शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

त्यांना विचार नाही, बाळासाहेबांचे पैसे हवे होते; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सणसणीत टीका

By मनोज मुळ्ये | Updated: January 8, 2024 15:18 IST

'शिवसेनेच्या खात्यात असलेले ५० कोटी रुपये त्यांना हवे होते'

राजापूर : आमदार, खासदारांसह अनेकजण आमच्या मूळ शिवसेनेत आहेत. धनुष्यबाणही आपल्याकडेच आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी ही भूमिका घेतली. पण त्यांना बाळासाहेबांचे विचार नको होते. त्यांना बाळासाहेबांचे पैसे हवे होते. शिवसेनेच्या खात्यात असलेले ५० कोटी रुपये त्यांना हवे होते, अशी सणसणीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.राजापूरमध्ये आयोजित शिवसंकल्प मेळाव्यात ते बोलत होते. अब की बार ४५ पार अशी घोषणाही त्यांनी केली. या मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अनेकदा टीका केली.बाळासाहेब म्हणायचे, मला एक दिवस पंतप्रधान करा, मी अयोध्येत राममंदिर बांधणे आणि काश्मीरमधील ३७० कलम हटवणे हे दोन निर्णय लगेच घेईन. आता हे दोन्ही निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले आहेत. आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी मोदींची पाठ थोपटली असते. कौतुक केले असते. पण आता तसे होत आहे का? बाळासाहेबांचे स्वप्न ज्यांनी पूर्ण केले, त्यांच्यावर टीका करायचे काम सुरू आहे. टिंगल केली जात आहे.मंदिर वही बनाएंगे, लेकीन तारीख नही बताएंगे अशी चेष्टा करणार्यांना मोदींनी ते करुन दाखवले आहे आणि तारीखही सांगितली आहे. आता ते कॅलेंडर घेऊन तारीख शोधत बसले असतील, असा टोलाही शिंदे यांनी हाणला. ज्यांनी मंदिर बांधले त्यांच्यासोबत तुम्ही राहणार की जे मंदिरावरुन टिंगल करत आहेत, त्यांच्याबरोबर राहणार, असा प्रश्नही त्यांनी केला.केंद्र सरकारकडून राज्याला प्रत्येक योजनेसाठी निधी दिला जात आहे. याआधी अडीच वर्षे अहंकारापोटी केंद्राकडे निधी मागितलाच गेला नाही. त्यामुळे राज्य विकासात बरेच मागे गेले. जर आम्ही सत्तांतराचा निर्णय घेतला नसता तर राज्य कुठे गेले असते, असा प्रश्न करताना शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. जगभरात भारताला आदर मिळवून देण्याचे आणि भारतीय अर्थव्यवस्था बळकट करण्याचे काम मोदी यांनी केले आहे, असे ते म्हणाले.उद्योगमंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्याला चांगली साथ दिली आहे. त्यांनी गेल्या दीड वर्षात भरीव काम केले आहे. आधीच्या अडीच वर्षात परदेशी गुंतवणूक मिळवण्यात महाराष्ट्र मागे पडला होता. मात्र उदय सामंत यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे गेल्या दीड वर्षात खूप मोठी गुंतवणूक राज्यात झाली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा वर आला आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे