शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दिल्लीत ६,७ रोजी होणार असाक्षरांचा राष्ट्रीय मेळावा, रत्नागिरीच्या अनन्या चव्हाणला विशेष निमंत्रण

By शोभना कांबळे | Updated: February 3, 2024 12:49 IST

रत्नागिरी : उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत ६ व ७ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत असाक्षर ...

रत्नागिरी : उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत ६ व ७ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत असाक्षर व नवसाक्षरांचा राष्ट्रीय मेळावा होणार आहे.  केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता मंत्रालयाने याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यासाठी राष्ट्रीय पातळीवर शिक्षण प्रेरणा देणा-या कलाकृतीची दखल घेतलेल्या रत्नागिरीच्या अनन्या चव्हाण व तिच्या पालकांना केंद्र शासनाने विशेष निमंत्रण दिले आहे.२०२२ ते २७ या पंचवार्षिक कालावधीत दरवर्षी एक कोटी प्रमाणे पाच कोटी लोकांना साक्षर करण्याचे या योजनेअंतर्गत उद्दिष्ट आहे. देशभरातील 30 घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे प्रातिनिधिक असाक्षर आणि नवसाक्षर स्वयंसेवी शिक्षकांसह नवी दिल्लीतील राष्ट्रीय बाल भवनात होणाऱ्या या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.महाराष्ट्रातून पुणे,अमरावती, गडचिरोली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातून या मेळाव्यात चार अधिकारी, दोन असाक्षर, दोन स्वयंसेवक, दहा कलाकार आणि दोन विशेष निमंत्रित अशा वीस जणांचे पथक सहभागी होत आहे. योजना शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर सहाय्यक योजना अधिकारी विराज खराटे, राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील साक्षरता केंद्राच्या प्रमुख गीतांजली बोरुडे, अधिव्याख्याता पंढरीनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे पथक सांस्कृतिक कार्यक्रम, योजनेअंतर्गत उल्लेखनीय कार्यक्रमांचे सादरीकरण करणार आहे.अभियानांतर्गत अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन यासाठी विकसित केलेल्या उल्लास व उजास मार्गदर्शिका,कृतिपत्रिका यांचे प्रकाशन होणार आहे. नवसाक्षर आणि  असाक्षरांचे अनुभव प्रकटीकरण, स्वयंसेवकांचे चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम होतील. प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र स्टॉल उभारण्यात येणार असून त्याद्वारे या अभियानांतर्गत झालेल्या व सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती तसेच अध्ययन अध्यापनासाठी विकसित केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन स्टॉलद्वारे करता येणार आहे.कोल्हापूर डाएटचे अधिव्याख्याता तुकाराम कुंभार यांच्या नेतृत्वाखाली दहा जणांचे कलापथक साक्षरतेवर हिंदी पोवाडा सादर करणार आहे. राष्ट्रीय पातळीवर शिक्षण प्रेरणा देणा-या कलाकृतीची दखल घेतलेल्या रत्नागिरीच्या अनन्या चव्हाण व तिच्या पालकांना केंद्र शासनाने विशेष निमंत्रण दिले आहे. तिने साकारलेल्या कलाकृतीसह राज्यात साक्षरता प्रचारात प्रेरणादायी ठरत असलेले सातारा येथील ७६ वर्षीय बबई मस्कर यांचे साक्षरता वर्गातील पहिल्या दिवसाचे छायाचित्र आणि मणक्याच्या आजाराने त्रस्त असून शिक्षण घेण्याची उर्मी असलेल्या बारामती येथील ७६ वर्षीय सुशीला क्षीरसागर व रुचिता क्षीरसागर यांची कॅनव्हासवर चित्रीत केलेली छायाचित्रे केंद्रीय शिक्षण मंत्रालयास राज्याकडून भेट देण्यात येणार आहेत. या तीनही उपक्रमांची केंद्र शासनाने यापूर्वीच दखल घेतली आहे.

 "असाक्षरता नोंदणीत राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी करणाऱ्या अमरावती व गडचिरोली जिल्ह्यातील व्यक्तींना मेळाव्यात सहभागी होण्याची प्रातिनिधिक संधी देण्यात आली आहे." -डॉ. महेश पालकर शिक्षण संचालक (योजना)

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी