शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

झालाच पाहिजे... झालाचे पाहिजे... रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 17:13 IST

झालाच पाहिजे ... झालाच पाहिजे ... ग्रीन रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत शनिवारी प्रकल्प समर्थकांनी रिफायनरी प्रकल्पासाठी एल्गार पुकारला आहे. आम्हाला ग्रीन रिफायनरी प्रकल्प हवा आहे, तो आम्हाला मुख्यमंत्र्यांनी द्यावा, अशी मागणी करत डोंगर तिठा येथे समर्थनार्थ मोठे शक्तीप्रदर्शन केले आहे.

ठळक मुद्देरिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ राजापुरात शक्तीप्रदर्शन डोंगर तिठा येथे ग्रामस्थांचा एल्गार

राजापूर : झालाच पाहिजे ... झालाच पाहिजे ... ग्रीन रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत शनिवारी प्रकल्प समर्थकांनी रिफायनरी प्रकल्पासाठी एल्गार पुकारला आहे. आम्हाला ग्रीन रिफायनरी प्रकल्प हवा आहे, तो आम्हाला मुख्यमंत्र्यांनी द्यावा, अशी मागणी करत डोंगर तिठा येथे समर्थनार्थ मोठे शक्तीप्रदर्शन केले आहे.आजपर्यंत ग्रीन रिफायनरी प्रकल्पासंदर्भात विरोधाची आंदोलने याच डोंगर तिठा येथे पहावयास मिळाली होती. मात्र, आज वेगळे चित्र पाहावयास मिळाले. कोकण बदलत असल्याचे यावरुन पुढे आले आहे. आज ग्रीन रिफायनरी प्रकल्प समर्थक कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेकडो जमीनदार उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी आजपर्यंत कोकण विकास प्रतिष्ठानकडे या प्रकल्पभागातील सुमारे एक हजार पाचशे कुटुंबाचे सुमारे दोन हजार पाचशे सातबारे म्हणजेच ८ हजार एकरचे संमतीपत्र जमा झाली आहेत. ती संमतीपत्र सादर करत आम्हाला रिफायनरी प्रकल्प हवा आहे, असे यावेळी स्पष्ट केले.आम्ही गेले अनेक महिने याबाबत आमचे मत मांडण्यासाठी खासदार विनायक राऊत यांना विनंती केली होती. मात्र, त्यांनी आमचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न केला. त्यामुळेच आम्हाला आज प्रसिद्धी माध्यमातून समोर यावे लागत आहे.

पूर्वी ज्या भागातून प्रकल्पाला विरोध केला जात होता ती नाणार, पाळेकरवाडी व दत्तवाडी या गावाना वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता रिफायनरी प्रकल्पाला असणारा विरोध मावळला आहे. त्यामुळे आज शेकडो जमीनदार डोंगर तिठा येथे एकत्र आले होते. कोकणच्या विकासासाठी या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची गरज असून, शासनाने हा प्रकल्प येथे घोषित करावा अशी मागणी केली आहे.आम्ही दलाल नाहीआमचेच खासदार आम्हाला दलाल म्हणतात हे खूप खेदजनक असून, खरे दलाल कोण आहेत ते खासदारांनी शोधावे. जर आम्ही खरे जमीनदार आहोत जर दलाल असतो तर आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यात वेळ मिळवून दिली असती व आमचे म्हणणे मांडण्याची संधी दिली असती असा टोला शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास अवसरे यांनी लगावला आहे. 

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी