शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

झालाच पाहिजे... झालाचे पाहिजे... रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 17:13 IST

झालाच पाहिजे ... झालाच पाहिजे ... ग्रीन रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत शनिवारी प्रकल्प समर्थकांनी रिफायनरी प्रकल्पासाठी एल्गार पुकारला आहे. आम्हाला ग्रीन रिफायनरी प्रकल्प हवा आहे, तो आम्हाला मुख्यमंत्र्यांनी द्यावा, अशी मागणी करत डोंगर तिठा येथे समर्थनार्थ मोठे शक्तीप्रदर्शन केले आहे.

ठळक मुद्देरिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ राजापुरात शक्तीप्रदर्शन डोंगर तिठा येथे ग्रामस्थांचा एल्गार

राजापूर : झालाच पाहिजे ... झालाच पाहिजे ... ग्रीन रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत शनिवारी प्रकल्प समर्थकांनी रिफायनरी प्रकल्पासाठी एल्गार पुकारला आहे. आम्हाला ग्रीन रिफायनरी प्रकल्प हवा आहे, तो आम्हाला मुख्यमंत्र्यांनी द्यावा, अशी मागणी करत डोंगर तिठा येथे समर्थनार्थ मोठे शक्तीप्रदर्शन केले आहे.आजपर्यंत ग्रीन रिफायनरी प्रकल्पासंदर्भात विरोधाची आंदोलने याच डोंगर तिठा येथे पहावयास मिळाली होती. मात्र, आज वेगळे चित्र पाहावयास मिळाले. कोकण बदलत असल्याचे यावरुन पुढे आले आहे. आज ग्रीन रिफायनरी प्रकल्प समर्थक कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेकडो जमीनदार उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी आजपर्यंत कोकण विकास प्रतिष्ठानकडे या प्रकल्पभागातील सुमारे एक हजार पाचशे कुटुंबाचे सुमारे दोन हजार पाचशे सातबारे म्हणजेच ८ हजार एकरचे संमतीपत्र जमा झाली आहेत. ती संमतीपत्र सादर करत आम्हाला रिफायनरी प्रकल्प हवा आहे, असे यावेळी स्पष्ट केले.आम्ही गेले अनेक महिने याबाबत आमचे मत मांडण्यासाठी खासदार विनायक राऊत यांना विनंती केली होती. मात्र, त्यांनी आमचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न केला. त्यामुळेच आम्हाला आज प्रसिद्धी माध्यमातून समोर यावे लागत आहे.

पूर्वी ज्या भागातून प्रकल्पाला विरोध केला जात होता ती नाणार, पाळेकरवाडी व दत्तवाडी या गावाना वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता रिफायनरी प्रकल्पाला असणारा विरोध मावळला आहे. त्यामुळे आज शेकडो जमीनदार डोंगर तिठा येथे एकत्र आले होते. कोकणच्या विकासासाठी या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची गरज असून, शासनाने हा प्रकल्प येथे घोषित करावा अशी मागणी केली आहे.आम्ही दलाल नाहीआमचेच खासदार आम्हाला दलाल म्हणतात हे खूप खेदजनक असून, खरे दलाल कोण आहेत ते खासदारांनी शोधावे. जर आम्ही खरे जमीनदार आहोत जर दलाल असतो तर आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यात वेळ मिळवून दिली असती व आमचे म्हणणे मांडण्याची संधी दिली असती असा टोला शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास अवसरे यांनी लगावला आहे. 

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी