शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

रत्नागिरीतील सर्व रस्त्यांवर रात्रीचा प्रवास धोकादायकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह एकंदरीत भटक्या श्वानांची दहशत मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. शहरातील सर्वच भागांत या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह एकंदरीत भटक्या श्वानांची दहशत मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. शहरातील सर्वच भागांत या मोकाट श्वानांचा मुक्त संचार वाढू लागला असून, नागरिकांच्या अंगावर धावून जात हल्ला करणे, दंश करणे आदी प्रकार वाढल्याने ज्येष्ठ नागरिक, मुले यांच्यासह नागरिकांनी या भटक्या श्वानांचा धसका घेतला आहे. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत ३,७७० नागरिकांना श्वानदंश झाला आहे.

भटक्या श्वानांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता नगरपालिका, ग्रामपंचायती या श्वानांचा बंदोबस्त करण्याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे.

..........

आम्हाला चोरीची नाही, कुत्र्याची भीती वाटते

रत्नागिरी शहरात मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे. मध्यंतरी नगरपरिषदेने या श्वानांना पकडण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र, अजूनही संख्या कमी झालेली दिसत नाही. लहान मुलांच्या हातात पिशवी असेल तर हे श्वान ती ओढून घ्यायला पुढे येतात. रात्री चोरांपेक्षा या श्वानांचीच भीती मनात अधिक असते.

- मनीषा पवार, गवळीवाडा,रत्नागिरी

शहरातील भटक्या श्नानांच्या त्रासांनी त्रस्त व्हायला झाले आहे. अनेकांवर या श्वानांनी हल्ले केले आहेत. दिवसरात्र या श्वानांचा मुक्तसंचार सुरू असतो. अनेकदा नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, मुलांच्या मागे लागणे असे प्रकार सातत्याने घडू लागल्याने या श्वानांची दहशत नागरिकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे.

- प्रकाश कांबळे, नाचणे, रत्नागिरी

..................................

श्वानांच्या नसबंदीचा प्रयत्न असफल

-शहरातील भटक्या श्वानांची संख्या भरमसाठ वाढली आहे.

- या श्वानांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचा प्रयत्न पालिकास्तरावर अपयशी ठरत आहे.

- श्वानांमधील हिंसकता धोकादायक

..............

पाळीव श्वानांपेक्षा भटक्या श्वानांकडून नागरिकांना दंश करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अँटी रेबिज इंजेक्शन उपलब्ध करून ठेवावी लागतात. त्यामुळे जिल्हा रुग्णालयालाही पुरेसा साठा ठेवावा लागतो.

- डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी

जिल्ह्यात श्वानदंशाची संख्या पाहता जिल्हा शासकीय रुग्णालयात एक हजार ॲंटी रेबिज इंजेक्शनची उपलब्धता करून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.