शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

ना ढोल, ना ताशा फक्त ‘मोरया’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST

रत्नागिरी : पावसाने घेतलेल्या उघडीपमुळे गणेशभक्तांनी उत्साहाने आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या घरी नेले. काेराेनाच्या निर्बंधांमुळे नियमांचे पालन करत ढाेल, ...

रत्नागिरी : पावसाने घेतलेल्या उघडीपमुळे गणेशभक्तांनी उत्साहाने आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या घरी नेले. काेराेनाच्या निर्बंधांमुळे नियमांचे पालन करत ढाेल, ताशे, बँजाे, मिरवणुका आणि गुलालाला फाटा देत गणेशमूर्ती नेण्यात आली. काेराेनाची भीती असली तरी गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण हाेते. त्यामुळे ‘गणपती बाप्पा माेरया’चा जयघाेष करत बाप्पाला आपल्या घरी नेले. जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ५३९ खासगी आणि १०८ सार्वजनिक बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

पावसाने दोन दिवस उघडीप घेतल्याने गणेशभक्तांनी समाधान व्यक्त केले आहे. सकाळी ढगाळ वातावरणामुळे डोक्यावरून, हातगाडी, चारचाकी, तीनचाकी, टेम्पो, ट्रक या वाहनातून गणेशमूर्ती प्लास्टिक कागद टाकूनच नेणे अनेकांनी पसंत केले. शहर तसेच ग्रामीण भागातील रस्ते निकृष्ट असल्याने गणेशमूर्ती घेऊन भक्तांना संथगतीने प्रवास करावा लागत होता. सोशल डिस्टन्सिंगमुळे गणेशमूर्ती नेण्यासाठी मूर्तिकारांनी भाविकांना वेळ निश्चित करून दिली होती. त्यानुसार भाविकांनी गणेशमूर्ती घरी आणल्या. अत्यंत शांत व साधेपणाने उत्सवाची सुरुवात झाली असली तरी भाविकांचा उत्साह मात्र कायम आहे.

उत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सर्वत्र बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शनिवार दि.११ सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे. गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठिकठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात दहा हजार ४४६ घरगुती व १६ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असून, घराशेजारीच गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

---------------------

ऑनलाईन पूजा

कोरोनामुळे भटजींनीही प्राणप्रतिष्ठापना पूजा ऑनलाईन सांगितली. गणेशमूर्ती आणण्यासाठी नव्हे तर आरती करतानाही भक्तांनी मास्क परिधान केले होते. घरोघरी यजमान मंडळींनीच पूजा, आरती व अन्य धार्मिक कार्यक्रम उरकले. काही भक्त दीड दिवसांचे गणपती आणत असल्याने ठिकठिकाणी सायंकाळी श्री सत्यनारायण महापूजेचे आयाेजन केले हाेते; मात्र कोरोनामुळे भटजींनीही पूजाही ऑनलाईनच सांगितली.

--------------------

खड्ड्यांचे विघ्न कायम

गणेशाेत्सवापूर्वी रत्नागिरी शहरातील सर्व खड्डे भरण्यात येतील, असे नगर परिषदेने दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. शहरातील अनेक भागात खड्डे तसेच असल्याने गणेशभक्तांना मूर्ती नेताना त्रास सहन करावा लागला. शहराबराेबरच ग्रामीण भागातील रस्तेही खड्डेमय झालेले असून, त्यांची दुरुस्ती न केल्याने मूर्ती नेताना गणेशभक्तांचे हाल झाले. मुंबई - गाेवा महामार्गाचे रडतखडत सुरू असलेले चाैपदरीकरणाचे काम आणि खड्डे यामुळे गावी येणाऱ्या गणेशभक्तांचे हाल झाले.