शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

आता कोकणातही पिकणार बासमतीसारखा तांदूळ

By मेहरून नाकाडे | Updated: March 22, 2023 14:55 IST

कृषी विद्यापीठाच्या भात संशोधन केंद्राचे नवे वाण तयार. 

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : तोंडाला पाणी सुटावं असा बारीक आणि लांब बासमती तांदूळ पुलाव, बिर्याणीची लज्जत वाढवतो. सद्यस्थितीत हा तांदूळ अन्य राज्यातून येतो. मात्र आता डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव (रत्नागिरी) येथील भात संशोधन केंद्रात ‘रत्नागिरी १५ एम. एस ५२ हे नवीन वाण विकसित करण्यात यश आले आहे. बासमतीसारखाच लांब असलेल्या या तांदळाचे वाण भातासह पोह्यांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. २०२४-२५ या खरीप हंगामात हे वाण शेतकऱ्यांसाठी सर्वत्र उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीपासून सर्वांना कोकणातील बासमती खायला मिळेल.

बासमतीचे उत्पादन परराज्यात होते. या तांदळाला असलेली मागणी, त्यातून वाढू शकणारे उत्पन्न विचारात घेता शिरगाव (ता. रत्नागिरी) भात संशोधन केंद्रात याबाबत संशोधन सुरू होते. आता या हळव्या जातीचे वाण विकसित करण्यास संशोधन केंद्राला यश आले आहे.

गेल्या खरीप हंगामात रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे, शिरगाव, गाेळप तसेच सिंधुदुर्गातील काही शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर ही लागवड केली होती. प्रति हेक्टर ४५ ते ५० क्विंटल भात उपलब्ध झाल्याने हे वाण यशस्वी ठरले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालगड, ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रयोगासाठी हे वाण दिले जाणार असून, २०२४-२५च्या खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांसाठी हे वाण बाजारात उपलब्ध असेल.

नव्या जातीची वैशिष्ट्ये१) १२० ते १२२ दिवसांत तयार होणारे हळवे वाण२) लांब, बारीक दाणा (७ मिलीमीटर लांब)३) सुवासिक भात४) हेक्टरी ४५ ते ४० क्विंटल उत्पादन५) कोकणच्या लाल मातीत, हवामानात तयार होतो.६) तांदूळासह पोहेही उत्तम प्रतीचे होतात.नामकरण होणारसंशोधन पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्याची उत्पादकता तपासली जात आहे. तूर्तास ‘रत्नागिरी १५ एम. एस. ५२’ हे त्याचे नाव असले तरी या भातासाठी उपयुक्त नाव देण्यात येणार आहे.

कोकणासाठी उपयुक्तशिरगाव येथील धनंजय दाते, कोतवडे येथील मारुती मांडवकर यांनी खरीप हंगामात प्रायोगिक तत्त्वावर रत्नागिरी १५ एम.एस. ५२ वाणाची लागवड करून उत्पादन घेतले होते. दोन्ही शेतकऱ्यांनी कोकणच्या लाल मातीत हे उत्पादन घेण्यास उपयुक्त असून, उत्पादकताही चांगली असल्याची समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केली.कोकणातील हवामानात तयार होणारे, लांब, बारीक व सुवासिक वाण विकसित करण्यास यश आले आहे. हे हळवे वाण असून, वरकस जमिनीत सावली नसलेल्या क्षेत्रात पीक चांगले येते. उत्पादकता चांगली आहे. हे भात रबर सेलरवर भरडाई केल्यास तुकडा न होता अखंड तांदूळ मिळेल.विजय दळवी, संशोधन अधिकारी, भात संशोधन केंद्र, शिरगाव

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरी