शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

रत्नागिरीतील नवीन अग्निशमन केंद्र शोभेचे?, कर्मचारी नियुक्तीबाबत शासनाची उदासिनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:13 IST

कोकणातील आगीच्या दुर्घटनांवर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी रत्नागिरीत सुमारे दोन एकर जागेवर अत्याधुनिक अग्निशमन केंद अर्थात फायर स्टेशन दोन वर्षांपूर्वीच बांधून पूर्ण झाले आहे. दहा कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या या अग्निशमन केंद्रासाठी अधिकारी व प्रशिक्षित कर्मचारी यांची गेल्या दोन वर्षात राज्याच्या उद्योग खात्याकडून नियुक्तीच झालेली नाही. त्यामुळे हे अग्नीशमन केंद्र सध्यातरी शोभेचे बनल्याची टीका होत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीतील नवीन अग्निशमन केंद्र शोभेचे?, कर्मचारी नियुक्तीबाबत शासनाची उदासिनता

रत्नागिरी : कोकणातील आगीच्या दुर्घटनांवर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी रत्नागिरीत सुमारे दोन एकर जागेवर अत्याधुनिक अग्निशमन केंद अर्थात फायर स्टेशन दोन वर्षांपूर्वीच बांधून पूर्ण झाले आहे. दहा कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या या अग्निशमन केंद्रासाठी अधिकारी व प्रशिक्षित कर्मचारी यांची गेल्या दोन वर्षात राज्याच्या उद्योग खात्याकडून नियुक्तीच झालेली नाही. त्यामुळे हे अग्नीशमन केंद्र सध्यातरी शोभेचे बनल्याची टीका होत आहे.मोठ्या शहरांप्रमाणेच आता कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बहुमजली इमारती उभारण्यासाठी शासनाने मंजूरी दिली आहे. तशा इमारती उभ्याही राहिल्या आहेत. मोठ्या शहरात बहुमजली इमारतींमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास तत्काळ तेथील अग्निशमन दलातर्फे आग विझविण्यारी यंत्रणा घटनास्थळी दाखल होते व आग आटोक्यात आणली जाते. रत्नागिरीतही आता ६ व ७ मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. जिल्ह्याची वेगाने प्रगती होत आहे. अशावेळी उभारण्यात आलेल्या अग्नीशमन केंद्राच्या उदघाटनाबाबत शासनाची मात्र उदासिनता दिसून येत आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुमजली इमारतींबाबत जर अशी दुर्घटना घडली तर येथे अशी यंत्रणा आधी नव्हती. त्यासाठीच नारायण राणे यांनी उद्योगमंत्री असताना रत्नागिरीत ७७ गुंठे जागेत अत्याधुनिक अग्निशमन केंद्र अर्थात फायर स्टेशन उभारण्यासाठी १० कोटींचा निधी मिळवून दिला होता. त्यातूनच हे अग्निशमन केंद्र रत्नागिरीत २०१६ साली पूर्ण करण्यात आले आहे. या केंद्राचे काम पूर्ण व्हावे, यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनीही पाठपुरावा केला होता. मात्र केंद्र अत्याधुनिक असून दोन वर्षांपासून उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ७ औद्योगिक वसाहती आहेत. त्यासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र येथे अस्तित्वात नव्हते. म्हणून हे केंद्र आता उभारण्यात आले आहे. या केंद्रात हायड्रॉलिक शिडियुक्त दोन अग्निशमन बंब, १ अधिकारी, १२ फायरमन व अन्य मिळून २६ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची आवश्यकता आहे.

या केंद्राचा संपूर्ण कोकणला फायदा होणार आहे. ६ ते ७ मजली इमारतींमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास या केंद्राची त्यात महत्वाची मदत होणार आहे. मात्र कर्मचारी नियुक्तीबाबत अद्यापही शासनाकडून कोणतीही हालचाल नसल्याने हे केंद्र सुरू होणार तरी कधी, असा सवाल केला जात आहे.

टॅग्स :fireआगRatnagiriरत्नागिरी