शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

सरकारवर दबाव ठेवण्यासाठी नवे व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST

रत्नागिरी : चक्रीवादळग्रस्तांना त्यांच्या व्यथा मांडता याव्यात, सरकारवर एखादा दबावगट ठेवता यावा, यासाठी भाजपने ‘फिफ्थ पिलर’ हा उपक्रम सुरू ...

रत्नागिरी : चक्रीवादळग्रस्तांना त्यांच्या व्यथा मांडता याव्यात, सरकारवर एखादा दबावगट ठेवता यावा, यासाठी भाजपने ‘फिफ्थ पिलर’ हा उपक्रम सुरू केला आहे. नुकसानग्रस्तांना त्यांच्या नुकसानीचे फोटो, व्हिडीओ पाठवण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्या सर्वांच्या आधारे सरकारकडे भरपाईसाठी पाठपुरावा केला जाणार आहे, अशी माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

भाजपच्या ‘फिफ्थ पिलर’ या फेसबुक पेजचे तसेच यू-ट्युब चॅनलचे ऑनलाइन उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्य उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी भाजप मीडिया सेलच्या समीर गुरव यांनी प्रथम या दोन माध्यमांद्वारे काय केले जाणार आहे, त्याची कार्यपद्धती काय आहे, याची माहिती दिली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन करताना न्याय मिळवण्यासाठीच हा अभिनव मार्ग असल्याचे सांगितले. पंचनामे योग्य पद्धतीने होत नाहीत. त्यासाठी फोटो काढताना किंवा व्हिडीओ करताना नेमके काय दाखवायचे, यासाठी निवृत्त तहसीलदार, तलाठी यांना साेबत घेण्याचे आवाहन त्यांनी केले. दरवर्षी होणाऱ्या वादळांमुळे परंपरागत शेती, बागायती बंद करावी का, असे म्हणण्याइतकी वेळ आली आहे. त्यावर पर्याय शोधणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

गतवर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीची भरपाई अजून मिळालेली नाही. त्यातच तौक्ते चक्रीवादळाचे पंचनामेही योग्य पद्धतीने होत नसल्याची तक्रार अनेक लोकांनी आपल्या दौऱ्याप्रसंगी केली आहे, असे यावेळी फडणवीस यांनी सांगितले. लोकांच्या या तक्रारीची दखल घेऊन त्यांना न्याय मागता यावा, त्यांच्यासाठी भाजपने हे नवे व्यासपीठ खुले केले असल्याचे ते म्हणाले. राजकारण करण्यासाठी नाही तर लोकांच्या व्यथा मांडण्यासाठी हे व्यासपीठ आहे. भाजपने प्रत्येक आपत्तीप्रसंगी संवेदनशीलता दाखवली आहे. आताच्या वादळात कोकणात खूप मोठे नुकसान झाले आहे. मात्र, ते प्रत्यक्षात कागदावर येत नाही. त्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे, असे ते म्हणाले.

वादळ जिथे जमिनीवर धडकते, तेथे खूप मोठे नुकसान होते. आताच्या वादळात गुजरातबाबतही तेच घडले आहे. त्यामुळे तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत जाहीर केली आहे. मात्र, त्याचा चुकीचा अर्थ लावून गळा काढला जात असल्याची टीका त्यांनी केली.

...............

शिवसेनेला टोला

केंद्र सरकारने महाराष्ट्राला दीड हजार कोटी रुपयांची मदत द्यायलाच हवी, असे मत शिवसेनेच्या संजय राऊत यांनी मांडले आहे. मात्र, त्यांचीच सरकारी यंत्रणा नुकसान खूप कमी झाल्याचे दाखवत आहे. मग, मोठ्या रकमेची भरपाई मागायची तरी कशी, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेला टोला हाणला.