शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

Ratnagiri: फुलण्याआधीच ‘त्या’ नवदाम्पत्याचा संसार कोमेजला, वाशिष्ठी नदीसह दाभोळखाडीत शोध सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 13:55 IST

आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

चिपळूण : दहावीनंतर शिक्षणासाठी धुळ्याहून चिपळुणात आलेल्या नीलेश अहिरे याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोबाइल शॉपीच्या व्यवसायात जम बसवला. तीन वर्षे नातेवाईक व भाड्याच्या खोलीत आनंदी जीवन जगत असताना तीन महिन्यांपूर्वीच ८ मे रोजी विवाह बंधनात अडकला. आता कुठे नव्या आयुष्याला सुरुवात झाली होती. या वेलीला बहर येण्याआधीच अचानक दोघांनाही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप पुढे आले नसले, तरी त्यांचा संसार अर्ध्यावरच मोडल्याचे सत्य आता नातेवाइकांसह सर्वांनाच मान्य करावे लागणार आहे.मूळचा साक्री (धुळे) येथील नीलेश अहिरे व पत्नी अश्विनी अहिरे यांनी गांधारेश्वर येथील पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या दाम्पत्याचा गुरुवारी दुसऱ्या दिवशीही दाभोळ खाडीत शोध सुरू होता. खाडीकिनाऱ्यावरील सर्व गावांमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. एनडीआरएफ पथकासह आहिरे यांच्या नातेवाइकांनी बोटीच्या माध्यमातून खाडीत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. एनडीआरएफ पथक, पोलिस, शासकीय अधिकारी व कर्मचारी, आहिरे यांचे नातेवाईक वाशिष्ठी नदीसह दाभोळखाडीत अजूनही त्यांचा शोध घेत आहेत.

नीलेशचे वडील शासकीय सेवेत नोकरीला असून, नीलेशला एक लहान भाऊ आहे. दहावीनंतर तो गाव सोडून चिपळूणला नातेवाइकांकडे आला होता. येथील डीबीजे महाविद्यालयात बारावी झाल्यानंतर त्याने मोबाइल दुरुस्तीचे शिक्षण घेतले आणि बसस्थानकाजवळ मोबाइल शॉपी सुरू केली होती. शांत व मृदू स्वभावाने त्याने ग्राहक जोडून व्यवसायात जम बसवला. लग्नापूर्वी ३ ते ४ वर्षे तो स्वतंत्रपणे भाड्याच्या घरात राहत होता. कष्टातून केलेल्या व्यवसायाच्या जोरावर त्याने जम बसवला होता. घरच्यांकडून काही मागण्याची वेळ त्याच्यावर आली नाही. आता सारे काही सुरळीत सुरू असताना या दाम्पत्याने नदीत उडी घेण्याचा निर्णय का घेतला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. याप्रकरणी चिपळूण पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सारे काही सुरळीतगावाकडील अश्विनीसोबत ८ मे रोजी त्याचा विवाह झाला. विवाहानंतर जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळी ते फिरायलाही गेले होते. अश्विनीच्या वाढदिवसानिमित्त काही दिवसांपूर्वी आई, मामाही येथे काही दिवस राहिले होते. सर्व सुरळीत असल्याने २ जुलैनंतर आई गावाकडे निघून गेली; पण आता अचानक सारे काही बदलून गेले आहे.