शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

रत्नागिरी जिल्ह्यातील गावठाणाचे भोगवटादार झाले घरमालक, ड्रोनद्वारे सर्वेक्षण

By शोभना कांबळे | Updated: August 11, 2023 17:01 IST

भूमिअभिलेख विभागाकडून ५६४ पैकी ३५० गावांमधील चाैकशी पूर्ण होणार

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील ५६४ गावांमध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले असून ४४ गावांमधील १३४ सनद जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाकडे प्राप्त झाल्या असून त्याचे वितरणही करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या ४४ गावांमधील गावठाणांमध्ये वर्षानुवर्षे वास्तव्य करून राहणाऱ्या भोगवटादारांना त्यांचे हक्काचे घर मिळाले असून प्रत्येकाला आपापल्या मालकीचा अचूक अधिकार अभिलेख मिळाला आहे.शासनाने २०१९ साली गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ५६४ गावे यासाठी निश्चित करण्यात आली. या गावांमध्ये भूमिअभिलेख विभागाकडून ड्रोनफ्लायद्वारे सर्वेक्षण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत या गावांपैकी ३५० गावांचे ड्रोनफ्लाय पूर्ण झाले असून चाैकशी सुरू आहे. तर १३४ सनदांचे वाटप ४४ गावांमध्ये करण्यात आले. त्यामुळे या ४४ गावांमधील १३४ जणांना त्यांच्या नावाची मालमत्तापत्रिका (प्राॅपर्टी कार्ड) मिळाल्याने त्यांना त्यांच्या मालकीचे घर मिळाले आहे. या सनद वितरणातून जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयालाही १२ लाखांचे सनद शुल्क मिळाले आहे.५६४ गावांपैकी ३५० गावांमध्येही आता चाैकशी पूर्ण होत आली असून या गावठाणातील रहिवाशांची मालमत्ता प्राॅपर्टी कार्ड आणि सनद मिळण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे लवकरच या गावठाणांमधील भोगवटादारांनाही त्यांच्या घराची मालकी मिळण्यास मदत होणार आहे. नोव्हेंबर २०२३ पर्यंत या सर्व ५६४ गावठाणांमधील भाेगवटादारांना प्राॅपर्टी कार्ड आणि सनद देण्याचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने भूमिअभिलेख कार्यालयाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

९३० गावांमध्येही गावठाणे घोषित होणारड्रोनफ्लाय झालेली ६४ गावे आणि त्याआधीची भूनगरमापन झालेली ६३ गावे धरून एकूण ६२७ गावांचे सर्वेक्षण झालेले आहे. जिल्ह्यात एकूण १,५५७ महसूल गावे आहेत. त्यापैकी मोजणी झालेल्या ६२७ गावांना वगळता अजूनही ९३० गावे शिल्लक आहेत. या गावांमध्येही गावठाण घोषित करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. त्यामुळे ही गावठाणे घोषित झाल्यानंतर या गावांमध्येही ड्रोनफ्लायद्वारे सर्वेक्षणाचे काम भूमिअभिलेख कार्यालयाकडून हाती घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ५६४ गावांमध्ये ड्राेनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी ४४ गावांमध्ये १३४ सनदांचे वितरण करण्यात आले आहे. ३५० गावांमध्ये चाैकशी सुरू आहे. लवकरच या गावांच्या सनदाही प्राप्त झाल्यानंतर त्यांचे वितरण करण्यात येईल. - एन.एन. पटेल, जिल्हा अधीक्षक, भूमिअभिलेख, रत्नागिरी

....तालुका   गावठाणे   चाैकशी पूर्ण    सनद प्राप्तमंडणगड      १०५              ९२          ४२          दापोली         १३३              ६३          २०खेड             १६६              ७०          --चिपळूण       ८१                ५९         ३६गुहागर         ३९               ३३          २१रत्नागिरी       २३               २१          ९संगमेश्वर       १५               १०         ४लांजा            २                 २           २एकूण          ५६४            ३५०       ९३०

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHomeसुंदर गृहनियोजन