शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

नवनवीन चुकाच चांगले काय ते समजावतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 00:17 IST

प्रशांत दामले : देवरूखजवळच्या ताम्हाने पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे कार्यक्रम; जीवनातील अनुभव कथन

देवरूख : आई-वडील आपल्यावर संस्कार करतातच. मात्र, शाळा आणि गुरूजन जे काही शिकवतात ते शिक्षण जीवनाला दिशा देणारं ठरतं, असे सांगत शाळेत मिळालेली शिक्षा म्हणजे पट्टी बोलते, अंगठे धरलेले लक्षात राहते, अशा चुकांमधून काय चांगलं करावं ते समजते, म्हणून चुका करा, नवनवीन चुका करा म्हणजे चांगले काय ते तुम्हाला समजेल आणि तुम्ही चांगले नागरिक बनाल, असे मत प्रसिध्द सिनेनाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.देवरूखजवळच्या ताम्हाने पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यामंदिर, ताम्हाने शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दामले उपस्थित होते. त्यांच्यासोबत पनवेलचे उद्योजक आणि दुनियादारी समुहाचे प्रमुख समीर सप्रे, कोल्हापूरचे राजन गुणे, पत्रकार प्रमोद कोनकर, कोकण रेल्वेचे अधिकारी महेश पेंडसे, कौस्तुभ कागलकर, प्रसिध्द आॅर्गन वादक बाळासाहेब दाते, संस्थाध्यक्ष शशिकांत सप्रे, सचिव अशोक सप्रे, मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, अप्पा पाध्ये, आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी प्रत्यक्ष जीवनातील अनुभव कथन करत आपल्या शालेय जीवनाला उजाळा दिला. प्रत्येक नागरिक हा जन्मजात कलाकार असतो, असे सांगत शाळा ही संस्कार देणारी आहे, आपण काय आहोत हे शाळेतच आपल्याला समजते, आपल्या शाळेचा निकाल १०० टक्के लागणारच आहे. तरीही खरे जीवन काय हे इथून बाहेर पडल्यावरच समजणार आहे. इथे मिळालेले शिक्षण हे बाहेरचे जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आपले म्हणणे ठामपणे मांडणे हे आपल्याला शाळेतच शिकवले जाते. मी शालेय जीवनात अभ्यासात फार काही करू शकलो नाही. पण शाळेच्या संस्कारांमुळे मी चांगला कलाकार होऊ शकलो, असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ््या गप्पा मारल्या. प्रास्ताविक अशोक सप्रे यांनी केले तर सूत्रसंचालन सनगरे यांनी केले. (प्रतिनिधी)गीतातून जिंकली मने...प्रशांत दामले यांचे भाषण सुरू असताना विद्यार्थ्यांनी त्यांना ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ हे लोकप्रिय गाणं सादर करण्याची विनंती केली. मात्र, दामले यांनी विद्यार्थ्यांना संदेश देण्यासाठी कवीवर्य मंगेश पाडगावकर यांची ‘सांगा कसं जगायचं?’ ही कविता सादर करत उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकली. यामुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली होती.