शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

‘माविम’मुळे नऊ हजार महिला ‘घर’ मालकीण

By admin | Updated: November 19, 2015 00:43 IST

रत्नागिरी जिल्हा : ग्रामसभेच्या मान्यतेनंतर निर्णय

रत्नागिरी : महिला आर्थिक विकास महामंडळ बचत गटाच्या चळवळीने नेत्रदीपक प्रगती केली आहे. महिलांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होऊ लागल्याने जिल्ह्यातील ९२४४ महिलांचे नाव घराच्या कागदोपत्री लागण्याच्या प्रस्तावांना संबंधित ग्रामसभेने मान्यता दिली आहे. त्यापैकी तब्बल २४४४ महिला प्रत्यक्षात ‘घर मालकीण’ बनल्या आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात ‘माविम’मुळे ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांचे कष्ट कमी झाले. आज निरक्षर महिलाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीबरोबरच इतरही पूरक व्यवसाय करून पतीबरोबरच अर्थार्जन करू लागली आहे. आज तिची घरातील पत वाढली आहे. एवढेच नव्हे; तर गावच्या विकासातही तिचा सहभाग वाढला आहे. झेंडावंदनाला महिला आवर्जुन उपस्थित राहू लागल्या असून, ग्रामसभांमध्येही भाग घ्यायला लागल्या आहेत. त्यांच्यात धाडस आणि आत्मविश्वास आला आहे. माविमचे महिलांच्या विकासाचे कार्य चार टप्प्यात चालते. त्यातील एक टप्पा म्हणजे महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समानता. याचाच एक भाग म्हणजे खऱ्या अर्थाने स्त्री - पुरूष समानता यावी, घराची मालकी पतीप्रमाणेच पत्नीकडेही यावी, या उद्देशाने शासनाने ‘घर दोघांचे’ ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेऊन तसा अध्यादेशही काही वर्षांपूवी काढला आहे. या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ बचत गटाने ‘घर दोघांचे’ ही संकल्पना ग्रामीण भागात चांगलीच रूजवली आहे. अर्थार्जनात पत्नीचा समान वाटा आहे, तर मग तिला घराच्या मालकीत तो का मिळू नये, ही विचारधारा ग्रामीण भागात रूजवण्यात माविमचे जिल्हा समन्वयक दीपक भागवत आणि जिल्ह्यातील त्यांच्या संयोगिनींचा महत्त्वाचा वाटा आहे. ग्रामीण भागात माविमने केलेल्या समाजप्रबोधनामुळे पुरूषवर्गाची मानसिकता बदलली आहे. त्यामुळे पती आपल्या बरोबरच पत्नीचे नाव लावण्यासाठी तयारी दर्शवू लागले आहेत. पुरूषवर्गाने माविमच्या ‘घर दोघांचे’ या चळवळीला सकारात्मक दर्शवलेल्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील ९२४४ महिलांची नावे पतीबरोबरच लागण्यासाठीच्या प्रस्तावांना ग्रामसभेत मान्यता मिळाली असून, त्यापैकी २४४४ महिलांची नावे पतीसह सातबारा तसेच घरपट्टीवर आली आहेत. त्यामुळे घराचे मालक असलेल्या पतीराजांबरोबरच आता पत्नीही ‘घर मालकीण’ बनू लागल्या आहेत. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने टाकलेले हे पाऊल खूप मोठे असल्याचे मानले जात आहे. (प्रतिनिधी)