शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आधारकार्ड नाही, भिकाऱ्यांना लस देणार कशी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 16:19 IST

Corona vaccine Ratnagiri-देशभरात कोरोना लसीकरण मोहीम आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. शहरात फिरणाऱ्या भिकाऱ्यांपासून कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा तसेच त्यांनाही संसर्ग होण्याचा धोका आहे. मात्र, त्यांच्याकडे ओळखीचा कोणताच पुरावा नसल्याने त्यांना लस कशी देणार, हा मुख्य प्रश्न आहे. शासनाकडून याबाबत कोणतेही मार्गदर्शन अद्याप आलेले नाही.

ठळक मुद्देसामाजिक संस्थांच्या सहकार्याने ओळखपत्र द्या नोंदणी करण्याची कार्यकर्त्यांची प्रशासनाला सूचना

शोभना कांबळेरत्नागिरी : देशभरात कोरोना लसीकरण मोहीम आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. शहरात फिरणाऱ्या भिकाऱ्यांपासून कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा तसेच त्यांनाही संसर्ग होण्याचा धोका आहे. मात्र, त्यांच्याकडे ओळखीचा कोणताच पुरावा नसल्याने त्यांना लस कशी देणार, हा मुख्य प्रश्न आहे. शासनाकडून याबाबत कोणतेही मार्गदर्शन अद्याप आलेले नाही.आरोग्य यंत्रणेतील कोरोनायोद्धे यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात महसूल, पोलीस आणि शासकीय अधिकारी- कर्मचारी यांना लस दिली गेली. तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसह सहव्याधी असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयासह शासकीय रुग्णालयांमध्ये ही लस मोफत देण्यात येत आहे. यासाठी आधार कार्ड किंवा तत्सम पुरावे आवश्यक आहेत. परंतु ज्यांच्याकडे ओळखीचे कोणतेच पुरावे नाहीत, असे भिकारी यांना लसीकरण कसे करणार?काही वेळा घरात ज्येष्ठ नागरिक असतात. त्यामुळे या भिकाऱ्यांना अन्नपदार्थ किंवा पैसे देताना ते बाधित होण्याचा धोका आहे. त्याचबरोबर घरातील या व्यक्तींकडून हे भिकारीही बाधित होण्याचा धोका असतो. या भिकाऱ्यांचा सर्वत्र संचार असल्याने त्यांच्या लसीकरणाचा विचार प्राधान्याने होणे गरजेचे आहे. मात्र, त्यांच्याकडे ओळखीचे कोणतेच पुरावे नाहीत, त्यामुळे त्यांना लस देण्यात अडचणी येणार आहेत. यासाठी सामाजिक संस्था आणि पोलीस यांच्या मदतीने त्यांचे ओळखपत्र तयार करून त्यांना लस द्यावी, असे काही संस्थांच्या कार्यकर्त्यांकडून सुचविण्यात येत आहे.

शहरात फिरणारे भिकारी, मनोरूग्ण यांच्याकडे ओळखीचे कोणतेही पुरावे सापडणे अवघड असते. रेल्वेमधून किंवा काही वेळा पायी हे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. त्यामुळे या व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे या लोकांनाही कोरोना संसर्गाचा धोका असतो. तर संपर्कात येणाऱ्यांनाही या लोकांपासून धोका असतो. त्यामुळे या दोन्ही बाबींचा विचार करून अशा लोकांना लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी कुठल्या तरी सामाजिक संस्थेला पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने ओळखपत्र तयार करून देण्याची जबाबदारी द्यावी.- सचिन शिंदे,राजरत्न प्रतिष्ठान, रत्नागिरी

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसRatnagiriरत्नागिरी