शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

आता कोकणातही पिकणार बासमतीसारखा तांदूळ

By मेहरून नाकाडे | Updated: March 22, 2023 14:55 IST

कृषी विद्यापीठाच्या भात संशोधन केंद्राचे नवे वाण तयार. 

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : तोंडाला पाणी सुटावं असा बारीक आणि लांब बासमती तांदूळ पुलाव, बिर्याणीची लज्जत वाढवतो. सद्यस्थितीत हा तांदूळ अन्य राज्यातून येतो. मात्र आता डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव (रत्नागिरी) येथील भात संशोधन केंद्रात ‘रत्नागिरी १५ एम. एस ५२ हे नवीन वाण विकसित करण्यात यश आले आहे. बासमतीसारखाच लांब असलेल्या या तांदळाचे वाण भातासह पोह्यांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. २०२४-२५ या खरीप हंगामात हे वाण शेतकऱ्यांसाठी सर्वत्र उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीपासून सर्वांना कोकणातील बासमती खायला मिळेल.

बासमतीचे उत्पादन परराज्यात होते. या तांदळाला असलेली मागणी, त्यातून वाढू शकणारे उत्पन्न विचारात घेता शिरगाव (ता. रत्नागिरी) भात संशोधन केंद्रात याबाबत संशोधन सुरू होते. आता या हळव्या जातीचे वाण विकसित करण्यास संशोधन केंद्राला यश आले आहे.

गेल्या खरीप हंगामात रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे, शिरगाव, गाेळप तसेच सिंधुदुर्गातील काही शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर ही लागवड केली होती. प्रति हेक्टर ४५ ते ५० क्विंटल भात उपलब्ध झाल्याने हे वाण यशस्वी ठरले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालगड, ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रयोगासाठी हे वाण दिले जाणार असून, २०२४-२५च्या खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांसाठी हे वाण बाजारात उपलब्ध असेल.

नव्या जातीची वैशिष्ट्ये१) १२० ते १२२ दिवसांत तयार होणारे हळवे वाण२) लांब, बारीक दाणा (७ मिलीमीटर लांब)३) सुवासिक भात४) हेक्टरी ४५ ते ४० क्विंटल उत्पादन५) कोकणच्या लाल मातीत, हवामानात तयार होतो.६) तांदूळासह पोहेही उत्तम प्रतीचे होतात.नामकरण होणारसंशोधन पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्याची उत्पादकता तपासली जात आहे. तूर्तास ‘रत्नागिरी १५ एम. एस. ५२’ हे त्याचे नाव असले तरी या भातासाठी उपयुक्त नाव देण्यात येणार आहे.

कोकणासाठी उपयुक्तशिरगाव येथील धनंजय दाते, कोतवडे येथील मारुती मांडवकर यांनी खरीप हंगामात प्रायोगिक तत्त्वावर रत्नागिरी १५ एम.एस. ५२ वाणाची लागवड करून उत्पादन घेतले होते. दोन्ही शेतकऱ्यांनी कोकणच्या लाल मातीत हे उत्पादन घेण्यास उपयुक्त असून, उत्पादकताही चांगली असल्याची समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केली.कोकणातील हवामानात तयार होणारे, लांब, बारीक व सुवासिक वाण विकसित करण्यास यश आले आहे. हे हळवे वाण असून, वरकस जमिनीत सावली नसलेल्या क्षेत्रात पीक चांगले येते. उत्पादकता चांगली आहे. हे भात रबर सेलरवर भरडाई केल्यास तुकडा न होता अखंड तांदूळ मिळेल.विजय दळवी, संशोधन अधिकारी, भात संशोधन केंद्र, शिरगाव

टॅग्स :konkanकोकणRatnagiriरत्नागिरी