शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

नाणार प्रकल्प : उच्चस्तरीय समितीला पाय ठेवू देणार नाही : राजन साळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 15:21 IST

नाणार प्रकल्पाला विरोध असतानादेखील न जुमानता नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीला नाणार परिसरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी राजापूर येथे दिला.

ठळक मुद्देनाणार प्रकल्प : उच्चस्तरीय समितीला पाय ठेवू देणार नाही : राजन साळवीशिवसेनेचा जोरदार विरोध कायम

राजापूर : नाणार प्रकल्पाला शंभर टक्के विरोध असतानादेखील त्याला न जुमानता शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा विचार करण्यासाठी नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीला शिवसेनेचा जोरदार विरोध असून खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या समितीला नाणार परिसरात पाय ठेवू देणार नाही, असा सज्जड इशारा आमदार राजन साळवी यांनी राजापूर येथे दिला.नाणार प्रकल्पाला परिसरातील जनतेचा शंभर टक्के विरोध असतानाच शासनाने मात्र तो प्रकल्प रेटण्याची भूमिका कायम ठेवली आहे मागील दोन वर्षात अनेक आंदोलने उभारुन स्थानिक जनतेने आपला विरोध सातत्याने दाखवुन दिला आहे पण शासन मात्र आपल्या भुमिकेवर ठाम राहिले आहे.

रिफायनरी प्रकल्पाला मोठा विरोध असतानासुध्दा आता विद्यमान राज्य शासनाने रिफायनरीच्या समस्यांचा विचार करण्यासाठी माजी अधिकारी एम. डी. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची उच्चस्तरीय स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे. शिवसेनेनेचा त्या समितीला प्रखर विरोध असुन त्या समितीला नाणार परिसरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला.शिवसेनेने सुरवातीपासूनच रिफायनरीला जोरदार विरोध केला आहे. स्थानिक जनतेच्या आम्ही ठामपणे पाठीशी असुन जोवर शासन हा प्रकल्प रद्द करण्याची भूमिका घेत नाही, तोवर शिवसेनेचा लढा कायम राहिल असे त्यान्नी पुढे सांगितले नियोजीत रिफायनरी प्रकल्पाला तर मोठा विरोध आहे.

त्या विरोधाची पत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आली होती तर मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प परिसराचा दौरा करावा व तेथील वस्तुस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असे आवाहनदेखील यापुर्वी खासदार विनायक राऊत यांनी केले होते.मुख्यमंत्र्यांसह राज्य शासनाने कुणालाच न जुमानता रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्याचे धोरण अवलंबले असून अशी समिती नियुक्त करणे हा प्रकल्पग्रस्त जनतेचा घोर अपमान आहे, असे राजन साळवी यांनी सांगितले.

शिवसेनेच्या खासदार, आमदारांना प्रकल्प परिसरात फिरु देणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनेचादेखील आमदार साळवी यांनी चांगलाच समाचार घेतला.मागील अनेक वर्षे सागवे विभाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. तेथील जनता यापुढेदेखील शिवसेनेबरोबर राहिल. त्यामुळे आमच्या बालेकिल्ल्यात जर कुणी आम्हाला आव्हान देत असेल तर आम्हीदेखील तयार आहोत. या विभागात आम्ही केव्हाही फिरायला तयार असून आम्हाला अडवुन दाखवा व पुढे घडणाऱ्या परिणामांना तोंड द्यायला तयार रहा, अशा शब्दात त्यांनी ठणकावून सांगितले.या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे राजापुर तालुका संपर्कप्रमुख दिनेश जैतापकर, तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर, उपतालुकाप्रमुख विश्वनाथ लाड, राजन कुवळेकर, माजी सभापती सुभाष गुरव, शहरप्रमुख संजय पवार, युवा सेना तालुकाधिकारी प्रफुल्ल लांजेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरीRajan Salviराजन साळवीShiv Senaशिवसेना