शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

झालाच पाहिजे... झालाचे पाहिजे... रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 17:13 IST

झालाच पाहिजे ... झालाच पाहिजे ... ग्रीन रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत शनिवारी प्रकल्प समर्थकांनी रिफायनरी प्रकल्पासाठी एल्गार पुकारला आहे. आम्हाला ग्रीन रिफायनरी प्रकल्प हवा आहे, तो आम्हाला मुख्यमंत्र्यांनी द्यावा, अशी मागणी करत डोंगर तिठा येथे समर्थनार्थ मोठे शक्तीप्रदर्शन केले आहे.

ठळक मुद्देरिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ राजापुरात शक्तीप्रदर्शन डोंगर तिठा येथे ग्रामस्थांचा एल्गार

राजापूर : झालाच पाहिजे ... झालाच पाहिजे ... ग्रीन रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत शनिवारी प्रकल्प समर्थकांनी रिफायनरी प्रकल्पासाठी एल्गार पुकारला आहे. आम्हाला ग्रीन रिफायनरी प्रकल्प हवा आहे, तो आम्हाला मुख्यमंत्र्यांनी द्यावा, अशी मागणी करत डोंगर तिठा येथे समर्थनार्थ मोठे शक्तीप्रदर्शन केले आहे.आजपर्यंत ग्रीन रिफायनरी प्रकल्पासंदर्भात विरोधाची आंदोलने याच डोंगर तिठा येथे पहावयास मिळाली होती. मात्र, आज वेगळे चित्र पाहावयास मिळाले. कोकण बदलत असल्याचे यावरुन पुढे आले आहे. आज ग्रीन रिफायनरी प्रकल्प समर्थक कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेकडो जमीनदार उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी आजपर्यंत कोकण विकास प्रतिष्ठानकडे या प्रकल्पभागातील सुमारे एक हजार पाचशे कुटुंबाचे सुमारे दोन हजार पाचशे सातबारे म्हणजेच ८ हजार एकरचे संमतीपत्र जमा झाली आहेत. ती संमतीपत्र सादर करत आम्हाला रिफायनरी प्रकल्प हवा आहे, असे यावेळी स्पष्ट केले.आम्ही गेले अनेक महिने याबाबत आमचे मत मांडण्यासाठी खासदार विनायक राऊत यांना विनंती केली होती. मात्र, त्यांनी आमचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न केला. त्यामुळेच आम्हाला आज प्रसिद्धी माध्यमातून समोर यावे लागत आहे.

पूर्वी ज्या भागातून प्रकल्पाला विरोध केला जात होता ती नाणार, पाळेकरवाडी व दत्तवाडी या गावाना वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता रिफायनरी प्रकल्पाला असणारा विरोध मावळला आहे. त्यामुळे आज शेकडो जमीनदार डोंगर तिठा येथे एकत्र आले होते. कोकणच्या विकासासाठी या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची गरज असून, शासनाने हा प्रकल्प येथे घोषित करावा अशी मागणी केली आहे.आम्ही दलाल नाहीआमचेच खासदार आम्हाला दलाल म्हणतात हे खूप खेदजनक असून, खरे दलाल कोण आहेत ते खासदारांनी शोधावे. जर आम्ही खरे जमीनदार आहोत जर दलाल असतो तर आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यात वेळ मिळवून दिली असती व आमचे म्हणणे मांडण्याची संधी दिली असती असा टोला शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास अवसरे यांनी लगावला आहे. 

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी