शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प होणार नाही : राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 14:33 IST

Jaitapur atomic energy plant, Vinayak Raut, Ratnagiri जैतापूर येथे कोणताही अणुुऊर्जा प्रकल्प होणार नाही. मात्र, येथील संपादीत जागेत केंद्र सरकारने ५ हजार मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारावा, अशी मागणी राज्याने केंद्राकडे केली आहे. यातून रोजगार निर्मितीवर भर देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देजैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प होणार नाही : राऊतसंपादीत जागेत केंद्र सरकारने ५ हजार मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारावा

चिपळूण : जैतापूर येथे कोणताही अणुुऊर्जा प्रकल्प होणार नाही. मात्र, येथील संपादीत जागेत केंद्र सरकारने ५ हजार मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारावा, अशी मागणी राज्याने केंद्राकडे केली आहे. यातून रोजगार निर्मितीवर भर देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीमधील पदाधिकार्‍यांची मुदत डिसेंबरमध्ये संपुष्टात येत आहे. यावर्षी कोरोनामुळे या पदाधिकार्‍यांना कामाची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी मुदतवाढ मागितली आहे. १२ डिसेंबरला रत्नागिरीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार असून, त्यात यावर निर्णय होणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवले जात आहेत. ठेकेदाराने कंपनी व्यवस्थापन बदलल्यानंतर कामाला गती आली आहे. वाशिष्ठी पुलाचेही काम गतीने सुरू आहे. तिवरे धरण उभारणीबाबत पाठपुरावा सुरूच आहे. धरणासाठी काँक्रिटची भिंत उभारावी, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचे नियोजन आहे. त्या-त्यावेळी आघाडीचे पदाधिकारी संयुक्तीक निर्णय घेतील.

टॅग्स :Jaitapur atomic energy plantजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पRatnagiriरत्नागिरीVinayak Rautविनायक राऊत