शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

त्यांना विचार नाही, बाळासाहेबांचे पैसे हवे होते; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सणसणीत टीका

By मनोज मुळ्ये | Updated: January 8, 2024 15:18 IST

'शिवसेनेच्या खात्यात असलेले ५० कोटी रुपये त्यांना हवे होते'

राजापूर : आमदार, खासदारांसह अनेकजण आमच्या मूळ शिवसेनेत आहेत. धनुष्यबाणही आपल्याकडेच आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी ही भूमिका घेतली. पण त्यांना बाळासाहेबांचे विचार नको होते. त्यांना बाळासाहेबांचे पैसे हवे होते. शिवसेनेच्या खात्यात असलेले ५० कोटी रुपये त्यांना हवे होते, अशी सणसणीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.राजापूरमध्ये आयोजित शिवसंकल्प मेळाव्यात ते बोलत होते. अब की बार ४५ पार अशी घोषणाही त्यांनी केली. या मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अनेकदा टीका केली.बाळासाहेब म्हणायचे, मला एक दिवस पंतप्रधान करा, मी अयोध्येत राममंदिर बांधणे आणि काश्मीरमधील ३७० कलम हटवणे हे दोन निर्णय लगेच घेईन. आता हे दोन्ही निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले आहेत. आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी मोदींची पाठ थोपटली असते. कौतुक केले असते. पण आता तसे होत आहे का? बाळासाहेबांचे स्वप्न ज्यांनी पूर्ण केले, त्यांच्यावर टीका करायचे काम सुरू आहे. टिंगल केली जात आहे.मंदिर वही बनाएंगे, लेकीन तारीख नही बताएंगे अशी चेष्टा करणार्यांना मोदींनी ते करुन दाखवले आहे आणि तारीखही सांगितली आहे. आता ते कॅलेंडर घेऊन तारीख शोधत बसले असतील, असा टोलाही शिंदे यांनी हाणला. ज्यांनी मंदिर बांधले त्यांच्यासोबत तुम्ही राहणार की जे मंदिरावरुन टिंगल करत आहेत, त्यांच्याबरोबर राहणार, असा प्रश्नही त्यांनी केला.केंद्र सरकारकडून राज्याला प्रत्येक योजनेसाठी निधी दिला जात आहे. याआधी अडीच वर्षे अहंकारापोटी केंद्राकडे निधी मागितलाच गेला नाही. त्यामुळे राज्य विकासात बरेच मागे गेले. जर आम्ही सत्तांतराचा निर्णय घेतला नसता तर राज्य कुठे गेले असते, असा प्रश्न करताना शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. जगभरात भारताला आदर मिळवून देण्याचे आणि भारतीय अर्थव्यवस्था बळकट करण्याचे काम मोदी यांनी केले आहे, असे ते म्हणाले.उद्योगमंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्याला चांगली साथ दिली आहे. त्यांनी गेल्या दीड वर्षात भरीव काम केले आहे. आधीच्या अडीच वर्षात परदेशी गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र मागे पडला होता. मात्र उदय सामंत यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे गेल्या दीड वर्षात खूप मोठी गुंतवणूक राज्यात झाली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा वर आला आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे