शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

रत्नागिरीतील सर्व रस्त्यांवर रात्रीचा प्रवास धोकादायकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह एकंदरीत भटक्या श्वानांची दहशत मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. शहरातील सर्वच भागांत या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह एकंदरीत भटक्या श्वानांची दहशत मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. शहरातील सर्वच भागांत या मोकाट श्वानांचा मुक्त संचार वाढू लागला असून, नागरिकांच्या अंगावर धावून जात हल्ला करणे, दंश करणे आदी प्रकार वाढल्याने ज्येष्ठ नागरिक, मुले यांच्यासह नागरिकांनी या भटक्या श्वानांचा धसका घेतला आहे. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत ३,७७० नागरिकांना श्वानदंश झाला आहे.

भटक्या श्वानांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता नगरपालिका, ग्रामपंचायती या श्वानांचा बंदोबस्त करण्याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे.

..........

आम्हाला चोरीची नाही, कुत्र्याची भीती वाटते

रत्नागिरी शहरात मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे. मध्यंतरी नगरपरिषदेने या श्वानांना पकडण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र, अजूनही संख्या कमी झालेली दिसत नाही. लहान मुलांच्या हातात पिशवी असेल तर हे श्वान ती ओढून घ्यायला पुढे येतात. रात्री चोरांपेक्षा या श्वानांचीच भीती मनात अधिक असते.

- मनीषा पवार, गवळीवाडा,रत्नागिरी

शहरातील भटक्या श्नानांच्या त्रासांनी त्रस्त व्हायला झाले आहे. अनेकांवर या श्वानांनी हल्ले केले आहेत. दिवसरात्र या श्वानांचा मुक्तसंचार सुरू असतो. अनेकदा नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, मुलांच्या मागे लागणे असे प्रकार सातत्याने घडू लागल्याने या श्वानांची दहशत नागरिकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे.

- प्रकाश कांबळे, नाचणे, रत्नागिरी

..................................

श्वानांच्या नसबंदीचा प्रयत्न असफल

-शहरातील भटक्या श्वानांची संख्या भरमसाठ वाढली आहे.

- या श्वानांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचा प्रयत्न पालिकास्तरावर अपयशी ठरत आहे.

- श्वानांमधील हिंसकता धोकादायक

..............

पाळीव श्वानांपेक्षा भटक्या श्वानांकडून नागरिकांना दंश करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अँटी रेबिज इंजेक्शन उपलब्ध करून ठेवावी लागतात. त्यामुळे जिल्हा रुग्णालयालाही पुरेसा साठा ठेवावा लागतो.

- डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी

जिल्ह्यात श्वानदंशाची संख्या पाहता जिल्हा शासकीय रुग्णालयात एक हजार ॲंटी रेबिज इंजेक्शनची उपलब्धता करून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.