शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

काेराेनाकाळात पाेलीस पाटलांची जीवाची मुंबई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:31 IST

पाली : कोरोनाच्या संक्रमण काळात शासनाने ग्रामपातळीवर ग्राम कृती दलाची स्थापना केली आहे. त्यामध्ये गावाच्या पोलीस पाटलांचे योगदान महत्त्वाचे ...

पाली : कोरोनाच्या संक्रमण काळात शासनाने ग्रामपातळीवर ग्राम कृती दलाची स्थापना केली आहे. त्यामध्ये गावाच्या पोलीस पाटलांचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील वेळवंड येथील पोलीस पाटील गेले दोन वर्षे मुंबईत जाऊन राहिल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. गावाची सुरक्षा रामभरोसे टाकून जाणाऱ्या या पोलीस पाटलांनी राजीनामाही दिलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

रत्नागिरी तालुक्यातील वेळवंड हे गाव वेळवंड आणि कोठारेवाडी असे दोन महसुली गाव म्हणून शासन दरबारी नोंद आहे. या गावाची सध्याची लोकसंख्या अंदाजे ३ हजारांच्या आसपास आहे. शासनाने या गावाला गावाची सुरक्षा राखण्यासाठी एक पोलीस पाटील दिला आहे. शासनाच्या निकषानुसार पोलीस पाटील कमीत कमी १० वी उत्तीर्ण असावा. यामुळे काही वर्षांपूर्वी सदरची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत सदरचे पद अनुसूचित जाती प्रवर्ग स्त्री आल्याने एका महिलेची पोलीस पाटील म्हणून नेमणूक करण्यात आली.

गेले काही वर्षे पोलीस पाटलांनी जबाबदारी पार पाडली. मात्र, वर्षभर कोरोनाचे संक्रमण सुरू असतानाच ‘गावाची सुरक्षितता रामभरोसे’ टाकत त्यांनी मुंबई गाठली. आजपर्यंत त्या गावात परतल्याच नाहीत. येथील सरपंचांनी ग्रामस्थांसह संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला व गावामध्ये पोलीस पाटील कार्यरत नाहीत, अशी माहिती दिली. पाेलीस पाटलांना गावात यायला तरी सांगा, अथवा त्यांचा राजीनामा तरी घ्या? अशी विनंती केल्याचे समजते. मात्र, ठीक आहे, असे म्हणून या प्रमुखांनी गाव प्रमुखांची बोळवण केली आणि हा प्रश्न आजपर्यंत भिजत ठेवला आहे.