शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

देखभाल दुरुस्ती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:24 IST

धामणीत गोळ्यांचे वाटप देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील धामणी ग्रामपंचायती क्षेत्रातील एक हजार ग्रामस्थांना येथील भाजपतर्फे व्हिटॅमिन सी, डी ...

धामणीत गोळ्यांचे वाटप

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील धामणी ग्रामपंचायती क्षेत्रातील एक हजार ग्रामस्थांना येथील भाजपतर्फे व्हिटॅमिन सी, डी आणि झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. भाजपचे तालुका सरचिटणीस डॉ. अमित ताठरे आणि परेश देवरुखकर यांच्यातर्फे हे वाटप करण्यात आले. यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

इंजिनिअरची मागणी

रत्नागिरी : ऑक्सिजन कक्षात पाइपलाइनसह आदी उपकरणे साधनसामग्री आदींच्या योग्य वापरासाठी बायोमेडिकल इंजिनिअरची आवश्यकता असते. जिल्हा रुग्णालयात या दृष्टीने विचार होऊन ऑक्सिजन कक्षात बायोमेडिकल इंजिनिअर नियुक्त केल्यास भंडारा आदी ठिकाणी झालेले अपघात टाळता येतील, असे मत व्यक्त होत आहे.

चिखलाचे साम्राज्य

पाली : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाली बाजारपेठेतील रस्त्यावर सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे लोकवस्तीत पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. खडीकरण केलेला जोडरस्ताही आता खड्डेमय झाला असून काँक्रिटीकरणाची मागणी होत आहे.

बियाणे विक्रीला प्रतिसाद

चिपळूण : चिपळूण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाने खरीप हंगामाकरिता भात बी-बियाणे मागविली होती. या बियाण्याच्या विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. काही शेतकऱ्यांनी अजूनही बी-बियाण्यांची खरेदी केली नसेल तर त्यांनी ती वेळेत करावी, असे आवाहन खरेदी-विक्री संघाने केले आहे.

उकाड्यात वाढ

रत्नागिरी : थोड्याच दिवसात मान्सून केरळ राज्यात दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे साधारणत: ८ ते १० दिवसांत हा मान्सून कोकणात दाखल होऊ शकेल. सध्या वातावरणात तसे बदल दिसू लागले आहेत. उकाड्यात दिवसेंदिवस कमालीची वाढ होऊ लागली आहे.

अंधाराचे साम्राज्य कायम

लांजा : तालुक्यातील शिपोशी पंचक्रोशीत चक्रीवादळाने विद्युत खांब, विद्युत वाहिन्या यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. गेले दहा दिवस पंचक्रोशी अंधारात आहे. भांबेड येथील महावितरणच्या कार्यालयात जाऊन यासंबंधी माहितीही दिली होती. मात्र, अजूनही हा भाग अंधारात आहे.

सॅनिटायझर वाटप

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा येथील श्री केदारलिंग ग्रामविकास मंडळातर्फे ग्रामस्थांना सॅनिटायझरच्या ५०० बाटल्या आणि २००० मास्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामस्थांना या साहित्याचे वाटप घरपोच करण्यात आले. या उपक्रमाबद्दल मंडळाला धन्यवाद देण्यात आले.

बेरोजगारांना घरघंटी वाटप

देवरुख : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, दक्षिण रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने बेरोजगारांना घरघंटीचे वाटप करण्यात आले. स्वावलंबन आयामांतर्गत हा उपक्रम समितीने राबविला. सायले, काटवली या गावांमधील बेरोजगारांना घरघंटीचे वाटप करून या लोकांच्या हाताला काम मिळवून देण्यात आले आहे.

बुद्ध पौर्णिमा साधेपणाने

दापोली : तालुक्यातील विविध भागांत दरवर्षी उत्साहाने साजरी होणारी बुद्ध पौर्णिमा यावेळी कोरोनाच्या सावटामुळे अतिशय साधेपणाने साजरी करण्यात आली. यावर्षी बुद्ध विहारात न जाता बौद्ध बांधवांनी घरोघरी बुद्धांना अभिवादन केले. यावेळी सर्व पूजापाठ हे घरीच आयोजित केले होते.