शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाकाळात पाेलीस पाटलांची जीवाची मुंबई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:31 IST

पाली : कोरोनाच्या संक्रमण काळात शासनाने ग्रामपातळीवर ग्राम कृती दलाची स्थापना केली आहे. त्यामध्ये गावाच्या पोलीस पाटलांचे योगदान महत्त्वाचे ...

पाली : कोरोनाच्या संक्रमण काळात शासनाने ग्रामपातळीवर ग्राम कृती दलाची स्थापना केली आहे. त्यामध्ये गावाच्या पोलीस पाटलांचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील वेळवंड येथील पोलीस पाटील गेले दोन वर्षे मुंबईत जाऊन राहिल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. गावाची सुरक्षा रामभरोसे टाकून जाणाऱ्या या पोलीस पाटलांनी राजीनामाही दिलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

रत्नागिरी तालुक्यातील वेळवंड हे गाव वेळवंड आणि कोठारेवाडी असे दोन महसुली गाव म्हणून शासन दरबारी नोंद आहे. या गावाची सध्याची लोकसंख्या अंदाजे ३ हजारांच्या आसपास आहे. शासनाने या गावाला गावाची सुरक्षा राखण्यासाठी एक पोलीस पाटील दिला आहे. शासनाच्या निकषानुसार पोलीस पाटील कमीत कमी १० वी उत्तीर्ण असावा. यामुळे काही वर्षांपूर्वी सदरची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत सदरचे पद अनुसूचित जाती प्रवर्ग स्त्री आल्याने एका महिलेची पोलीस पाटील म्हणून नेमणूक करण्यात आली.

गेले काही वर्षे पोलीस पाटलांनी जबाबदारी पार पाडली. मात्र, वर्षभर कोरोनाचे संक्रमण सुरू असतानाच ‘गावाची सुरक्षितता रामभरोसे’ टाकत त्यांनी मुंबई गाठली. आजपर्यंत त्या गावात परतल्याच नाहीत. येथील सरपंचांनी ग्रामस्थांसह संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला व गावामध्ये पोलीस पाटील कार्यरत नाहीत, अशी माहिती दिली. पाेलीस पाटलांना गावात यायला तरी सांगा, अथवा त्यांचा राजीनामा तरी घ्या? अशी विनंती केल्याचे समजते. मात्र, ठीक आहे, असे म्हणून या प्रमुखांनी गाव प्रमुखांची बोळवण केली आणि हा प्रश्न आजपर्यंत भिजत ठेवला आहे.