शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील सर्व रस्त्यांवर रात्रीचा प्रवास धोकादायकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह एकंदरीत भटक्या श्वानांची दहशत मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. शहरातील सर्वच भागांत या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह एकंदरीत भटक्या श्वानांची दहशत मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. शहरातील सर्वच भागांत या मोकाट श्वानांचा मुक्त संचार वाढू लागला असून, नागरिकांच्या अंगावर धावून जात हल्ला करणे, दंश करणे आदी प्रकार वाढल्याने ज्येष्ठ नागरिक, मुले यांच्यासह नागरिकांनी या भटक्या श्वानांचा धसका घेतला आहे. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत ३,७७० नागरिकांना श्वानदंश झाला आहे.

भटक्या श्वानांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता नगरपालिका, ग्रामपंचायती या श्वानांचा बंदोबस्त करण्याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे.

..........

आम्हाला चोरीची नाही, कुत्र्याची भीती वाटते

रत्नागिरी शहरात मोकाट श्वानांचा वावर वाढला आहे. मध्यंतरी नगरपरिषदेने या श्वानांना पकडण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र, अजूनही संख्या कमी झालेली दिसत नाही. लहान मुलांच्या हातात पिशवी असेल तर हे श्वान ती ओढून घ्यायला पुढे येतात. रात्री चोरांपेक्षा या श्वानांचीच भीती मनात अधिक असते.

- मनीषा पवार, गवळीवाडा,रत्नागिरी

शहरातील भटक्या श्नानांच्या त्रासांनी त्रस्त व्हायला झाले आहे. अनेकांवर या श्वानांनी हल्ले केले आहेत. दिवसरात्र या श्वानांचा मुक्तसंचार सुरू असतो. अनेकदा नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, मुलांच्या मागे लागणे असे प्रकार सातत्याने घडू लागल्याने या श्वानांची दहशत नागरिकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे.

- प्रकाश कांबळे, नाचणे, रत्नागिरी

..................................

श्वानांच्या नसबंदीचा प्रयत्न असफल

-शहरातील भटक्या श्वानांची संख्या भरमसाठ वाढली आहे.

- या श्वानांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचा प्रयत्न पालिकास्तरावर अपयशी ठरत आहे.

- श्वानांमधील हिंसकता धोकादायक

..............

पाळीव श्वानांपेक्षा भटक्या श्वानांकडून नागरिकांना दंश करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अँटी रेबिज इंजेक्शन उपलब्ध करून ठेवावी लागतात. त्यामुळे जिल्हा रुग्णालयालाही पुरेसा साठा ठेवावा लागतो.

- डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी

जिल्ह्यात श्वानदंशाची संख्या पाहता जिल्हा शासकीय रुग्णालयात एक हजार ॲंटी रेबिज इंजेक्शनची उपलब्धता करून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.