शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

मँगोनेटद्वारे अद्याप आंब्याची निर्यात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 06:01 IST

परदेशात दर्जेदार आंब्याची निर्यात करून शेतकऱ्यांना चांगले अर्थाजन व्हावे यासाठी शासनाने ‘मँगोनेट’ सुविधा सुरू केली. गेली चार वर्षे ही योजना सुरू आहे परंतु गतवर्षी पहिल्यांदाच ‘मँगोनेट’ प्रणालीद्वारे जिल्ह्यातील तीन शेतक-यांचा आंबा कुवेत व रशियामध्ये निर्यात झाला होता. यावर्षी मँगोनेटद्वारे अद्याप निर्यात झालेली नाही. त्यामुळे या निर्यातीत रत्नागिरी जिल्हा पीछाडीवर आहे.

रत्नागिरी  - परदेशात दर्जेदार आंब्याची निर्यात करून शेतकऱ्यांना चांगले अर्थाजन व्हावे यासाठी शासनाने ‘मँगोनेट’ सुविधा सुरू केली. गेली चार वर्षे ही योजना सुरू आहे परंतु गतवर्षी पहिल्यांदाच ‘मँगोनेट’ प्रणालीद्वारे जिल्ह्यातील तीन शेतक-यांचा आंबा कुवेत व रशियामध्ये निर्यात झाला होता. यावर्षी मँगोनेटद्वारे अद्याप निर्यात झालेली नाही. त्यामुळे या निर्यातीत रत्नागिरी जिल्हा पीछाडीवर आहे.गतवर्षी मँगोनेट प्रणालीतंर्गत जिल्ह्यातील एकूण २ हजार ८४ शेतकºयांनी मँगोनेट प्रणालीद्वारे नोंदणी झाली होती. यावर्षी चिपळूण तालुक्यातील ३ व गुहागर तालुक्यातील २ मिळून एकूण ५ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. शेतकºयांच्या अल्प प्रतिसादामुळेच दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आंबा बागांची नोंदणी करण्यात आली आहे. गतवर्षी थेट रशिया व कुवेतसाठी आंबा निर्यात करण्यात आला होता. अनिकेत हर्षे (नेवरे), डॉ.खलिफे (राजापूर), सचिन लांजेकर (रत्नागिरी) यांनी आंबा निर्यात करण्याचा मान पटकाविला आहे. यावर्षी मँगोनेटद्वारे जिल्ह्यातून एकही आंबा निर्यात करण्यात आलेला नाही.जुन्या निकषांद्वारेच प्रक्रिया सुरूहापूसची साल पातळ आहे. परंतु ४७ अंश सेल्सियसला ५० मिनिटे आंब्यावर प्रक्रिया करावी अशी सूचना करण्यात आली होती. याबाबत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करून अहवाल पुढे पाठविला होता. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्यामुळे जुन्या निकषांद्वारेच आंब्यावर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :MangoआंबाMaharashtraमहाराष्ट्र