शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
3
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
4
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
5
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
6
अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
7
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
8
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
9
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
10
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
12
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
13
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
14
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
15
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
17
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
18
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
19
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
20
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी

काेराेनाकाळात पाेलीस पाटलांची जीवाची मुंबई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:31 IST

पाली : कोरोनाच्या संक्रमण काळात शासनाने ग्रामपातळीवर ग्राम कृती दलाची स्थापना केली आहे. त्यामध्ये गावाच्या पोलीस पाटलांचे योगदान महत्त्वाचे ...

पाली : कोरोनाच्या संक्रमण काळात शासनाने ग्रामपातळीवर ग्राम कृती दलाची स्थापना केली आहे. त्यामध्ये गावाच्या पोलीस पाटलांचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील वेळवंड येथील पोलीस पाटील गेले दोन वर्षे मुंबईत जाऊन राहिल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. गावाची सुरक्षा रामभरोसे टाकून जाणाऱ्या या पोलीस पाटलांनी राजीनामाही दिलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

रत्नागिरी तालुक्यातील वेळवंड हे गाव वेळवंड आणि कोठारेवाडी असे दोन महसुली गाव म्हणून शासन दरबारी नोंद आहे. या गावाची सध्याची लोकसंख्या अंदाजे ३ हजारांच्या आसपास आहे. शासनाने या गावाला गावाची सुरक्षा राखण्यासाठी एक पोलीस पाटील दिला आहे. शासनाच्या निकषानुसार पोलीस पाटील कमीत कमी १० वी उत्तीर्ण असावा. यामुळे काही वर्षांपूर्वी सदरची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेत सदरचे पद अनुसूचित जाती प्रवर्ग स्त्री आल्याने एका महिलेची पोलीस पाटील म्हणून नेमणूक करण्यात आली.

गेले काही वर्षे पोलीस पाटलांनी जबाबदारी पार पाडली. मात्र, वर्षभर कोरोनाचे संक्रमण सुरू असतानाच ‘गावाची सुरक्षितता रामभरोसे’ टाकत त्यांनी मुंबई गाठली. आजपर्यंत त्या गावात परतल्याच नाहीत. येथील सरपंचांनी ग्रामस्थांसह संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला व गावामध्ये पोलीस पाटील कार्यरत नाहीत, अशी माहिती दिली. पाेलीस पाटलांना गावात यायला तरी सांगा, अथवा त्यांचा राजीनामा तरी घ्या? अशी विनंती केल्याचे समजते. मात्र, ठीक आहे, असे म्हणून या प्रमुखांनी गाव प्रमुखांची बोळवण केली आणि हा प्रश्न आजपर्यंत भिजत ठेवला आहे.