शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

भोंदूगिरी करणारे मुंबईकर पेढे ग्रामस्थांच्या ताब्यात, पोलिसांच्या केले हवाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 17:01 IST

मुंबई येथून चारचाकी गाडी घेऊन पेढे येथील सीमेचा माळ या डोंगराळ भागात जिवंत कोंबड्यांचा बळी व शेकडो अंडी, नारळ फोडून अन्य काही साहित्य त्या ठिकाणी ठेवून देवदेवस्की व भोंदूगिरीचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी पेढे ग्रामस्थांनी परतणाऱ्या या मुंबईकरांना रंगेहाथ पकडले. सुमारे तीन तास या लोकांना मंदिर परिसरात ग्रामस्थांनी घेराओ घातला. अखेर पोलिसांनी त्यांना गाडीसह ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले व पुढील कारवाई सुरु केली.

ठळक मुद्दे भोंदूगिरी करणारे मुंबईकर पेढे ग्रामस्थांच्या ताब्यात, पोलिसांच्या केले हवालीग्रामस्थांचा तीन तास मंदिरासह त्या पाचजणांना घेराओ

चिपळूण : मुंबई येथून चारचाकी गाडी घेऊन पेढे येथील सीमेचा माळ या डोंगराळ भागात जिवंत कोंबड्यांचा बळी व शेकडो अंडी, नारळ फोडून अन्य काही साहित्य त्या ठिकाणी ठेवून देवदेवस्की व भोंदूगिरीचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी पेढे ग्रामस्थांनी परतणाऱ्या या मुंबईकरांना रंगेहाथ पकडले. सुमारे तीन तास या लोकांना मंदिर परिसरात ग्रामस्थांनी घेराओ घातला. अखेर पोलिसांनी त्यांना गाडीसह ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले व पुढील कारवाई सुरु केली.

सर्व कार्यक्रम आटोपून परत फिरण्याच्या तयारीत असतानाच ग्रामस्थांनी गाडी अडवून धरली. तेव्हा एकूण ८ जणांपैकी तिघांनी पळ काढला तर ५ जण ग्रामस्थांच्या तावडीत सापडले. येथे कशासाठी आलात? वरती डोंगरात काय करत होतात? कुठून आलात, असे प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले. तेव्हा ती माझी स्वत:ची असून, माझ्या जागेत धार्मिक विधी करण्यासाठी आलो होतो, असे उत्तर प्रवीण पांडुरंग सकपाळ यांनी दिले. तसेच आपण येथील धामणदेवी गावाचा असल्याचे त्याने ग्रामस्थांना सांगितले.

ज्या डोंगराळ भागात हे सर्व घडले त्याठिकाणी ग्रामस्थ पाहणी करण्यासाठी गेले तेव्हा भयानक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. जिवंत कोंबड्या मान कापून तडफडत ठेवण्यात आल्या होत्या तर दोन कोंबड्या जिवंत सोडण्यात आल्या होत्या. कोंबड्यांचे रक्त नारळ, केळे व अन्य काही वस्तुवर शिंपडण्यात आले होते.

शेकडो अंडी परिसरात फोडण्यात आली होती. फळे व भाज्याही कापून ठेवण्यात आल्या होत्या. ग्रामस्थांनी पोलिसांना याची कल्पना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसराची पोलिसांनी पाहणी केली. पोलिसांनी मंदिर परिसरातून पाचही मुंबईकरांना शनिवारी अमावास्या असताना चिपळूण शहरापासून जवळच असलेल्या पेढे गावात लाल रंगाची गाडी दाखल झाली.

सकाळी ९ वाजता ही गाडी येथे आल्याचे ग्रामस्थांनी पाहिले होते. गाडी मुंबईची असून, त्यावर काही भोंदूबाबांचे फोटोही चिकटवलेले होते. त्यामुळे पेढेतील काही ग्रमस्थांना संशय आला आणि त्यातूनच या ग्रामस्थांनी या लोकांवर पाळत ठेवली. ग्रामस्थांचा हा संशय खरा ठरला.गाडीसह ताब्यात घेतले. त्यांना चिपळूण पोलीस ठाण्यात आणून पुढील कारवाई सुरु करण्यात आली होती. .सखोल चौकशी करणारहे लोक कोण व येथे डोंगरावर ते काय करत आहेत, याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहजासहजी ते लक्षात येत नव्हते. त्याठिकाणी काहीतरी वेगळे चालले आहे असा संशय ग्रामस्थांना आला होता. त्यामुळे हे मुंबईकर परत फिरण्याची प्रतीक्षा ग्रामस्थ गावच्या मंदिर परिसरात करत होते. दरम्यान, याप्रकरणी पूर्ण चौकशी व तपास केल्यानंतरच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :Chiplun Nagar Parishadचिपळूण नगरपरिषदRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस