शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

समाजमंदिरांपेक्षा रुग्णालयांचीच गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:31 IST

सध्या प्रत्येकाच्याच मनात कोरोनाची भीती आहे. स्वत:बरोबरच आपल्या आप्तांचीही काळजी मनात घर करून आहे. दुसरा दिवस उजाडला की काही ...

सध्या प्रत्येकाच्याच मनात कोरोनाची भीती आहे. स्वत:बरोबरच आपल्या आप्तांचीही काळजी मनात घर करून आहे. दुसरा दिवस उजाडला की काही अशुभ वार्ता कानी पडू दे नको, असे भाकीत सारेच ईश्वराकडे करीत आहेत. अर्थात, गेल्या वेळेसारखी ही परिस्थितीही कालांतराने निवळेल. मात्र, यातून ‘आम्ही’ काय शिकलो, यापेक्षा यातून मी काय बोध घेतला, याचा विचार प्रत्येकानेच अंतर्मुख होऊन करायला हवा. कारण आपल्या बेफिकिरीमुळे परिस्थिती भयावह झाली की मग आपण देवा यातून मला वाचव, अशी आळवणी करतो. ती वेळ निघून गेली मग ‘ये रे माझ्या मागल्या...’ उक्तीनुसार पुन्हा तोच बेजबाबदारपणा दाखवतो. त्यामुळे आपल्या या वृत्तीमुळे परिस्थिती अधिकच बिघडत जाते. कोरोनाकाळात दोन वेळा याचा प्रत्यय आला आहे. ज्या देशांनी, राज्यांनी स्वयंशिस्त पाळली, त्यांना काेराेनाशी लढा देणे सोपे झाले. मात्र, बेशिस्तीमुळे काय होते, त्याचा अनुभव सध्या आपण घेतच आहोत.

आजची कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेरची झाली आहे. आधीच अपुऱ्या असलेल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आला आहे. आहे तेच डाॅक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचारी दोन - तीन शिफ्टमध्ये स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या जिवाची पर्वा न करता नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक आपल्या कुटुंबाला विसरून लाेकांच्या सेवेसाठी बाहेर पडत आहेत. प्रसंगी रुग्णांना खाऊपिऊ देत आहेत. सुविधा नाहीत, तिथे आपल्या वाहनातून उचलून नेत आहेत. अशा रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाइकांसाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच हे स्वयंसेवक आज खऱ्या अर्थाने देवदूत बनले आहेत.

वाढती रुग्णसंख्या पाहता, रुग्णालये आणि त्यातील मनुष्यबळ कमी पडत आहे. एरव्ही प्रत्येक समाजाला त्यांची प्रार्थनास्थळे महत्त्वाची वाटतात. माणसांपेक्षा जात, धर्म महत्त्वाचा वाटतो, त्यामुळे काही वेळा एकमेकांच्या जिवावर उठल्याच्या अनेक घटना वाचनात, टीव्हीवर पाहण्यात येतात. परंतु आज हे सगळं फोल ठरलं आहे. आज देव नाही तर देवासारखी माणसं मदतीला धावून येत असल्याने प्राण किती अनमोल असतो, याचा साक्षात्कार नव्याने व्हायला लागलाय. म्हणूनच आतातरी सर्वांनीच देवाच्या, जातीच्या नावाखाली समाजमंदिराचे राजकारण करत लोकांच्या मनात जातीयतेची विषवल्ली पसरविणाऱ्या राजकीय मंडळींचा कावा ओळखून त्यांना समाजमंदिरे उभारण्यापासून रोखून प्रत्येक गावामध्ये अद्ययावत असे रुग्णालय उभारून त्यात पुरेसे मनुष्यबळही उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरावा. कारण यापुढे रुग्णालयेच कामी येणार आहेत. कोरोनाने हे अंजन डोळ्यात घातले आहे, एवढे नक्की.

डाॅ. गजनान पाटील