायटेक चिपळूण बसस्थानकासाठी फक्त चार कामगार, गेल्या सहा वर्षांपासून काम रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 18:47 IST

काम सुरू होऊन सहा वर्षे उलटली, तरी प्रकल्पाचा पाया तयार झालेला नाही

चिपळूण : गेल्या सहा वर्षांपासून येथील हायटेक एसटी बसस्थानकाची प्रतीक्षा अनेकांना लागून राहिली आहे. नवीन ठेकेदाराची नेमणूक केल्यानंतर या कामाला गती मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु येथे केवळ चार कामगारच काम करत आहेत. अत्यंत रेंगाळत हे काम सुरू आहे. दरवेळी कॉलम मधील पाण्याचा उपसा केला जात आहे. मात्र त्यापुढे हे काम सरकायला तयार नाही.जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, लांजा या तिन्ही बसस्थानकांचे काम एकाच वेळी २०१७ मध्ये सुरू केले होते. यामध्ये रत्नागिरी बसस्थानकाचा प्रकल्प सर्वाधिक मोठा आहे. त्यासाठी सुमारे १० कोटी, चिपळूणसाठी ३ कोटी ८० लाख, तर लांजासाठी १ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या तिन्ही प्रकल्पांचे काम तितक्याच तत्परतेने हाती घेण्यात आले होते.चिपळूण बसस्थानकाच्या कामाचा ठेका स्कायलार्प, रत्नागिरीचा ठेका श्री दत्तप्रसाद कन्स्ट्रक्शन आणि लांजा बसस्थानकाचा ठेका  एस. व्ही. एंटरप्राइजेस या कंपन्यांना देण्यात आला. या कामासाठी श्री दत्तप्रसाद कन्स्ट्रक्शनला ३६ महिन्यांची, तर स्कायलार्प व एस. व्ही. एंटरप्राइजेसला प्रत्येकी २४ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र हे काम सुरू होऊन सहा वर्षे उलटली, तरी प्रकल्पाचा पाया तयार झालेला नाही. काही प्रमाणात झालेल्या कामातील लोखंड ही आता गंजून गेले आहे. गेल्या ५ वर्षात याविषयी अनेकांनी निवेदन व आंदोलने केली आहेत. परंतु या प्रकल्पांना आजतागायत गती मिळालेली नाही.प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांचेही हाल होत असल्याने ॲड. आवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. यावर सुनावणीही झाली. मात्र शासनाकडून अजूनही बसस्थानकाच्या कामाबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. आगारात उभे राहण्यासाठी शेडची ही व्यवस्था नसल्याने उन्हाळा, पावसाळयात प्रवाशांना बाहेरच उभे राहावे लागत आहे.काम संथपणे सुरूकाही महिन्यांपूर्वी सातारा येथील ठेकेदारास चिपळूणच्या बसस्थानकाचे काम मिळाले. सुरुवात दमदार झाली. मात्र नंतर महिनाभर बंद काम बंद होते. गेल्या आठवड्यापासून पुन्हा काम सुरु झाले. मात्र त्याला गती नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण