शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

सरकारवर दबाव ठेवण्यासाठी नवे व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST

रत्नागिरी : चक्रीवादळग्रस्तांना त्यांच्या व्यथा मांडता याव्यात, सरकारवर एखादा दबावगट ठेवता यावा, यासाठी भाजपने ‘फिफ्थ पिलर’ हा उपक्रम सुरू ...

रत्नागिरी : चक्रीवादळग्रस्तांना त्यांच्या व्यथा मांडता याव्यात, सरकारवर एखादा दबावगट ठेवता यावा, यासाठी भाजपने ‘फिफ्थ पिलर’ हा उपक्रम सुरू केला आहे. नुकसानग्रस्तांना त्यांच्या नुकसानीचे फोटो, व्हिडीओ पाठवण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्या सर्वांच्या आधारे सरकारकडे भरपाईसाठी पाठपुरावा केला जाणार आहे, अशी माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

भाजपच्या ‘फिफ्थ पिलर’ या फेसबुक पेजचे तसेच यू-ट्युब चॅनलचे ऑनलाइन उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्य उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी भाजप मीडिया सेलच्या समीर गुरव यांनी प्रथम या दोन माध्यमांद्वारे काय केले जाणार आहे, त्याची कार्यपद्धती काय आहे, याची माहिती दिली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन करताना न्याय मिळवण्यासाठीच हा अभिनव मार्ग असल्याचे सांगितले. पंचनामे योग्य पद्धतीने होत नाहीत. त्यासाठी फोटो काढताना किंवा व्हिडीओ करताना नेमके काय दाखवायचे, यासाठी निवृत्त तहसीलदार, तलाठी यांना साेबत घेण्याचे आवाहन त्यांनी केले. दरवर्षी होणाऱ्या वादळांमुळे परंपरागत शेती, बागायती बंद करावी का, असे म्हणण्याइतकी वेळ आली आहे. त्यावर पर्याय शोधणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

गतवर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीची भरपाई अजून मिळालेली नाही. त्यातच तौक्ते चक्रीवादळाचे पंचनामेही योग्य पद्धतीने होत नसल्याची तक्रार अनेक लोकांनी आपल्या दौऱ्याप्रसंगी केली आहे, असे यावेळी फडणवीस यांनी सांगितले. लोकांच्या या तक्रारीची दखल घेऊन त्यांना न्याय मागता यावा, त्यांच्यासाठी भाजपने हे नवे व्यासपीठ खुले केले असल्याचे ते म्हणाले. राजकारण करण्यासाठी नाही तर लोकांच्या व्यथा मांडण्यासाठी हे व्यासपीठ आहे. भाजपने प्रत्येक आपत्तीप्रसंगी संवेदनशीलता दाखवली आहे. आताच्या वादळात कोकणात खूप मोठे नुकसान झाले आहे. मात्र, ते प्रत्यक्षात कागदावर येत नाही. त्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे, असे ते म्हणाले.

वादळ जिथे जमिनीवर धडकते, तेथे खूप मोठे नुकसान होते. आताच्या वादळात गुजरातबाबतही तेच घडले आहे. त्यामुळे तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत जाहीर केली आहे. मात्र, त्याचा चुकीचा अर्थ लावून गळा काढला जात असल्याची टीका त्यांनी केली.

...............

शिवसेनेला टोला

केंद्र सरकारने महाराष्ट्राला दीड हजार कोटी रुपयांची मदत द्यायलाच हवी, असे मत शिवसेनेच्या संजय राऊत यांनी मांडले आहे. मात्र, त्यांचीच सरकारी यंत्रणा नुकसान खूप कमी झाल्याचे दाखवत आहे. मग, मोठ्या रकमेची भरपाई मागायची तरी कशी, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेला टोला हाणला.