शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

आरक्षणासाठी ओबीसींचा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 12:07 IST

OBC Reservation, ratnagiri, collector office ओबीसींना आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी सकल ओबीसी समाजातर्फे गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सनदशीर मार्गाने आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देआरक्षणासाठी ओबीसींचा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाआरक्षण बचाव आंदोलन, मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी निवेदन सादर

रत्नागिरी : ओबीसींना आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी सकल ओबीसी समाजातर्फे गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सनदशीर मार्गाने आरक्षण बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले.ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. राज्यशासनाबरोबरच केंद्र शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. समाज वर्षानुवर्षे शासनाच्या विविध लाभांपासून वंचित आहे. त्यामुळे या समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ओबीसी आणि अन्य सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर शांततेत आंदोलन करण्यात आली. रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही हे आंदोलन झाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी विविध फलकांच्या माध्यमातून शासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.जातनिहाय जनगणना करण्यात यावी, मराठा जातीचे ओबीसीकरण नको, ओबीसींचा शासकीय सेवेतील अनुशेष भरावा व मेगा भरती त्वरीत करण्यात यावी, ओबीसींना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, आदिवासी जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण पूर्वरत करावे, ओबीसींच्या महाज्योती या संस्थेसाठी १००० कोटीची तरतूद करावी, आर्थिक विकास महामंडळांना भरीव निधीची तरतूद करावी.

राज्यात १०० बिंदु नामावली लागू करावी, शासकीय सेवेतील ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण मिळावे. ओबीसी शेतकरी, शेतमजूर व कारागिरांना ६० वर्षे वयानंतर पेन्शन योजना चालू करावी. आणि ओबीसी बहुजन कल्याण विभागाची कार्यालये प्रत्येक जिल्ह्यात सुरू करावीत. तसेच मंडल आयोगाची १०० टक्के अंमलबजावणी व्हावी, या आंदोलनाच्या मुख्य मागण्या आहेत.रत्नागिरीत अतिशय शांततेत आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी हे निवेदन स्वीकारले. या आंदोलनाची दखल शासनाने न घेतल्यास ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा ओबीसी संघर्ष समन्वय समितीतर्फे या निवेदनात देण्यात आला आहे.

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणRatnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी