शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रत्नागिरी जिल्ह्यातील गावठाणाचे भोगवटादार झाले घरमालक, ड्रोनद्वारे सर्वेक्षण

By शोभना कांबळे | Updated: August 11, 2023 17:01 IST

भूमिअभिलेख विभागाकडून ५६४ पैकी ३५० गावांमधील चाैकशी पूर्ण होणार

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील ५६४ गावांमध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले असून ४४ गावांमधील १३४ सनद जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाकडे प्राप्त झाल्या असून त्याचे वितरणही करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या ४४ गावांमधील गावठाणांमध्ये वर्षानुवर्षे वास्तव्य करून राहणाऱ्या भोगवटादारांना त्यांचे हक्काचे घर मिळाले असून प्रत्येकाला आपापल्या मालकीचा अचूक अधिकार अभिलेख मिळाला आहे.शासनाने २०१९ साली गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ५६४ गावे यासाठी निश्चित करण्यात आली. या गावांमध्ये भूमिअभिलेख विभागाकडून ड्रोनफ्लायद्वारे सर्वेक्षण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत या गावांपैकी ३५० गावांचे ड्रोनफ्लाय पूर्ण झाले असून चाैकशी सुरू आहे. तर १३४ सनदांचे वाटप ४४ गावांमध्ये करण्यात आले. त्यामुळे या ४४ गावांमधील १३४ जणांना त्यांच्या नावाची मालमत्तापत्रिका (प्राॅपर्टी कार्ड) मिळाल्याने त्यांना त्यांच्या मालकीचे घर मिळाले आहे. या सनद वितरणातून जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयालाही १२ लाखांचे सनद शुल्क मिळाले आहे.५६४ गावांपैकी ३५० गावांमध्येही आता चाैकशी पूर्ण होत आली असून या गावठाणातील रहिवाशांची मालमत्ता प्राॅपर्टी कार्ड आणि सनद मिळण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे लवकरच या गावठाणांमधील भोगवटादारांनाही त्यांच्या घराची मालकी मिळण्यास मदत होणार आहे. नोव्हेंबर २०२३ पर्यंत या सर्व ५६४ गावठाणांमधील भाेगवटादारांना प्राॅपर्टी कार्ड आणि सनद देण्याचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने भूमिअभिलेख कार्यालयाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

९३० गावांमध्येही गावठाणे घोषित होणारड्रोनफ्लाय झालेली ६४ गावे आणि त्याआधीची भूनगरमापन झालेली ६३ गावे धरून एकूण ६२७ गावांचे सर्वेक्षण झालेले आहे. जिल्ह्यात एकूण १,५५७ महसूल गावे आहेत. त्यापैकी मोजणी झालेल्या ६२७ गावांना वगळता अजूनही ९३० गावे शिल्लक आहेत. या गावांमध्येही गावठाण घोषित करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. त्यामुळे ही गावठाणे घोषित झाल्यानंतर या गावांमध्येही ड्रोनफ्लायद्वारे सर्वेक्षणाचे काम भूमिअभिलेख कार्यालयाकडून हाती घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ५६४ गावांमध्ये ड्राेनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी ४४ गावांमध्ये १३४ सनदांचे वितरण करण्यात आले आहे. ३५० गावांमध्ये चाैकशी सुरू आहे. लवकरच या गावांच्या सनदाही प्राप्त झाल्यानंतर त्यांचे वितरण करण्यात येईल. - एन.एन. पटेल, जिल्हा अधीक्षक, भूमिअभिलेख, रत्नागिरी

....तालुका   गावठाणे   चाैकशी पूर्ण    सनद प्राप्तमंडणगड      १०५              ९२          ४२          दापोली         १३३              ६३          २०खेड             १६६              ७०          --चिपळूण       ८१                ५९         ३६गुहागर         ३९               ३३          २१रत्नागिरी       २३               २१          ९संगमेश्वर       १५               १०         ४लांजा            २                 २           २एकूण          ५६४            ३५०       ९३०

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHomeसुंदर गृहनियोजन