शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

माभळेत मुंबईतील महिलेचा खून, बेपत्ताच्या तक्रारीची इतिश्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 15:31 IST

संगमेश्वर तालुक्यातील माभळे सडा येथील चिरेखाणीत मुंबई येथील एका महिलेला ढकलून खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी माभळे येथील श्रीकांत घडशी याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देमाभळेत मुंबईतील महिलेचा खून, बेपत्ताच्या तक्रारीची इतिश्रीमाभळेतील आरोपीला मुंबईत सापळा रचून अटक

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील माभळे सडा येथील चिरेखाणीत मुंबई येथील एका महिलेला ढकलून खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी माभळे येथील श्रीकांत घडशी याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.स्मिता चंद्र्रशेखर कुसुरकर (४५, लोअर परेल, मुंबई) असे खूनझालेल्या महिलेचे नाव आहे. स्मिता या १२ जुलै रोजी रेल्वेतून रात्री आरवली येथे उतरल्या. आरवली येथून श्रीकांतने स्वत:च्या टाटा सुमोमधून त्यांना जमीन दाखवण्यासाठी नेले.

यावेळीच माभळे सडा येथील चिरेखाणीत कुसुरकर यांना ढकलून दिल्याची कबुली श्रीकांतने पोलिसांसमोर दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. श्रीकांत याची उलटसुलट चौकशी केल्यानंतर स्मिता यांचा खून कोणत्या कारणासाठी करण्यात आला, हे स्पष्ट होणार आहे. चिरेखाणीचा व्यवसाय करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या या व्यवहाराकरिता कुसुरकर यांनी पैसे दिले होते का? हेदेखील उघड होणार आहे.स्मिता या ११ जुलै रोजी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास जमिनीच्या कामासाठी कोकणात जाते, असे घरच्या मंडळींना सांगून घराबाहेर पडल्या होत्या. बरेच दिवस झाले तरी त्या घरी आल्या नाहीत आणि मोबाईलही बंद स्वीच आॅफ येत असल्याने त्यांचे पती चंदशेखर यांनी पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार १६ जुलै रोजी मुंबईतील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दिली.

कुसुरकर यांच्या तक्रारीत कोकणचा उल्लेख आल्याने ही तक्रार रत्नागिरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. हा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला होता. गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने व त्यांच्या सहकाऱ्यांनी याप्रकरणी विशेष लक्ष देत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.संभाषणावरून सुगावास्मिता यांच्या भ्रमणध्वनीवर संभाषण झालेल्यांचे नंबर तपासण्यात आले. यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील माभळे गावातील श्रीकांत घडशी व स्मिता कुसुरकर यांचे शेवटचे संभाषण झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी श्रीकांतला गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फरार असल्याचे समजले.खुनाचा गुन्हा दाखलमुंबई येथे सापळा रचून रविवारी मोठ्या कौशल्याने श्रीकांतला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. अखेर वर्दीपुढे श्रीकांतने स्मिता यांचा खून केल्याची कबुली दिली. स्मिता यांना चिरेखाणीत ढकलून मारल्याचे सांगितले. त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :MurderखूनRatnagiriरत्नागिरी