शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

Raj Thackeray : आता उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जाणं राज्याला परवडणारं नाही : राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 20:47 IST

राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्ग, बारसू रिफायनसी, राज्यातील राजकीय वातावरण अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

शनिवारी रत्नागिरीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी मुंबई गोवा महामार्ग, बारसू रिफायनसी, राज्यातील राजकीय वातावरण अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी आता उद्योग महाराष्ट्राबाहेर जाणं हे महाराष्ट्राला परवडणारं नसल्याचं म्हटलं.

“महाराष्ट्रातील तरूणांना तरुणींना त्यांच्या भवितव्यासाठी भविष्यासाठी या गोष्टी परवडणाऱ्या नाहीत. मूळात पहिल्यांदा जमिनी द्यायच्या नव्हत्या. पण आज ज्या गोष्टी करून ठेवल्यात त्यामुळे महाराष्ट्र विचित्र परिस्थितीत सापडलाय. उद्या महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अशी होईल की सरकारमध्ये पगार देणं शक्य होणार नाही. तेव्हा सरकार कोणाचंही असेल ते पडेल,” असं राज ठाकरे म्हणाले.  युनेस्कोनं जगभरातल्या १९२ देशांसोबत करार आहेत. त्यात भारतही आहे. युनेस्कोच्या अंतर्गत येणाऱ्या गोष्टी आहेत त्यानंतर ती संस्था ठरवते त्याच्या बाजूला डेव्हलपमेंट होणार की नाही होणार. हजारो वर्ष जुन्या वास्तूंच्या बाजूला डेव्हलपमेंट करता येत नाही. आमच्याकडे जमिनी विकल्या, युनेस्को काय आहे हे माहितच नाही. उद्या त्यांनी सांगितलं की सरकारला करावंच लागेल. कातळ शिल्पांच्या बाजूला किलोमीटरचा बफर एरिया असतो, त्या ठिकाणी काही करता येत नाही, असं त्यांनी यावेळी नमूद केलं.

“तुम्हाला सतत अंधारात ठेवलं जातं. तुमच्यापर्यंत गोष्टी पोहोचू देत नाही, तुमच्या जमिनी हडपल्या जातात. जमिन घ्यायला कोणी आलं तर त्याला कशासाठी आलायस विचारा. जमिनी तुमची ठेवा, तिच जमिन तुम्हाला पैसे देईल. या निवडून आलेल्यांना घरी बसवा. तुमचा राग व्यक्त होऊ दे,” असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

अनेक प्रश्न प्रलंबित

आज कोकणात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते उभे राहण्याची कारणं तुम्ही आहात. तुम्ही त्याच त्याच व्यापारी लोकप्रतिनिधींना निवडून देऊन, पक्षाला निवडून दिलं, त्यांनी कोकणाचा व्यापार केला. तुम्ही तिकडेच आहात, असं ते यावेळी म्हणाले. २००७ ला सुरू झालेला मुंबई गोवा रस्ता अजूनही काही नाही. मधले पॅचेस झालेत. मी मागेही फडणवीसांना फोन केला. मला त्यांनी गडकरींशी बोलायला सांगितलं. त्यांना मी फोन केला. तेव्हा त्यांनी कॉन्ट्रॅक्टर पळून गेल्याचं सांगितलं. ज्यांना आजवर निवडून दिलं त्यांनी आजवर यावर काही विचारलं का? या लोकांना मतदानाशी संबंधित विषय आहे फक्त. तोच समृद्धी महामार्ग पाहा. सुरू पण झाला आणि तेही चार वर्षात. नागपूर ते शिर्डी आणि पुढचं काम सुरू आहे, आता गाड्या फिरतायत. १६ वर्ष आमचा रस्ता पूर्ण होत नसल्याचं खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRatnagiriरत्नागिरी