शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
2
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
4
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
5
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
6
₹२००० नं महाग झालं सोनं, चांदीच्या दरातही ३ हजारांपेक्षा अधिक वाढ; अजून किती वाढ होणार?
7
प्रेयसीला गोळी मारून प्रियकरानं स्वत:वरही झाडली गोळी; ७ वर्षात प्रेमात अचानक दुरावा का आला?
8
'या' सरकारी App द्वारे ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार! 'या' राज्यांमध्ये सुविधा सुरू
9
यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली दिल्ली स्फोटाची ‘लाइव्ह’ घटना, पाहा धक्कादायक व्हिडिओ...
10
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
11
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
12
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
13
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
14
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
15
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
16
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
17
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
18
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
19
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
20
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग

राजापुरात उद्यापासून एक दिवस पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:33 IST

राजापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सद्य:स्थितीत ...

राजापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सद्य:स्थितीत कोदवली धरणातून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील काही भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे सोमवार, दि. ५ एपिलपासून शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

राजापूर शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ जॅकवेल व कोदवली येथील सायबाचे धरण असे दोन नैसर्गिक स्त्राेत आहेत. त्यापैकी कोदवली येथील सायबाच्या धरणावरून कमी खर्चामध्ये शहराला पाणी पुरविता येते. गेल्या काही वर्षांतं धरणाला माेठ्या प्रमाणात गळती लागली असून, धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळही साचला गेला आहे. परिणामी धरणामध्ये पाण्याचा साठाच होणे अवघड बनले आहे.

कोदवली धरणातील नैसर्गिक जलस्त्रोताचे पाणी राजापूर शहरवासीयांना जेमतेम आठ-नऊ महिनेच पुरते. उर्वरित तीन-चार महिन्यांसाठी नगर परिषदेला शीळ येथील जॅकवेलवर अवलंबून रहावे लागले. या शीळ जॅकवेलवरून राजापूर शहराला बऱ्यापैकी पाणी मिळत असले तरी हे पाणी खर्चिक ठरत आहे. त्यातच वीज भार नियमनामुळे शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यात नगर परिषदेला अनंत अडचणींना सामोरे जावे लागते.

कोदवली येथील सायबाच्या धरणातून वाहणारा नैसर्गिक जलस्त्राेत गुरुत्वाकर्षण पद्धतीने फिरवून त्याद्वारे नगर परिषद शहरवासीयांना पाणीपुरवठा करत आहे. सायबाच्या धरणातून वाहणारा नैसर्गिक जलस्त्रोतही आता मोठ्या प्रमाणात कमी होत आला असून, यावर्षी राजापूरकरांवर एप्रिल महिन्यामध्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. सद्य:स्थितीत कोदवली धरणातून येणारे पाणी कमी झाल्याने शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. शिवाय पाणीपुरवठ्याच्या वेळही विस्कळीत झाला आहे. शिवाय शीळ जॅकवेलवरून पाणीपुरवठा करताना वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे काही भागाला आतापासूनच पाणीटंचाई जाणवत आहेत. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना नगर परिषदेने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. टंचाई काळात शहरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी केले आहे.