शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
11
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
12
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
13
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
14
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
15
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
16
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
17
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
18
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
19
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
20
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

कांदा, बटाटा दरात चढउतार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:30 IST

फुलांचा खप रत्नागिरी : गुढीपाडव्यापर्यंत गावोगावी शिमगोत्सव साजरा करण्यात येतो. सध्या कोरोनामुळे शिमगोत्सव शांततेत साजरा करण्यात येत असला, तरी ...

फुलांचा खप

रत्नागिरी : गुढीपाडव्यापर्यंत गावोगावी शिमगोत्सव साजरा करण्यात येतो. सध्या कोरोनामुळे शिमगोत्सव शांततेत साजरा करण्यात येत असला, तरी पालखीसाठी फुले, वेण्या, हार, फुलांच्या चादरी भाविकांकडून अर्पण केल्या जात आहेत. शिवाय लग्नसराईमुळे वेण्या, हार, तुरे, पट्टाशिवाय वाहन, तसेच समारंभ स्थळी फुलांची सजावट करण्यात येत असल्याने फुलांना वाढती मागणी आहे. कोरोनामुळे फुलविक्रेते फोनवरून ऑर्डर घेत असून, ग्राहकांना घरपोच सुविधा उपलब्ध करीत आहेत.

रस्ते दुरुस्तीची मागणी

रत्नागिरी : सागरी महामार्गावरील आरेवारे गणपतीपुळे मार्गाची दयनीय अवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. गतवर्षी लाॅकडाऊनपूर्वी खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र, वाहनाच्या वर्दळीमुळे पुन्हा खड्डे उखडले असून, खड्ड्यातून मार्गक्रमण करणे अवघड बनले आहे. त्यामुळे तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी वाहन चालकांमधून करण्यात येत आहे.

पालकांमध्ये संभ्रम

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा तोंडावर असून, शासनाने ऑफलाइन परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. पालक मात्र धास्तावले असून, मुलांना परीक्षा केंद्रापर्यंत सोडणे, आणणे, तसेच मुलांच्या आरोग्य सुरक्षेबाबतचा प्रश्न निर्माण झाल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत.

शेतकरी चिंताग्रस्त

रत्नागिरी : हवामान खात्याने दि.११ व १२ रोजी अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील काही भागांत पावसाचा शिडकावा झाला आहे. या वर्षी ऋतुमानातील बदलामुळे आधीच आंबापीक धोक्यात असताना, पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना झाडावरील आंबा पिकाबाबत चिंता निर्माण झाली आहे.