शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

आधारकार्ड नाही, भिकाऱ्यांना लस देणार कशी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 16:19 IST

Corona vaccine Ratnagiri-देशभरात कोरोना लसीकरण मोहीम आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. शहरात फिरणाऱ्या भिकाऱ्यांपासून कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा तसेच त्यांनाही संसर्ग होण्याचा धोका आहे. मात्र, त्यांच्याकडे ओळखीचा कोणताच पुरावा नसल्याने त्यांना लस कशी देणार, हा मुख्य प्रश्न आहे. शासनाकडून याबाबत कोणतेही मार्गदर्शन अद्याप आलेले नाही.

ठळक मुद्देसामाजिक संस्थांच्या सहकार्याने ओळखपत्र द्या नोंदणी करण्याची कार्यकर्त्यांची प्रशासनाला सूचना

शोभना कांबळेरत्नागिरी : देशभरात कोरोना लसीकरण मोहीम आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. शहरात फिरणाऱ्या भिकाऱ्यांपासून कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा तसेच त्यांनाही संसर्ग होण्याचा धोका आहे. मात्र, त्यांच्याकडे ओळखीचा कोणताच पुरावा नसल्याने त्यांना लस कशी देणार, हा मुख्य प्रश्न आहे. शासनाकडून याबाबत कोणतेही मार्गदर्शन अद्याप आलेले नाही.आरोग्य यंत्रणेतील कोरोनायोद्धे यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात महसूल, पोलीस आणि शासकीय अधिकारी- कर्मचारी यांना लस दिली गेली. तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसह सहव्याधी असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयासह शासकीय रुग्णालयांमध्ये ही लस मोफत देण्यात येत आहे. यासाठी आधार कार्ड किंवा तत्सम पुरावे आवश्यक आहेत. परंतु ज्यांच्याकडे ओळखीचे कोणतेच पुरावे नाहीत, असे भिकारी यांना लसीकरण कसे करणार?काही वेळा घरात ज्येष्ठ नागरिक असतात. त्यामुळे या भिकाऱ्यांना अन्नपदार्थ किंवा पैसे देताना ते बाधित होण्याचा धोका आहे. त्याचबरोबर घरातील या व्यक्तींकडून हे भिकारीही बाधित होण्याचा धोका असतो. या भिकाऱ्यांचा सर्वत्र संचार असल्याने त्यांच्या लसीकरणाचा विचार प्राधान्याने होणे गरजेचे आहे. मात्र, त्यांच्याकडे ओळखीचे कोणतेच पुरावे नाहीत, त्यामुळे त्यांना लस देण्यात अडचणी येणार आहेत. यासाठी सामाजिक संस्था आणि पोलीस यांच्या मदतीने त्यांचे ओळखपत्र तयार करून त्यांना लस द्यावी, असे काही संस्थांच्या कार्यकर्त्यांकडून सुचविण्यात येत आहे.

शहरात फिरणारे भिकारी, मनोरूग्ण यांच्याकडे ओळखीचे कोणतेही पुरावे सापडणे अवघड असते. रेल्वेमधून किंवा काही वेळा पायी हे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. त्यामुळे या व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे या लोकांनाही कोरोना संसर्गाचा धोका असतो. तर संपर्कात येणाऱ्यांनाही या लोकांपासून धोका असतो. त्यामुळे या दोन्ही बाबींचा विचार करून अशा लोकांना लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी कुठल्या तरी सामाजिक संस्थेला पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ओळखपत्र तयार करून देण्याची जबाबदारी द्यावी.- सचिन शिंदे,राजरत्न प्रतिष्ठान, रत्नागिरी

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसRatnagiriरत्नागिरी