शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

भोंदूगिरी करणारे मुंबईकर पेढे ग्रामस्थांच्या ताब्यात, पोलिसांच्या केले हवाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 17:01 IST

मुंबई येथून चारचाकी गाडी घेऊन पेढे येथील सीमेचा माळ या डोंगराळ भागात जिवंत कोंबड्यांचा बळी व शेकडो अंडी, नारळ फोडून अन्य काही साहित्य त्या ठिकाणी ठेवून देवदेवस्की व भोंदूगिरीचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी पेढे ग्रामस्थांनी परतणाऱ्या या मुंबईकरांना रंगेहाथ पकडले. सुमारे तीन तास या लोकांना मंदिर परिसरात ग्रामस्थांनी घेराओ घातला. अखेर पोलिसांनी त्यांना गाडीसह ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले व पुढील कारवाई सुरु केली.

ठळक मुद्दे भोंदूगिरी करणारे मुंबईकर पेढे ग्रामस्थांच्या ताब्यात, पोलिसांच्या केले हवालीग्रामस्थांचा तीन तास मंदिरासह त्या पाचजणांना घेराओ

चिपळूण : मुंबई येथून चारचाकी गाडी घेऊन पेढे येथील सीमेचा माळ या डोंगराळ भागात जिवंत कोंबड्यांचा बळी व शेकडो अंडी, नारळ फोडून अन्य काही साहित्य त्या ठिकाणी ठेवून देवदेवस्की व भोंदूगिरीचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी पेढे ग्रामस्थांनी परतणाऱ्या या मुंबईकरांना रंगेहाथ पकडले. सुमारे तीन तास या लोकांना मंदिर परिसरात ग्रामस्थांनी घेराओ घातला. अखेर पोलिसांनी त्यांना गाडीसह ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले व पुढील कारवाई सुरु केली.

सर्व कार्यक्रम आटोपून परत फिरण्याच्या तयारीत असतानाच ग्रामस्थांनी गाडी अडवून धरली. तेव्हा एकूण ८ जणांपैकी तिघांनी पळ काढला तर ५ जण ग्रामस्थांच्या तावडीत सापडले. येथे कशासाठी आलात? वरती डोंगरात काय करत होतात? कुठून आलात, असे प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले. तेव्हा ती माझी स्वत:ची असून, माझ्या जागेत धार्मिक विधी करण्यासाठी आलो होतो, असे उत्तर प्रवीण पांडुरंग सकपाळ यांनी दिले. तसेच आपण येथील धामणदेवी गावाचा असल्याचे त्याने ग्रामस्थांना सांगितले.

ज्या डोंगराळ भागात हे सर्व घडले त्याठिकाणी ग्रामस्थ पाहणी करण्यासाठी गेले तेव्हा भयानक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. जिवंत कोंबड्या मान कापून तडफडत ठेवण्यात आल्या होत्या तर दोन कोंबड्या जिवंत सोडण्यात आल्या होत्या. कोंबड्यांचे रक्त नारळ, केळे व अन्य काही वस्तुवर शिंपडण्यात आले होते.

शेकडो अंडी परिसरात फोडण्यात आली होती. फळे व भाज्याही कापून ठेवण्यात आल्या होत्या. ग्रामस्थांनी पोलिसांना याची कल्पना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसराची पोलिसांनी पाहणी केली. पोलिसांनी मंदिर परिसरातून पाचही मुंबईकरांना शनिवारी अमावास्या असताना चिपळूण शहरापासून जवळच असलेल्या पेढे गावात लाल रंगाची गाडी दाखल झाली.

सकाळी ९ वाजता ही गाडी येथे आल्याचे ग्रामस्थांनी पाहिले होते. गाडी मुंबईची असून, त्यावर काही भोंदूबाबांचे फोटोही चिकटवलेले होते. त्यामुळे पेढेतील काही ग्रमस्थांना संशय आला आणि त्यातूनच या ग्रामस्थांनी या लोकांवर पाळत ठेवली. ग्रामस्थांचा हा संशय खरा ठरला.गाडीसह ताब्यात घेतले. त्यांना चिपळूण पोलीस ठाण्यात आणून पुढील कारवाई सुरु करण्यात आली होती. .सखोल चौकशी करणारहे लोक कोण व येथे डोंगरावर ते काय करत आहेत, याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहजासहजी ते लक्षात येत नव्हते. त्याठिकाणी काहीतरी वेगळे चालले आहे असा संशय ग्रामस्थांना आला होता. त्यामुळे हे मुंबईकर परत फिरण्याची प्रतीक्षा ग्रामस्थ गावच्या मंदिर परिसरात करत होते. दरम्यान, याप्रकरणी पूर्ण चौकशी व तपास केल्यानंतरच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :Chiplun Nagar Parishadचिपळूण नगरपरिषदRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस