शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

आता कोकणातही पिकणार बासमतीसारखा तांदूळ

By मेहरून नाकाडे | Updated: March 22, 2023 14:55 IST

कृषी विद्यापीठाच्या भात संशोधन केंद्राचे नवे वाण तयार. 

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : तोंडाला पाणी सुटावं असा बारीक आणि लांब बासमती तांदूळ पुलाव, बिर्याणीची लज्जत वाढवतो. सद्यस्थितीत हा तांदूळ अन्य राज्यातून येतो. मात्र आता डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव (रत्नागिरी) येथील भात संशोधन केंद्रात ‘रत्नागिरी १५ एम. एस ५२ हे नवीन वाण विकसित करण्यात यश आले आहे. बासमतीसारखाच लांब असलेल्या या तांदळाचे वाण भातासह पोह्यांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. २०२४-२५ या खरीप हंगामात हे वाण शेतकऱ्यांसाठी सर्वत्र उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीपासून सर्वांना कोकणातील बासमती खायला मिळेल.

बासमतीचे उत्पादन परराज्यात होते. या तांदळाला असलेली मागणी, त्यातून वाढू शकणारे उत्पन्न विचारात घेता शिरगाव (ता. रत्नागिरी) भात संशोधन केंद्रात याबाबत संशोधन सुरू होते. आता या हळव्या जातीचे वाण विकसित करण्यास संशोधन केंद्राला यश आले आहे.

गेल्या खरीप हंगामात रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे, शिरगाव, गाेळप तसेच सिंधुदुर्गातील काही शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर ही लागवड केली होती. प्रति हेक्टर ४५ ते ५० क्विंटल भात उपलब्ध झाल्याने हे वाण यशस्वी ठरले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालगड, ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रयोगासाठी हे वाण दिले जाणार असून, २०२४-२५च्या खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांसाठी हे वाण बाजारात उपलब्ध असेल.

नव्या जातीची वैशिष्ट्ये१) १२० ते १२२ दिवसांत तयार होणारे हळवे वाण२) लांब, बारीक दाणा (७ मिलीमीटर लांब)३) सुवासिक भात४) हेक्टरी ४५ ते ४० क्विंटल उत्पादन५) कोकणच्या लाल मातीत, हवामानात तयार होतो.६) तांदूळासह पोहेही उत्तम प्रतीचे होतात.नामकरण होणारसंशोधन पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्याची उत्पादकता तपासली जात आहे. तूर्तास ‘रत्नागिरी १५ एम. एस. ५२’ हे त्याचे नाव असले तरी या भातासाठी उपयुक्त नाव देण्यात येणार आहे.

कोकणासाठी उपयुक्तशिरगाव येथील धनंजय दाते, कोतवडे येथील मारुती मांडवकर यांनी खरीप हंगामात प्रायोगिक तत्त्वावर रत्नागिरी १५ एम.एस. ५२ वाणाची लागवड करून उत्पादन घेतले होते. दोन्ही शेतकऱ्यांनी कोकणच्या लाल मातीत हे उत्पादन घेण्यास उपयुक्त असून, उत्पादकताही चांगली असल्याची समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केली.कोकणातील हवामानात तयार होणारे, लांब, बारीक व सुवासिक वाण विकसित करण्यास यश आले आहे. हे हळवे वाण असून, वरकस जमिनीत सावली नसलेल्या क्षेत्रात पीक चांगले येते. उत्पादकता चांगली आहे. हे भात रबर सेलरवर भरडाई केल्यास तुकडा न होता अखंड तांदूळ मिळेल.विजय दळवी, संशोधन अधिकारी, भात संशोधन केंद्र, शिरगाव

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरी