शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

आता अ‍ॅपवरून सांगा कुठलं पुस्तक हवंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 14:08 IST

literature, library, Ratnagirinews सरकार वाचनालये सुरू करण्यास परवानगी देत नसल्याने आता पुस्तके लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा उपक्रम रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने हाती घेतला आहे. त्यासाठी वाचनालयाच्या अ‍ॅपवरून पुस्तकाची मागणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाचक प्रेरणा दिनापासून हा उपक्रम सुरू होत असल्याची घोषणा वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.

ठळक मुद्दे रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचा नवा उपक्रम वाचनालयाच्या सभासदांना घरपोच मिळणार पुस्तक

रत्नागिरी : सरकार वाचनालये सुरू करण्यास परवानगी देत नसल्याने आता पुस्तके लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा उपक्रम रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने हाती घेतला आहे. त्यासाठी वाचनालयाच्या अ‍ॅपवरून पुस्तकाची मागणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाचक प्रेरणा दिनापासून हा उपक्रम सुरू होत असल्याची घोषणा वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.कोरोनामुळे अद्याप वाचनालये बंद आहेत. वाचनालयांना परवानगी मिळाली तरी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना वाचनालयात येणे अशक्य आहे. त्यामुळे वाचनालयाने वाचकांसाठी घरपोच पुस्तके योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. वाचक सभासदांसाठी त्यांच्या मागणीनुसार महिन्यातून दोन वेळा पुस्तक बदलून नवीन पुस्तक घरपोच दिले जाणार आहे.

जिल्हा नगर वाचनालयाचे अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेऊन त्या अ‍ॅपमधून वाचकांना हवे असणारे पुस्तक निवडून त्याचा क्रमांक वाचनालयात दूरध्वनीद्वारे अथवा मोबाईल द्वारे नोंदवता येईल. नोंदणी केल्यानंतर पुढच्या दिवशी अथवा सोयीनुसार संबंधित पुस्तक वाचकांना पाठविण्यात येणार आहे. जुने पुस्तक वाचकाने वाचनालयाच्या संबंधित पुस्तक घेऊन आलेल्या प्रतिनिधीकडे जमा केल्यानंतर नवीन पुस्तक वाचकाला उपलब्ध करून देण्यात येईल. महिन्यातून दोन वेळा पुस्तक बदलून देण्याची ही सेवा दिली जाणार आहे.

''घरपोच पुस्तक पोच योजनेबरोबरच काही डिजिटल आॅडिओ बुक्स सुविधा प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. वाचनालयाच्या सर्वच उपक्रमांना वाचक सभासद भरघोस प्रतिसाद देतात. तसाच प्रतिसाद नव्याने सुरू होत असलेल्या योजनेलाही वाचक देतील, अशी अपेक्षा आहे.''अ‍ॅड. दीपक पटवर्धन, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय.

टॅग्स :libraryवाचनालयliteratureसाहित्यRatnagiriरत्नागिरी