शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

गांडूळ खताचे गाव अशी रत्नागिरीच्या कोतवड्याला मिळणार नवी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 17:54 IST

रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथील शेतकऱ्यांनी शेती उत्पादन वाढवण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प सुरू करायचे ठरवले आहे. अनुलोम संस्थेचे मार्गदर्शन व झेप ग्रामविकास महिला मंचाच्या प्रेरणेने ग्रामस्थांनी स्वखर्चाने खतासाठी दोन गादीवाफे केले.

ठळक मुद्देकोतवडे ठरणार गांडूळ खताचे गावप्रत्येक घरी प्रकल्प करण्याचा संकल्पअनुलोम संस्थेचे मार्गदर्शन, झेप ग्रामविकास महिला मंचाची प्रेरणा शेतकऱ्यांचे गट करून कृषी विभागाशी जोडले जाणार

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे येथील शेतकऱ्यांनी शेती उत्पादन वाढवण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प सुरू करायचे ठरवले आहे. अनुलोम संस्थेचे मार्गदर्शन व झेप ग्रामविकास महिला मंचाच्या प्रेरणेने ग्रामस्थांनी स्वखर्चाने खतासाठी दोन गादीवाफे केले.

पुढील १५ दिवसांत आणखी १२ वाफे केले जाणार आहेत. प्रत्येक घरी असा प्रकल्प करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. यातूनच कोतवड्याला गांडूळ खताचे गाव अशी नवी ओळख मिळणार आहे.कोतवडे येथील शेतकरी वर्षाला सुमारे पाच-सहा हजार रुपयांचे खत विकत घेतात. तेवढ्याच रुपयांत दुप्पट खत मिळू शकेल, या अनुलोमच्या सल्ल्यानंतर शेतकरी खूश झाले आणि त्यांनी गांडूळ खतनिर्मिती करण्याचे ठरवले.

शेतीसाठी लागणारे खत वापरून उर्वरित खताची विक्री करून पैसेही मिळू शकतात. याकरिता अनुलोमने पहिला कार्यक्रम सनगरेवाडीमध्ये घेतला. तालुका कृषी विभाग-आत्माच्या तालुका समन्वयक हर्षला पाटील यांनी खताचे प्रात्यक्षिक गावकऱ्यांना दाखवले.

अनुलोमतर्फे सामाजिक काम व शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जातो व भविष्यात कोतवड्यात शेतकऱ्यांचे गट करून त्यांना कृषी विभागाशी जोडले जाणार आहे, असे अनुलोम रत्नागिरी-सिंधुदुर्ग संस्थेचे उपविभागप्रमुख स्वप्नील सावंत यांनी सांगितले.

ग्रामविकासाला चालना मिळण्याच्या दृष्टीने लोकसहभागातून गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प विकासाचे केंद्र बनेल. यानिमित्ताने शेतीतील परिवर्तनला सुरवात झाली आहे. यातून रोजगार निर्माण होईल, असे अनुलोमचे भाग जनसेवक रवींद्र भोवड म्हणाले.

झेप संस्थेच्या समृद्धी सोनार म्हणाल्या की, अनुलोमने केलेल्या मार्गदर्शनामुळे गरज असलेला गांडूळ खत प्रकल्प सुरू होत आहे. भविष्यात गावात किमान १५ प्रकल्प सुरू होऊन शेती उत्पादन नक्कीच वाढेल. कृषी सहायक तायडे, मनाली सनगरे व ग्रामस्थ उपस्थित होते.जमिनीचा पोत सुधारणारगादीवाफ्यात महिलांनी पालापाचोळा, नारळाची सोडणे, शेण, कचरा यांचे थर केले. त्यानंतर त्याच्यात गांडूळ सोडण्यात आले. त्यावर पाणी शिंपडून ते नेहमी ओले राहावे याकरिता गोणपाटाने झाकण्यात आले. या खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात, ह्यूमसचे प्रमाण भरपूर असल्यामुळे नत्र, स्फुरद, पालाश झाडांना भरपूर उपलब्ध होतात. हे फायदे कोतवड्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWomenमहिला