शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray : आता उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जाणं राज्याला परवडणारं नाही : राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 20:47 IST

राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्ग, बारसू रिफायनसी, राज्यातील राजकीय वातावरण अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

शनिवारी रत्नागिरीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी मुंबई गोवा महामार्ग, बारसू रिफायनसी, राज्यातील राजकीय वातावरण अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी आता उद्योग महाराष्ट्राबाहेर जाणं हे महाराष्ट्राला परवडणारं नसल्याचं म्हटलं.

“महाराष्ट्रातील तरूणांना तरुणींना त्यांच्या भवितव्यासाठी भविष्यासाठी या गोष्टी परवडणाऱ्या नाहीत. मूळात पहिल्यांदा जमिनी द्यायच्या नव्हत्या. पण आज ज्या गोष्टी करून ठेवल्यात त्यामुळे महाराष्ट्र विचित्र परिस्थितीत सापडलाय. उद्या महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अशी होईल की सरकारमध्ये पगार देणं शक्य होणार नाही. तेव्हा सरकार कोणाचंही असेल ते पडेल,” असं राज ठाकरे म्हणाले.  युनेस्कोनं जगभरातल्या १९२ देशांसोबत करार आहेत. त्यात भारतही आहे. युनेस्कोच्या अंतर्गत येणाऱ्या गोष्टी आहेत त्यानंतर ती संस्था ठरवते त्याच्या बाजूला डेव्हलपमेंट होणार की नाही होणार. हजारो वर्ष जुन्या वास्तूंच्या बाजूला डेव्हलपमेंट करता येत नाही. आमच्याकडे जमिनी विकल्या, युनेस्को काय आहे हे माहितच नाही. उद्या त्यांनी सांगितलं की सरकारला करावंच लागेल. कातळ शिल्पांच्या बाजूला किलोमीटरचा बफर एरिया असतो, त्या ठिकाणी काही करता येत नाही, असं त्यांनी यावेळी नमूद केलं.

“तुम्हाला सतत अंधारात ठेवलं जातं. तुमच्यापर्यंत गोष्टी पोहोचू देत नाही, तुमच्या जमिनी हडपल्या जातात. जमिन घ्यायला कोणी आलं तर त्याला कशासाठी आलायस विचारा. जमिनी तुमची ठेवा, तिच जमिन तुम्हाला पैसे देईल. या निवडून आलेल्यांना घरी बसवा. तुमचा राग व्यक्त होऊ दे,” असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

अनेक प्रश्न प्रलंबित

आज कोकणात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते उभे राहण्याची कारणं तुम्ही आहात. तुम्ही त्याच त्याच व्यापारी लोकप्रतिनिधींना निवडून देऊन, पक्षाला निवडून दिलं, त्यांनी कोकणाचा व्यापार केला. तुम्ही तिकडेच आहात, असं ते यावेळी म्हणाले. २००७ ला सुरू झालेला मुंबई गोवा रस्ता अजूनही काही नाही. मधले पॅचेस झालेत. मी मागेही फडणवीसांना फोन केला. मला त्यांनी गडकरींशी बोलायला सांगितलं. त्यांना मी फोन केला. तेव्हा त्यांनी कॉन्ट्रॅक्टर पळून गेल्याचं सांगितलं. ज्यांना आजवर निवडून दिलं त्यांनी आजवर यावर काही विचारलं का? या लोकांना मतदानाशी संबंधित विषय आहे फक्त. तोच समृद्धी महामार्ग पाहा. सुरू पण झाला आणि तेही चार वर्षात. नागपूर ते शिर्डी आणि पुढचं काम सुरू आहे, आता गाड्या फिरतायत. १६ वर्ष आमचा रस्ता पूर्ण होत नसल्याचं खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRatnagiriरत्नागिरी