शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

नाणार प्रकल्प : उच्चस्तरीय समितीला पाय ठेवू देणार नाही : राजन साळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 15:21 IST

नाणार प्रकल्पाला विरोध असतानादेखील न जुमानता नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीला नाणार परिसरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी राजापूर येथे दिला.

ठळक मुद्देनाणार प्रकल्प : उच्चस्तरीय समितीला पाय ठेवू देणार नाही : राजन साळवीशिवसेनेचा जोरदार विरोध कायम

राजापूर : नाणार प्रकल्पाला शंभर टक्के विरोध असतानादेखील त्याला न जुमानता शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा विचार करण्यासाठी नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीला शिवसेनेचा जोरदार विरोध असून खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या समितीला नाणार परिसरात पाय ठेवू देणार नाही, असा सज्जड इशारा आमदार राजन साळवी यांनी राजापूर येथे दिला.नाणार प्रकल्पाला परिसरातील जनतेचा शंभर टक्के विरोध असतानाच शासनाने मात्र तो प्रकल्प रेटण्याची भूमिका कायम ठेवली आहे मागील दोन वर्षात अनेक आंदोलने उभारुन स्थानिक जनतेने आपला विरोध सातत्याने दाखवुन दिला आहे पण शासन मात्र आपल्या भुमिकेवर ठाम राहिले आहे.

रिफायनरी प्रकल्पाला मोठा विरोध असतानासुध्दा आता विद्यमान राज्य शासनाने रिफायनरीच्या समस्यांचा विचार करण्यासाठी माजी अधिकारी एम. डी. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची उच्चस्तरीय स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे. शिवसेनेनेचा त्या समितीला प्रखर विरोध असुन त्या समितीला नाणार परिसरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला.शिवसेनेने सुरवातीपासूनच रिफायनरीला जोरदार विरोध केला आहे. स्थानिक जनतेच्या आम्ही ठामपणे पाठीशी असुन जोवर शासन हा प्रकल्प रद्द करण्याची भूमिका घेत नाही, तोवर शिवसेनेचा लढा कायम राहिल असे त्यान्नी पुढे सांगितले नियोजीत रिफायनरी प्रकल्पाला तर मोठा विरोध आहे.

त्या विरोधाची पत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आली होती तर मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प परिसराचा दौरा करावा व तेथील वस्तुस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असे आवाहनदेखील यापुर्वी खासदार विनायक राऊत यांनी केले होते.मुख्यमंत्र्यांसह राज्य शासनाने कुणालाच न जुमानता रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्याचे धोरण अवलंबले असून अशी समिती नियुक्त करणे हा प्रकल्पग्रस्त जनतेचा घोर अपमान आहे, असे राजन साळवी यांनी सांगितले.

शिवसेनेच्या खासदार, आमदारांना प्रकल्प परिसरात फिरु देणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचादेखील आमदार साळवी यांनी चांगलाच समाचार घेतला.मागील अनेक वर्षे सागवे विभाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. तेथील जनता यापुढेदेखील शिवसेनेबरोबर राहिल. त्यामुळे आमच्या बालेकिल्ल्यात जर कुणी आम्हाला आव्हान देत असेल तर आम्हीदेखील तयार आहोत. या विभागात आम्ही केव्हाही फिरायला तयार असून आम्हाला अडवुन दाखवा व पुढे घडणाऱ्या परिणामांना तोंड द्यायला तयार रहा, अशा शब्दात त्यांनी ठणकावून सांगितले.या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे राजापुर तालुका संपर्कप्रमुख दिनेश जैतापकर, तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर, उपतालुकाप्रमुख विश्वनाथ लाड, राजन कुवळेकर, माजी सभापती सुभाष गुरव, शहरप्रमुख संजय पवार, युवा सेना तालुकाधिकारी प्रफुल्ल लांजेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरीRajan Salviराजन साळवीShiv Senaशिवसेना