शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
4
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
5
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
6
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
7
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
8
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
9
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
10
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
11
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
12
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
13
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
14
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
15
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
16
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
17
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
18
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
19
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
20
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात उद्यापासून एक दिवस पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:33 IST

राजापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सद्य:स्थितीत ...

राजापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सद्य:स्थितीत कोदवली धरणातून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील काही भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे सोमवार, दि. ५ एपिलपासून शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

राजापूर शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ जॅकवेल व कोदवली येथील सायबाचे धरण असे दोन नैसर्गिक स्त्राेत आहेत. त्यापैकी कोदवली येथील सायबाच्या धरणावरून कमी खर्चामध्ये शहराला पाणी पुरविता येते. गेल्या काही वर्षांतं धरणाला माेठ्या प्रमाणात गळती लागली असून, धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळही साचला गेला आहे. परिणामी धरणामध्ये पाण्याचा साठाच होणे अवघड बनले आहे.

कोदवली धरणातील नैसर्गिक जलस्त्रोताचे पाणी राजापूर शहरवासीयांना जेमतेम आठ-नऊ महिनेच पुरते. उर्वरित तीन-चार महिन्यांसाठी नगर परिषदेला शीळ येथील जॅकवेलवर अवलंबून रहावे लागले. या शीळ जॅकवेलवरून राजापूर शहराला बऱ्यापैकी पाणी मिळत असले तरी हे पाणी खर्चिक ठरत आहे. त्यातच वीज भार नियमनामुळे शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यात नगर परिषदेला अनंत अडचणींना सामोरे जावे लागते.

कोदवली येथील सायबाच्या धरणातून वाहणारा नैसर्गिक जलस्त्राेत गुरुत्वाकर्षण पद्धतीने फिरवून त्याद्वारे नगर परिषद शहरवासीयांना पाणीपुरवठा करत आहे. सायबाच्या धरणातून वाहणारा नैसर्गिक जलस्त्रोतही आता मोठ्या प्रमाणात कमी होत आला असून, यावर्षी राजापूरकरांवर एप्रिल महिन्यामध्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. सद्य:स्थितीत कोदवली धरणातून येणारे पाणी कमी झाल्याने शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. शिवाय पाणीपुरवठ्याच्या वेळही विस्कळीत झाला आहे. शिवाय शीळ जॅकवेलवरून पाणीपुरवठा करताना वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे काही भागाला आतापासूनच पाणीटंचाई जाणवत आहेत. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना नगर परिषदेने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. टंचाई काळात शहरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी केले आहे.