शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

गुहागर तालुक्यातील नक्षत्र वन धोक्यात

By admin | Updated: August 28, 2015 23:43 IST

वन विभागासमोर आव्हान : दोन हेक्टर चौरस फूट क्षेत्रावरील लागवड वाया

संकेत गोयथळे - गुहागर  जिल्हा नियोजन निधीमधून समुद्रकिनारी तब्बल दोन हेक्टर चौरसफूट क्षेत्रावर वन विभागामार्फत लागवड करण्यात आली होती. मात्र, वनामध्ये लागवड केलेल्या २ हजार ९६३ सेवांमधील अर्ध्याहून अधिक झाडे समूळ नष्ट झाली आहेत, तर काही कोमजलेली आहेत. यामुळे कायमस्वरुपी हे नक्षत्रवन भविष्यात चांगल्या स्थितीत टिकवून ठेवणे वन विभागासाठी आव्हानात्मक काम ठरणार आहे.एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा, असे सांगितले जाते. मात्र, लावलेली झाडे जोपासायची कुणी? असा सवाल केला जात आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे वनमंत्री तसेच पालकमंत्री असताना गुहागर समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांसाठी अधिकाधिक सुविधांसह विरंगुळा व माहितीसाठी १२ राशी, २७ नक्षत्रे व नक्षत्रांचे आराध्य वृक्ष यांच्या लागवडीचे नक्षत्रवन व्हावे, यासाठी जिल्हा नियोजनमधून २०१०-११मध्ये निधी उपलब्ध करुन दिला. गुहागर वन विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार दोन हेक्टरमध्ये २ हजार ९६३ रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये एक हेक्टरमध्ये २ हजार ६०० सुरुची झाडे व एक हेक्टरमध्ये ३०८ औषधी वनस्पती व नक्षत्रवनामध्ये विविध ५५ रोपे लावण्यात आली.नक्षत्र वनामध्ये खैर, आवळा, नागकेशर, सावर, कुंचला, मोहा, शमी, कदंब, रुई, फणस, नीम, जांभूळ, पिंपळ, पळस, पायर आदी शास्त्रीयदृष्ट्या आवश्यक सर्व प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. यामधील बेल, जाई व काही झाडेवगळता बहुतांश झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही, अशी स्थिती आहे. खासकरुन पावसाळ्यात जोराचा पाऊस व दमट हवामान यामुळे चार महिने झाडे कोमेजतात व त्यानंतर नोव्हेंबरनंतर पुन्हा त्यांना पालवी फुटते असे वनाधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. नर्सरीसाठी लावलेली बहुतांश झाडे मेली असून आता एकही झाड दिसत नाही. तसेच एक हेक्टरमध्ये लावलेल्या सुरुमधील समुद्री भरतीमुळे शेकडो झाडे सुरु उन्मळून समूळ नष्ट झालेली दिसत आहेत. नक्षत्र वनाच्या समुद्राकडील पाण्याच्या दिशेने पाण्याचा तडाखा बसू नये म्हणून लावलेली सुरूची बहुतांश झाडे उन्मळून पडल्याने भरतीचे पाणी थेट नक्षत्रवनामध्ये घुसत असल्याने ही अनेक झाडे मेली आहेत. अशी काही झाडे वन विभागाने पुन्हा लावली आहेत. मात्र, पुन्हा तीच स्थिती कायम राहिल्याने असणारी झाडे कशा प्रकारे जगवावीत हे आव्हान आहे.मे २०१५मध्ये केलेल्या पाहणी अहवालानुसार औषधी वनस्पती ९० टक्के, नक्षत्रवन ७१ टक्के व सुरूची झाडे ७९ टक्के अस्तित्त्वात असल्याची माहिती वनपाल राजश्री कीर यांनी दिली. मात्र, प्रत्यक्षात या पावसाळी हंगामानंतर एवढी झाडे आता अस्तित्त्वात नाहीत, असे चित्र आहे.