शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

रत्नागिरीतील नवीन अग्निशमन केंद्र शोभेचे?, कर्मचारी नियुक्तीबाबत शासनाची उदासिनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:13 IST

कोकणातील आगीच्या दुर्घटनांवर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी रत्नागिरीत सुमारे दोन एकर जागेवर अत्याधुनिक अग्निशमन केंद अर्थात फायर स्टेशन दोन वर्षांपूर्वीच बांधून पूर्ण झाले आहे. दहा कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या या अग्निशमन केंद्रासाठी अधिकारी व प्रशिक्षित कर्मचारी यांची गेल्या दोन वर्षात राज्याच्या उद्योग खात्याकडून नियुक्तीच झालेली नाही. त्यामुळे हे अग्नीशमन केंद्र सध्यातरी शोभेचे बनल्याची टीका होत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीतील नवीन अग्निशमन केंद्र शोभेचे?, कर्मचारी नियुक्तीबाबत शासनाची उदासिनता

रत्नागिरी : कोकणातील आगीच्या दुर्घटनांवर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी रत्नागिरीत सुमारे दोन एकर जागेवर अत्याधुनिक अग्निशमन केंद अर्थात फायर स्टेशन दोन वर्षांपूर्वीच बांधून पूर्ण झाले आहे. दहा कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या या अग्निशमन केंद्रासाठी अधिकारी व प्रशिक्षित कर्मचारी यांची गेल्या दोन वर्षात राज्याच्या उद्योग खात्याकडून नियुक्तीच झालेली नाही. त्यामुळे हे अग्नीशमन केंद्र सध्यातरी शोभेचे बनल्याची टीका होत आहे.मोठ्या शहरांप्रमाणेच आता कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बहुमजली इमारती उभारण्यासाठी शासनाने मंजूरी दिली आहे. तशा इमारती उभ्याही राहिल्या आहेत. मोठ्या शहरात बहुमजली इमारतींमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास तत्काळ तेथील अग्निशमन दलातर्फे आग विझविण्यारी यंत्रणा घटनास्थळी दाखल होते व आग आटोक्यात आणली जाते. रत्नागिरीतही आता ६ व ७ मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. जिल्ह्याची वेगाने प्रगती होत आहे. अशावेळी उभारण्यात आलेल्या अग्नीशमन केंद्राच्या उदघाटनाबाबत शासनाची मात्र उदासिनता दिसून येत आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुमजली इमारतींबाबत जर अशी दुर्घटना घडली तर येथे अशी यंत्रणा आधी नव्हती. त्यासाठीच नारायण राणे यांनी उद्योगमंत्री असताना रत्नागिरीत ७७ गुंठे जागेत अत्याधुनिक अग्निशमन केंद्र अर्थात फायर स्टेशन उभारण्यासाठी १० कोटींचा निधी मिळवून दिला होता. त्यातूनच हे अग्निशमन केंद्र रत्नागिरीत २०१६ साली पूर्ण करण्यात आले आहे. या केंद्राचे काम पूर्ण व्हावे, यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनीही पाठपुरावा केला होता. मात्र केंद्र अत्याधुनिक असून दोन वर्षांपासून उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ७ औद्योगिक वसाहती आहेत. त्यासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र येथे अस्तित्वात नव्हते. म्हणून हे केंद्र आता उभारण्यात आले आहे. या केंद्रात हायड्रॉलिक शिडियुक्त दोन अग्निशमन बंब, १ अधिकारी, १२ फायरमन व अन्य मिळून २६ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची आवश्यकता आहे.

या केंद्राचा संपूर्ण कोकणला फायदा होणार आहे. ६ ते ७ मजली इमारतींमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास या केंद्राची त्यात महत्वाची मदत होणार आहे. मात्र कर्मचारी नियुक्तीबाबत अद्यापही शासनाकडून कोणतीही हालचाल नसल्याने हे केंद्र सुरू होणार तरी कधी, असा सवाल केला जात आहे.

टॅग्स :fireआगRatnagiriरत्नागिरी