शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गुहागर तालुक्यातील नक्षत्र वन धोक्यात

By admin | Updated: August 28, 2015 23:43 IST

वन विभागासमोर आव्हान : दोन हेक्टर चौरस फूट क्षेत्रावरील लागवड वाया

संकेत गोयथळे - गुहागर  जिल्हा नियोजन निधीमधून समुद्रकिनारी तब्बल दोन हेक्टर चौरसफूट क्षेत्रावर वन विभागामार्फत लागवड करण्यात आली होती. मात्र, वनामध्ये लागवड केलेल्या २ हजार ९६३ सेवांमधील अर्ध्याहून अधिक झाडे समूळ नष्ट झाली आहेत, तर काही कोमजलेली आहेत. यामुळे कायमस्वरुपी हे नक्षत्रवन भविष्यात चांगल्या स्थितीत टिकवून ठेवणे वन विभागासाठी आव्हानात्मक काम ठरणार आहे.एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा, असे सांगितले जाते. मात्र, लावलेली झाडे जोपासायची कुणी? असा सवाल केला जात आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे वनमंत्री तसेच पालकमंत्री असताना गुहागर समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांसाठी अधिकाधिक सुविधांसह विरंगुळा व माहितीसाठी १२ राशी, २७ नक्षत्रे व नक्षत्रांचे आराध्य वृक्ष यांच्या लागवडीचे नक्षत्रवन व्हावे, यासाठी जिल्हा नियोजनमधून २०१०-११मध्ये निधी उपलब्ध करुन दिला. गुहागर वन विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार दोन हेक्टरमध्ये २ हजार ९६३ रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये एक हेक्टरमध्ये २ हजार ६०० सुरुची झाडे व एक हेक्टरमध्ये ३०८ औषधी वनस्पती व नक्षत्रवनामध्ये विविध ५५ रोपे लावण्यात आली.नक्षत्र वनामध्ये खैर, आवळा, नागकेशर, सावर, कुंचला, मोहा, शमी, कदंब, रुई, फणस, नीम, जांभूळ, पिंपळ, पळस, पायर आदी शास्त्रीयदृष्ट्या आवश्यक सर्व प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. यामधील बेल, जाई व काही झाडेवगळता बहुतांश झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही, अशी स्थिती आहे. खासकरुन पावसाळ्यात जोराचा पाऊस व दमट हवामान यामुळे चार महिने झाडे कोमेजतात व त्यानंतर नोव्हेंबरनंतर पुन्हा त्यांना पालवी फुटते असे वनाधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. नर्सरीसाठी लावलेली बहुतांश झाडे मेली असून आता एकही झाड दिसत नाही. तसेच एक हेक्टरमध्ये लावलेल्या सुरुमधील समुद्री भरतीमुळे शेकडो झाडे सुरु उन्मळून समूळ नष्ट झालेली दिसत आहेत. नक्षत्र वनाच्या समुद्राकडील पाण्याच्या दिशेने पाण्याचा तडाखा बसू नये म्हणून लावलेली सुरूची बहुतांश झाडे उन्मळून पडल्याने भरतीचे पाणी थेट नक्षत्रवनामध्ये घुसत असल्याने ही अनेक झाडे मेली आहेत. अशी काही झाडे वन विभागाने पुन्हा लावली आहेत. मात्र, पुन्हा तीच स्थिती कायम राहिल्याने असणारी झाडे कशा प्रकारे जगवावीत हे आव्हान आहे.मे २०१५मध्ये केलेल्या पाहणी अहवालानुसार औषधी वनस्पती ९० टक्के, नक्षत्रवन ७१ टक्के व सुरूची झाडे ७९ टक्के अस्तित्त्वात असल्याची माहिती वनपाल राजश्री कीर यांनी दिली. मात्र, प्रत्यक्षात या पावसाळी हंगामानंतर एवढी झाडे आता अस्तित्त्वात नाहीत, असे चित्र आहे.