शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

काेराेनाकाळात पाेलीस पाटलांची जीवाची मुंबई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:31 IST

पाली : कोरोनाच्या संक्रमण काळात शासनाने ग्रामपातळीवर ग्राम कृती दलाची स्थापना केली आहे. त्यामध्ये गावाच्या पोलीस पाटलांचे योगदान महत्त्वाचे ...

पाली : कोरोनाच्या संक्रमण काळात शासनाने ग्रामपातळीवर ग्राम कृती दलाची स्थापना केली आहे. त्यामध्ये गावाच्या पोलीस पाटलांचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील वेळवंड येथील पोलीस पाटील गेले दोन वर्षे मुंबईत जाऊन राहिल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. गावाची सुरक्षा रामभरोसे टाकून जाणाऱ्या या पोलीस पाटलांनी राजीनामाही दिलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

रत्नागिरी तालुक्यातील वेळवंड हे गाव वेळवंड आणि कोठारेवाडी असे दोन महसुली गाव म्हणून शासन दरबारी नोंद आहे. या गावाची सध्याची लोकसंख्या अंदाजे ३ हजारांच्या आसपास आहे. शासनाने या गावाला गावाची सुरक्षा राखण्यासाठी एक पोलीस पाटील दिला आहे. शासनाच्या निकषानुसार पोलीस पाटील कमीत कमी १० वी उत्तीर्ण असावा. यामुळे काही वर्षांपूर्वी सदरची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत सदरचे पद अनुसूचित जाती प्रवर्ग स्त्री आल्याने एका महिलेची पोलीस पाटील म्हणून नेमणूक करण्यात आली.

गेले काही वर्षे पोलीस पाटलांनी जबाबदारी पार पाडली. मात्र, वर्षभर कोरोनाचे संक्रमण सुरू असतानाच ‘गावाची सुरक्षितता रामभरोसे’ टाकत त्यांनी मुंबई गाठली. आजपर्यंत त्या गावात परतल्याच नाहीत. येथील सरपंचांनी ग्रामस्थांसह संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला व गावामध्ये पोलीस पाटील कार्यरत नाहीत, अशी माहिती दिली. पाेलीस पाटलांना गावात यायला तरी सांगा, अथवा त्यांचा राजीनामा तरी घ्या? अशी विनंती केल्याचे समजते. मात्र, ठीक आहे, असे म्हणून या प्रमुखांनी गाव प्रमुखांची बोळवण केली आणि हा प्रश्न आजपर्यंत भिजत ठेवला आहे.