शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

ना ढोल, ना ताशा फक्त ‘मोरया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST

रत्नागिरी : पावसाने घेतलेल्या उघडीपमुळे गणेशभक्तांनी उत्साहाने आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या घरी नेले. काेराेनाच्या निर्बंधांमुळे नियमांचे पालन करत ढाेल, ...

रत्नागिरी : पावसाने घेतलेल्या उघडीपमुळे गणेशभक्तांनी उत्साहाने आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या घरी नेले. काेराेनाच्या निर्बंधांमुळे नियमांचे पालन करत ढाेल, ताशे, बँजाे, मिरवणुका आणि गुलालाला फाटा देत गणेशमूर्ती नेण्यात आली. काेराेनाची भीती असली तरी गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण हाेते. त्यामुळे ‘गणपती बाप्पा माेरया’चा जयघाेष करत बाप्पाला आपल्या घरी नेले. जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ५३९ खासगी आणि १०८ सार्वजनिक बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

पावसाने दोन दिवस उघडीप घेतल्याने गणेशभक्तांनी समाधान व्यक्त केले आहे. सकाळी ढगाळ वातावरणामुळे डोक्यावरून, हातगाडी, चारचाकी, तीनचाकी, टेम्पो, ट्रक या वाहनातून गणेशमूर्ती प्लास्टिक कागद टाकूनच नेणे अनेकांनी पसंत केले. शहर तसेच ग्रामीण भागातील रस्ते निकृष्ट असल्याने गणेशमूर्ती घेऊन भक्तांना संथगतीने प्रवास करावा लागत होता. सोशल डिस्टन्सिंगमुळे गणेशमूर्ती नेण्यासाठी मूर्तिकारांनी भाविकांना वेळ निश्चित करून दिली होती. त्यानुसार भाविकांनी गणेशमूर्ती घरी आणल्या. अत्यंत शांत व साधेपणाने उत्सवाची सुरुवात झाली असली तरी भाविकांचा उत्साह मात्र कायम आहे.

उत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शनिवार दि.११ सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे. गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठिकठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात दहा हजार ४४६ घरगुती व १६ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असून, घराशेजारीच गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

---------------------

ऑनलाईन पूजा

कोरोनामुळे भटजींनीही प्राणप्रतिष्ठापना पूजा ऑनलाईन सांगितली. गणेशमूर्ती आणण्यासाठी नव्हे तर आरती करतानाही भक्तांनी मास्क परिधान केले होते. घरोघरी यजमान मंडळींनीच पूजा, आरती व अन्य धार्मिक कार्यक्रम उरकले. काही भक्त दीड दिवसांचे गणपती आणत असल्याने ठिकठिकाणी सायंकाळी श्री सत्यनारायण महापूजेचे आयाेजन केले हाेते; मात्र कोरोनामुळे भटजींनीही पूजाही ऑनलाईनच सांगितली.

--------------------

खड्ड्यांचे विघ्न कायम

गणेशाेत्सवापूर्वी रत्नागिरी शहरातील सर्व खड्डे भरण्यात येतील, असे नगर परिषदेने दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. शहरातील अनेक भागात खड्डे तसेच असल्याने गणेशभक्तांना मूर्ती नेताना त्रास सहन करावा लागला. शहराबराेबरच ग्रामीण भागातील रस्तेही खड्डेमय झालेले असून, त्यांची दुरुस्ती न केल्याने मूर्ती नेताना गणेशभक्तांचे हाल झाले. मुंबई - गाेवा महामार्गाचे रडतखडत सुरू असलेले चाैपदरीकरणाचे काम आणि खड्डे यामुळे गावी येणाऱ्या गणेशभक्तांचे हाल झाले.